शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

...तर महाराष्ट्राचे वाळवंट

By admin | Updated: February 22, 2015 00:37 IST

उस्मानाबाद : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. हा दुष्काळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे सांगत,

उस्मानाबाद : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. हा दुष्काळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे सांगत, वनक्षेत्र झपाट्याने कमी होत असून, त्याचा फटका पर्जन्यमानावर बसला आहे. त्यामुळेच उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असून, याकडे कानाडोळा झाल्यास राजस्थानप्रमाणे महाराष्ट्राचेही वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही, असा गंभीर इशारा जलबिरादरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिला.तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन डॉ. सिंह यांच्या हस्ते जलयुक्त शिवार योजनेतील जलसाक्षरता दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, आ. मधुकर चव्हाण, आ. राणाजगजितसिंह पाटील, जि. प. अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याची गरज आहे. याकडे कानाडोळा झाल्यास मराठवाड्यासह महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेली पाणी बचत संकल्पना ही आपलीच आहे, असे प्रत्येकाने समजून पाण्याची बचत करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करून कृषी मालाचे उत्पादन वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा. याबरोबरच कृषी विभागाने शेतकऱ्यांशी संवाद साधून जलशिवार योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोंचवावी. जलशिवारांची कामे नागरिकांना विश्वासात घेऊन केल्यास लोकसहभाग वाढेल, असा विश्वासही डॉ. सिंह यांनी व्यक्त केला. राजस्थानमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी गाव पातळीवरील लोकांच्या सूचनेनुसार आराखडा तयार करण्यात येतो. यातून पाण्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात आले. त्यामुळेच तेथील दुष्काळावर मात करणे शक्य झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, प्रारंभी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते तुळजाभवानीची प्रतिमा देवून डॉ. राजेंद्र सिंह यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)