शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

...तर महाराष्ट्राचे वाळवंट

By admin | Updated: February 22, 2015 00:37 IST

उस्मानाबाद : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. हा दुष्काळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे सांगत,

उस्मानाबाद : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. हा दुष्काळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे सांगत, वनक्षेत्र झपाट्याने कमी होत असून, त्याचा फटका पर्जन्यमानावर बसला आहे. त्यामुळेच उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असून, याकडे कानाडोळा झाल्यास राजस्थानप्रमाणे महाराष्ट्राचेही वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही, असा गंभीर इशारा जलबिरादरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिला.तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन डॉ. सिंह यांच्या हस्ते जलयुक्त शिवार योजनेतील जलसाक्षरता दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, आ. मधुकर चव्हाण, आ. राणाजगजितसिंह पाटील, जि. प. अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याची गरज आहे. याकडे कानाडोळा झाल्यास मराठवाड्यासह महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेली पाणी बचत संकल्पना ही आपलीच आहे, असे प्रत्येकाने समजून पाण्याची बचत करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करून कृषी मालाचे उत्पादन वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा. याबरोबरच कृषी विभागाने शेतकऱ्यांशी संवाद साधून जलशिवार योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोंचवावी. जलशिवारांची कामे नागरिकांना विश्वासात घेऊन केल्यास लोकसहभाग वाढेल, असा विश्वासही डॉ. सिंह यांनी व्यक्त केला. राजस्थानमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी गाव पातळीवरील लोकांच्या सूचनेनुसार आराखडा तयार करण्यात येतो. यातून पाण्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात आले. त्यामुळेच तेथील दुष्काळावर मात करणे शक्य झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, प्रारंभी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते तुळजाभवानीची प्रतिमा देवून डॉ. राजेंद्र सिंह यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)