शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

महापौरांसमोरील ‘राजदंडा’चा नियमांत उल्लेखच नाही! रूढी, परंपरेनुसार अनेक वर्षांपासून वापर

By मुजीब देवणीकर | Updated: May 29, 2023 10:33 IST

राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये सर्वसाधारण सभेत महापौरांसमोर सिंगोल (राजदंड) ठेवण्यात येतो.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये सर्वसाधारण सभेत महापौरांसमोर सिंगोल (राजदंड) ठेवण्यात येतो. संविधान, प्रक्रिया आणि नियमांबरोबरच सभागृहाच्या परंपरांनुसार काही विशेष अधिकार दिले जातात. विधानसभेप्रमाणे महानगरपालिकांच्या सभागृहाच्या बैठकींच्या वेळीही राजदंड ठेवला जातो. ते एक मानाचे प्रतीक आहे. मात्र, याचा महापालिका अधिनियमात राजदंड वापरण्यासंदर्भात कुठेच उल्लेख नाही. मागील अनेक वर्षांपासून रूढी, परंपरेनुसार याचा वापर सुरू आहे तो एक संकेत आहे. नगरसेवकांनी राजदंड पळविला तर सभा चालवू नये, हासुद्धा अलिखित नियमच आहे. उलट राजदंड न ठेवता, महापौरांच्या खुर्चीवर बसलेल्या पीठासन अधिकाऱ्यांनी गाऊनचा वापर न करता सभा चालविल्याचे दाखले मिळत आहेत. राजदंड अखेर असते तरी काय? यासंदर्भात ‘लोकमत’ने घेतलेला हा खास आढावा.

रविवारी लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने वापरण्यात आलेल्या संगोल (राजदंड) चा वाद उफाळून आला आहे. राजदंड महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून वापरण्यात येतो. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये महापौरांसमोर राजदंड ठेवलेला असतो. महापौर सभेला जेव्हा येतात, त्याच वेळी राजदंड समोर ठेवला जातो. महापौर उठताच राजदंडही चोपदार उचलून नेतो. राजदंड साभाळण्यासाठी महापालिकांमध्ये खास एका चोपदाराची नेमणूक केलेली असते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही १९८८ पासून याचा वापर केला जातो. सुरुवातीला जर्मनसारखा अत्यंत मृदू हा राजदंड होता. विरोधी नगरसेवक या राजदंडाची ओढताण करीत, १९९७ मध्ये तत्कालीन महापौर रशीद मामू यांनी पुण्याहून अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये चांदीचा मुलामा दिलेला राजदंड बनवून मागविला. त्यामध्ये लाकूड टाकण्यात आले. कोणी ओढताण केली तरी राजदंड वाकडा होत नाही. कालातराने त्यात आणखी सुधारणा झाली. त्यावर सोन्यासारखी पट्टी बसवून आतापर्यंतच्या महापौरांची नावे टाकण्यात आली.

ना राजदंड, ना गाऊनतत्कालीन जिल्हाधिकारी विकास खारगे यांना महापालिकेत एका निवडणुकीत पीठासन अधिकारी म्हणून काम पाहावे लागले. त्यांनी राजदंड न ठेवता, महापौरांचा गाऊन न घालताच निवडणूक प्रक्रिया राबविली. नगरसेवक किशनचंद तनवाणी यावर आक्षेप घेतला. सचिव एम.ए. पठाण यांनी अधिनियमात अशी तरतूद नसल्याचे स्पष्ट केले होते.

महापौरांचा हा फक्त मान असतोमहापौरांसमोर राजदंड ठेवणे हा एक मानपानाचा भाग आहे. ते एक प्रतीक आहे याची कायद्यात कुठेही तरतूद, उल्लेख नाही. काही महापालिका याचा वापर करीत नाहीत. राजदंड पळवून नेला तर चोरीचा गुन्हा नगरसेवकांवर दाखल होऊ शकतो. त्यामुळे अनेक नगरसेवक ते पळवून परत आणून ठेवत असत. पूर्वी गाऊन जांभळा होता. नंतर मी पिवळा आणि चॉकलेटी केला. गाऊनचा वापर कायद्यात कुठेच नाही.- रशीद खान मामू, माजी महापौर.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार