शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

यात देवेंद्रजींचं नाव खराब होतंय, सत्तारांवरुन आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 21:38 IST

शेवटी संस्कार आहेत, एखाद्या राज्यकर्त्याचा स्वत:च्या मंत्रिमंडळातील वचक कमी होतो, तेव्हा अशा गोष्टी घडतात.

शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. एकीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाबरावांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसही मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरुन रस्त्यावर उतरली आहे. आता, सत्तार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.  

शेवटी संस्कार आहेत, एखाद्या राज्यकर्त्याचा स्वत:च्या मंत्रिमंडळातील वचक कमी होतो, तेव्हा अशा गोष्टी घडतात. सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे, पहिल्यांदा शिवी दिली तर समजू शकतो की चुकून निघाली असेल. पण दुसऱ्यांदा तसंच बोलणं आणि त्या विधानावर ठाम राहणं. जर सरकारने यांचा राजीनामा घेतला नाही, यांना पदमुक्त केलं नाही, तर भाजप महिला सुरक्षितेबाबत गंभीर नाही, हा संदेश देशात जाईल, असे म्हणत आदित्य ठाकरेंनीअब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  

प्रकाश सुर्वे, गुलाबराव पाटील आणि आता अब्दुल सत्तार काहीही बोलत आहेत, मी जर मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असतो तर मी सरकारमधून बाहेर पडलो असतो. कारण, यात देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतंय. मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, त्यामुळे त्यांना सल्ला काय देणार. पण, देवेंद्रजींच्या जागी मी असतो तर सरकारमधून बाहेर पडलो असतो, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकावर निशाणा साधला. तसेच, ४० आमदारांना पुन्हा एकदा गद्दार म्हणत यांच्यावर कुठेही कारवाई होत नसल्याचेही आदित्य म्हणाले.  

अशी लोकं तुम्हाला हवी आहेत का?

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते चांगलेच संतापले आहेत. “आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मी उच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का?”, असे घाणेरडे लोकं तुम्हाला हवी आहेत का? जी लोकं महिलांना शिवीगाळ करतात. शेतकऱ्यांची मजा उडवतात. जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू पिता का?’ असं विचारतात, अशी लोकं तुम्हाला मंत्री म्हणून चालणार आहेत का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv Senaशिवसेना