शहरं
Join us  
Trending Stories
1
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
2
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
3
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
4
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
5
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
6
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
7
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
8
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
9
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
10
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
11
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
12
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
13
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
14
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
15
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
16
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
17
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
18
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
19
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
20
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
Daily Top 2Weekly Top 5

...तर केंद्राकडे राज्यसरकार भाड्याने चालविण्यासाठी द्या; भाजपचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 16:17 IST

उठसूट सर्वच केंद्रशासनाकडे मागायचे असेल तर केंद्रशासनालाच हे सरकार भाड्याने चालविण्यासाठी देण्यात यावे, असा टोला भाजपाचे माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी लगावला.

ठळक मुद्देराज्याने मराठवाडा वॉटरग्रीडसाठी केंद्राकडे मागितले ११ हजार ५८२ कोटीकोरोनामुळे काही करता आले नाही, आगामी काळात पक्ष रस्त्यावर उतरेल.

औरंगाबाद: राज्य सरकारला मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना करण्याची इच्छा नाही. गुरूवारी मुंबईत मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत या योजनेबाबत ठोस असा निर्णय झाला नाही, उलट केंद्र शासनाकडेच ११ हजार ५८२ कोटींची मागणी महाविकास आघाडी सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे. उठसूट सर्वच केंद्रशासनाकडे मागायचे असेल तर केंद्र शासनालाच हे सरकार भाड्याने चालविण्यासाठी देण्यात यावे, असा टोला भाजपाचे माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत लगावला.

या योजनेसाठी हायकोर्टात जाण्याची तयारी केली असून वेळप्रसंगी अधिवशेनात देखील सरकारला जाब विचारण्यात येईल, असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले. आजवर तीन अधिवेशन झाले, परंतू या योजनेबाबत सरकारने काहीही निर्णय घेतला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे याेजनेबाबत शंका उपस्थित करतात. पश्चिम महाराष्ट्राने कायम मराठवाड्याला सापत्न वागणूक दिली आहे, त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा या योजनेला विरोध असल्याचा आरोप त्यांनी केला. योजनेला खीळ बसणे ही राष्ट्रवादीचे पाप असल्याचा आरोप करून आ.लोणीकर म्हणाले, आजवर १० डीपीआर झाले आहेत, परंतु सरकारने योजनेला पुढे नेले नाही. सर्व काही ठप्प ठेवले. कोरोनामुळे अडचणी असल्या तरी योजनेचे काम करण्याबाबत सकारत्मकता सरकारने दाखविली नाही. त्यामुळे ही योजना सरकारला राबवायचीच नाही. जे जलतज्ज्ञ ग्रीडला विराेध करीत आहेत. त्यांनी सगळे डीपीआर पुन्हा एकदा तपासून पहावेत. त्यानंतर कामाची डेडलाईन सरकारने ठरविली पाहिजे.

भाजप योजनेसाठी रस्त्यावर उतरेलगोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ, जलसंपदा, पाणीपुरवठाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात योजनेबाबत समन्वय नाही. सरकारकडे पैसा नाही, त्यामुळे केंद्राकडे अनुदान मागितले तर भाजपाने देखील पुढाकार घेतला पाहिजे, यावर आ.लोणीकर म्हणाले, केंद्राकडून मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, पण त्यासाठी महामंडळ, जलसंपदा, पाणीपुरवठा विभागात समन्वय ठेवण्याचे काम सरकारचे आहे. दीड वर्षापासून सरकार वेळ मारून नेत आहे. विभागात भाजपाचे १६ आमदार, ४ खासदार असतांना या योजनेसाठी पक्ष आजवर आग्रही का राहिला नाही, यावर लोणीकर म्हणाले, कोरोनामुळे काही करता आले नाही, आगामी काळात पक्ष रस्त्यावर उतरेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार