शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

माझ्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही, मराठा समाजच माझी शक्ती: मनोज जरांगे

By बापू सोळुंके | Updated: October 17, 2023 12:13 IST

दिलेल्या वेळेत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला नाही तर २४ ऑक्टोबरनंतर सरकारला न पेलावणारे आंदोलन होईल

छत्रपती संभाजीनगर : माझ्यामागे कोणत्याही अदृश्य शक्तीचा हात नाही. केवळ सर्वसामान्य मराठा समाज हीच आपली ताकद असल्याचे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी सायंकाळी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. संपादकीय सहकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरे देत मनमोकळा संवाद साधला.

मराठ्यांनाही तुम्ही ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण का मागत आहात, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही पहिल्यापासूनच ५० टक्क्यांच्या आतील ओबीसीमध्ये आहोत. शेती करणाऱ्या समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केलेला आहे. मराठा समाजाची उपजीविका शेतीवर आहे. त्यामुळे विदर्भ, खान्देश कोकणपट्टी, नाशिक ते शेवगावपर्यंतचा मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आहे. केवळ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. सरकारने आरक्षण देण्यासाठी आमच्याकडून पुरावे जमा करण्यासाठी एक महिन्याची मुदत घेतली होती. सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला पाच हजार पुरावे मिळाले. त्यामुळे समितीने काम थांबवावे, आणखी काय ट्रकभर पुरावे सरकारला लागतात काय? असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारने आता तत्काळ मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मागणी आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक वेगळाच मुद्दा उकरून काढतात. आता कंत्राटी नोकर भरतीचा जीआर काढल्याचे तेे म्हणाले. व्यक्ती म्हणून भुजबळांना विरोध नाही तर त्यांच्या विचारसरणीवर आपण टीका करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुमच्या मागे कोणती अदृश्य शक्ती आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सुरुवातीला विरोधक असल्याचा आरोप झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीच उपोषणाला बसविल्याचे बोलले गेले, पण खरं सांगतो आपल्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही. केवळ सामान्य मराठ्यांचा आक्रोश, संताप हीच आपली शक्ती आहे. आमच्या सभेला आलेल्या चार जणांचे अपघात झाले. या अपघातांना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत मराठा आरक्षणासाठी सरकार आणखी किती बळी घेणार, असा सवाल त्यांनी केला.

...तर २४ ऑक्टोबरनंतर सरकारला न पेलावणारे आंदोलन होईलअंतरवाली सराटी येथे उपोषण सोडविताना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने समाजाला ४० दिवसांची मुदत घेतली आहे. ही मुदत २४ ऑक्टोबरला संपत आहे. सरकारने जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय न घेतल्यास २४ पासून शांततेच्या मार्गाचे होणारे आंदोलन सरकारला न पेलवणारे असेल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार