शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

...तर अनधिकृत घरांवर १ नोव्हेंबरपासून बुलडोझर; मनपा प्रशासक पाण्डेय यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 17:41 IST

Aurangabad Municipal Corporation महाराष्ट्र शासनाने शहरातील अनधिकृत घरे, प्लॉट अधिकृत करण्यासाठी विशेष बाब म्हणून गुंठेवारी योजना आणली. ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची अनधिकृत घरे, प्लॉट गुंठेवारी कायद्यानुसार नियमित होणार आहेत.

ठळक मुद्देगुंठेवारी कायद्यानुसार मनपाकडे आतापर्यंत ८३४ प्रस्ताव दाखल झाले आहेत.

औरंगाबाद : शहरातील नागरिकांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत आपली घरे अधिकृत करून घेण्यासाठी प्रस्ताव दाखल केले नाहीत तर १ नोव्हेंबरपासून ( bulldozers on unauthorized houses from November 1) त्यावर बुलडोझर फिरवण्यात येईल, अशी खळबळजनक घोषणा मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी केली. शहरातील अनधिकृत घरांचा आकडा किमान दोन लाख सांगितला जातो. आतापर्यंत महापालिकेकडे ( Aurangabad Municipal Corporation ) केवळ ८३४ जणांनी प्रस्ताव दाखल केले आहेत.

महाराष्ट्र शासनाने शहरातील अनधिकृत घरे, प्लॉट अधिकृत करण्यासाठी विशेष बाब म्हणून गुंठेवारी योजना आणली. ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची अनधिकृत घरे, प्लॉट गुंठेवारी कायद्यानुसार नियमित होणार आहेत. बांधकाम अधिकृत करून देण्यासाठी मनपाकडून रेडीरेकनरनुसार दर आकारले जात आहेत. ६०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामाला अधिकृत करण्यासाठी किमान दीड लाखांपर्यंत खर्च येत आहे. गुंठेवारी फाइल तयार करण्यासाठी मनपाने ५२ वास्तुविशारद नेमले आहेत. नागरिकांनी वास्तुविशारदांना एक रुपयाही फी देण्याची गरज नाही, ती महापालिका देणार आहे. अनधिकृत घरांची फाइल ३१ ऑक्टोबरपर्यंत दाखल करण्याची मुभा असून, महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालयात फाइल स्वीकारण्याची सोय केली आहे. शहरातील लोकप्रतिनिधींच्या कार्यालयातही स्वतंत्रपणे कॅम्प घेण्यात येतील, असे पाण्डेय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागरिकांनी नियोजित वेळेत या सुवर्णसंधीचा लाभ घेतला नाही तर १ नोव्हेंबरला मनपा मुख्यालयातून एक जेसीबी, बुलडोझर शहरात निघणार आहे. किमान १ तरी मालमत्ता पाडूनच हे बुलडोझर परत येईल, असा गर्भित इशारा प्रशासक पाण्डेय यांनी दिला.

८३४ प्रस्ताव प्राप्तगुंठेवारी कायद्यानुसार मनपाकडे आतापर्यंत ८३४ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यातील ४८० नागरिकांनी चार कोटी ४४ लाख १३ हजार ३६२ रुपये मनपाकडे भरले आहेत. ३५४ जणांनी अद्याप पैसे भरलेले नाहीत, असे गुंठेवारी कक्ष प्रमुख उपअभियंता संजय चामले यांनी सांगितले.

ग्रीन झोनचा प्रश्न गंभीरशहरातील सुमारे ३० ते ४० वसाहती ग्रीन झोनमध्ये आहेत. येथील घरे अधिकृत करण्याची गुंठेवारी कायद्यात तरतूद नाही. तेथील नागरिकांकडून वारंवार विचारणा होत आहे. ही बांधकामे कोणत्या नियमानुसार अधिकृत करावी याबद्दल महापालिकेच्या नगररचना विभागाकडून राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहेे; पण अजून उत्तर आलेले नाही, असे चामले यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण