शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

यात देवेंद्रजींचं नाव खराब होतंय, सत्तारांवरुन आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 21:38 IST

शेवटी संस्कार आहेत, एखाद्या राज्यकर्त्याचा स्वत:च्या मंत्रिमंडळातील वचक कमी होतो, तेव्हा अशा गोष्टी घडतात.

शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. एकीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाबरावांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसही मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरुन रस्त्यावर उतरली आहे. आता, सत्तार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.  

शेवटी संस्कार आहेत, एखाद्या राज्यकर्त्याचा स्वत:च्या मंत्रिमंडळातील वचक कमी होतो, तेव्हा अशा गोष्टी घडतात. सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे, पहिल्यांदा शिवी दिली तर समजू शकतो की चुकून निघाली असेल. पण दुसऱ्यांदा तसंच बोलणं आणि त्या विधानावर ठाम राहणं. जर सरकारने यांचा राजीनामा घेतला नाही, यांना पदमुक्त केलं नाही, तर भाजप महिला सुरक्षितेबाबत गंभीर नाही, हा संदेश देशात जाईल, असे म्हणत आदित्य ठाकरेंनीअब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  

प्रकाश सुर्वे, गुलाबराव पाटील आणि आता अब्दुल सत्तार काहीही बोलत आहेत, मी जर मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असतो तर मी सरकारमधून बाहेर पडलो असतो. कारण, यात देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतंय. मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, त्यामुळे त्यांना सल्ला काय देणार. पण, देवेंद्रजींच्या जागी मी असतो तर सरकारमधून बाहेर पडलो असतो, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकावर निशाणा साधला. तसेच, ४० आमदारांना पुन्हा एकदा गद्दार म्हणत यांच्यावर कुठेही कारवाई होत नसल्याचेही आदित्य म्हणाले.  

अशी लोकं तुम्हाला हवी आहेत का?

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते चांगलेच संतापले आहेत. “आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मी उच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का?”, असे घाणेरडे लोकं तुम्हाला हवी आहेत का? जी लोकं महिलांना शिवीगाळ करतात. शेतकऱ्यांची मजा उडवतात. जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू पिता का?’ असं विचारतात, अशी लोकं तुम्हाला मंत्री म्हणून चालणार आहेत का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv Senaशिवसेना