शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

भंडारदऱ्याची सहल ठरली काळरात्र; औरंगाबादच्या दोघांना ओढ्यात कारसह जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:58 IST

पेंडशेत जात असताना रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले होते. पुढे ओढ्याला पूर आलेला होता. हा ओढा कारमधील या तिघांना दिसला नाही. त्यांनी कार पाण्यात घातली व पुराच्या लोंढ्यात ते वाहून जाऊ लागले.

औरंगाबाद : भंडारदरा येथे सहलीसाठी गेलेल्या औरंगाबादेतील तीन वकिलांची कार ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने दोघांना जलसमाधी मिळाली. एकाने प्रसंगावधान राखून कारमधून उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला. कोल्हार घोटी (ता. अकोले, जि. अहमदनगर) रस्त्यावरील वारंघुशी ते पेंडशेतदरम्यान शुक्रवारी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. घटनास्थळ दुर्गम असल्याने राजूर पोलिसांना तेथे पोहोचण्यास रात्री ११ वाजले होते. ॲड. आशिष प्रभाकर पालोदकर (३४, रा. पालोद, ता. सिल्लोड), रमाकांत प्रभाकर देशमुख (३४, रा. ताडपिंपळगाव, ता. कन्नड), अशी मृतांची नावे आहेत, तर ॲड. अनंता रामराव मगर (रा. शिंगी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) हे यातून सुदैवाने बचावले. ॲड. आशिष पालोदकर हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस नेते प्रभाकर पालोकदर यांचे धाकटे चिरंजीव होत.

राजूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील तीन पर्यटक भंडारदरा येथे कारने शुक्रवारी गेले होते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ते वारंघुशी ते पेंडशेत जात असताना रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले होते. पुढे ओढ्याला पूर आलेला होता. हा ओढा कारमधील या तिघांना दिसला नाही. त्यांनी कार पाण्यात घातली व पुराच्या लोंढ्यात ते वाहून जाऊ लागले. प्रसंगावधान राखून ॲड. अनंता यांनी कारमधून उडी घेतल्याने ते वाचले, तर ॲड. आशिष आणि रमाकांत हे कारसह वाहून गेले. याच वेळी तेथून आणखी एक जण वाहून गेल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून काही अंतरावरच आशिष आणि रमाकांत यांचे मृतदेह पोलिसांना सापडले. हे मृतदेह पोलिसांनी राजूरच्या शासकीय रुग्णालयात हलविले.

आधार कार्डमुळे पटली ओळखपोलिसांना तेथे दोन मृतदेह आढळले होते. ॲड. अनंता हे मृत्यूच्या दाढेतून परत आल्याने ते प्रचंड घाबरले होते. त्यांना मृतांची नावेही सांगता येत नव्हती. पोलिसांना मृतांच्या पँटच्या खिशातील पाकिटात त्यांचे आधार कार्ड आढळले. या आधार कार्डांमुळे दोघांची ओळख पटविण्यात यश आल्याचे राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितले.

ट्रॅक्टर- जेसीबीने ओढून काढली कारपर्यटकांसह कार ओढ्यात वाहून गेल्याचे कळताच प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि राजूर पोलिसांनी जेसीबी, ट्रॅक्टरने ही कार ओढून बाहेर काढली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. कारमधील ॲड. आशिष आणि रमाकांतचे निधन झाले होते. ही कार बाहेर काढण्यासाठी सपोनि साबळे, कर्मचारी दिलीप डगळे, अशोक गाडे, अशोक काळे यांच्यासह प्रत्यक्षदर्शींनी मदत केली.

आशिष अविवाहित...अपघातात मृत्युमुखी पडलेले ॲड. आशिष पालोदकर हे अविवाहित आहेत. ते खडकेश्वर येथे आई, वडिलांसह राहत होते व जिल्हा कोर्टात वकिली करीत होते, तर रमाकांत देशमुख हे विवाहित असून शेती करायचे. त्यांना मुलगा, मुलगी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूtourismपर्यटन