शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

...तर विमा कंपन्यांच्या स्वतंत्र पंचनाम्यांना लागणार वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:50 IST

विमा कंपनी प्रतिनिधींच्या बैठकीत विभागीय आयुक्तांनी केली कानउघाडणी 

ठळक मुद्देओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परवड  शेतकरी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना मदत करीत नसल्याचा आरोप

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४४ लाख ३३ हजार ५४९ शेतकऱ्यांच्या हाती आलेला खरीप हंगाम आॅक्टोबरच्या उत्तरार्धानंतर आणि नोव्हेंबर महिन्यातील पूर्वार्धात झालेल्या पावसाने हिरावून नेला. विमा कंपन्या शेतकऱ्यांची परवड करीत असून, स्वतंत्र पंचनामे करण्याची भूमिका काही कंपन्यांनी घेतली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विमा कंपनी प्रतिनिधींची याप्रकरणी कानउघाडणी केली आहे. दिवसाकाठी ३ ते ४ हजार पंचनामे कंपन्यांकडून होत असतील वर्षभर कंपन्यांना पंचनामे करण्यास जातील, तोपर्यंत शेतकऱ्यांनी कंपन्यांचे उंबरठे झिजवायचे काय? अशा शब्दात विमा कंपन्यांना आयुक्तांनी झापले. प्रशासकीय पंचनाम्यांच्या आधारे तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी विमा कंपन्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

विभागीय प्रशासनाने केलेले पीक नुकसानीचे पंचनामे गृहीत धरून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोबदल्याची तरतूद करण्यास तरी नकार दिल्याची माहिती समोर आल्यानंतर आयुक्तांनी सहा शासकीय आणि दोन खाजगी विमा कंपन्यांची गेल्या आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला. हिंगोली आणि जालना जिल्ह्यात बजाज अलियान्झ कंपनीने पीकविमा काढला आहे. विमा कंपन्यांची अरेरावी वाढल्याचे आयुक्तांच्या आढावा बैठकीत निदर्शनास आले. शेतकरी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना मदत करीत नसल्याचा आरोप काही कंपन्या करीत आहेत.

यावर विभागीय आयुक्तांनी प्रशासकीय पंचनाम्यांचा आधार घेऊन तातडीने मोबदल्याचा निर्णय घेण्याचे आदेश दिले. २२ लाख हेक्टरवरील नुकसानीचा सुरुवातीचा अंदाज आयुक्तांनी सूक्ष्म नियोजन करून केलेल्या पाहणीमुळे फोल ठरला. ४१ लाख ४० हजार १७५ हेक्टरवरील खरीप हंगामाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना या आधारेच मोबदला द्यावा लागेल. विमा कंपन्यांचे दावे पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या हाती मदत मिळण्यास थोडा विलंब होणार आहे. रबी पेरण्यांच्या काळात विम्याची रक्कम मिळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार विभागीय प्रशासनाने परतीच्या व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून २९०४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई विभागाला लागेल, असा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार केंद्रीय पथक पाहणीसाठी विभागात येईल. पथक येईपर्यंत शेतात नुकसानीचे दृृश्य नसेल, त्यासाठी प्रशासनाने आताच छायाचित्रे, व्हिडिओ शूटिंग करून ठेवले आहे. विमा कंपन्या ऐनवेळी नाटकं करतील, त्यासाठी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी खबरदारी घेत पूर्ण तपशील तयार करून ठेवण्याच्या सूचना यंत्रणेला केल्या आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयMarathwadaमराठवाडा