शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

माझ्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही, मराठा समाजच माझी शक्ती: मनोज जरांगे

By बापू सोळुंके | Updated: October 17, 2023 12:13 IST

दिलेल्या वेळेत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला नाही तर २४ ऑक्टोबरनंतर सरकारला न पेलावणारे आंदोलन होईल

छत्रपती संभाजीनगर : माझ्यामागे कोणत्याही अदृश्य शक्तीचा हात नाही. केवळ सर्वसामान्य मराठा समाज हीच आपली ताकद असल्याचे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी सायंकाळी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. संपादकीय सहकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरे देत मनमोकळा संवाद साधला.

मराठ्यांनाही तुम्ही ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण का मागत आहात, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही पहिल्यापासूनच ५० टक्क्यांच्या आतील ओबीसीमध्ये आहोत. शेती करणाऱ्या समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केलेला आहे. मराठा समाजाची उपजीविका शेतीवर आहे. त्यामुळे विदर्भ, खान्देश कोकणपट्टी, नाशिक ते शेवगावपर्यंतचा मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आहे. केवळ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. सरकारने आरक्षण देण्यासाठी आमच्याकडून पुरावे जमा करण्यासाठी एक महिन्याची मुदत घेतली होती. सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला पाच हजार पुरावे मिळाले. त्यामुळे समितीने काम थांबवावे, आणखी काय ट्रकभर पुरावे सरकारला लागतात काय? असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारने आता तत्काळ मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मागणी आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक वेगळाच मुद्दा उकरून काढतात. आता कंत्राटी नोकर भरतीचा जीआर काढल्याचे तेे म्हणाले. व्यक्ती म्हणून भुजबळांना विरोध नाही तर त्यांच्या विचारसरणीवर आपण टीका करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुमच्या मागे कोणती अदृश्य शक्ती आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सुरुवातीला विरोधक असल्याचा आरोप झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीच उपोषणाला बसविल्याचे बोलले गेले, पण खरं सांगतो आपल्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही. केवळ सामान्य मराठ्यांचा आक्रोश, संताप हीच आपली शक्ती आहे. आमच्या सभेला आलेल्या चार जणांचे अपघात झाले. या अपघातांना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत मराठा आरक्षणासाठी सरकार आणखी किती बळी घेणार, असा सवाल त्यांनी केला.

...तर २४ ऑक्टोबरनंतर सरकारला न पेलावणारे आंदोलन होईलअंतरवाली सराटी येथे उपोषण सोडविताना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने समाजाला ४० दिवसांची मुदत घेतली आहे. ही मुदत २४ ऑक्टोबरला संपत आहे. सरकारने जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय न घेतल्यास २४ पासून शांततेच्या मार्गाचे होणारे आंदोलन सरकारला न पेलवणारे असेल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार