शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

...तर महाराष्ट्राचे वाळवंट

By admin | Updated: February 22, 2015 00:37 IST

उस्मानाबाद : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. हा दुष्काळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे सांगत,

उस्मानाबाद : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. हा दुष्काळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे सांगत, वनक्षेत्र झपाट्याने कमी होत असून, त्याचा फटका पर्जन्यमानावर बसला आहे. त्यामुळेच उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असून, याकडे कानाडोळा झाल्यास राजस्थानप्रमाणे महाराष्ट्राचेही वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही, असा गंभीर इशारा जलबिरादरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिला.तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन डॉ. सिंह यांच्या हस्ते जलयुक्त शिवार योजनेतील जलसाक्षरता दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, आ. मधुकर चव्हाण, आ. राणाजगजितसिंह पाटील, जि. प. अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याची गरज आहे. याकडे कानाडोळा झाल्यास मराठवाड्यासह महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेली पाणी बचत संकल्पना ही आपलीच आहे, असे प्रत्येकाने समजून पाण्याची बचत करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करून कृषी मालाचे उत्पादन वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा. याबरोबरच कृषी विभागाने शेतकऱ्यांशी संवाद साधून जलशिवार योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोंचवावी. जलशिवारांची कामे नागरिकांना विश्वासात घेऊन केल्यास लोकसहभाग वाढेल, असा विश्वासही डॉ. सिंह यांनी व्यक्त केला. राजस्थानमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी गाव पातळीवरील लोकांच्या सूचनेनुसार आराखडा तयार करण्यात येतो. यातून पाण्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात आले. त्यामुळेच तेथील दुष्काळावर मात करणे शक्य झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, प्रारंभी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते तुळजाभवानीची प्रतिमा देवून डॉ. राजेंद्र सिंह यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)