शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

दुपारपर्यंत शाळा भरविण्यासाठी शिक्षक संघटना आक्रमक

By राम शिनगारे | Updated: March 20, 2024 11:26 IST

विभागीय आयुक्तांना निवेदन : शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा चढल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे जिल्ह्यातील शाळांचे वर्ग दुपारपर्यंतच भरविण्याची मागणी करणारे निवेदन शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांना मंगळवारी दिले. सध्या वातावरणात पाहिजे तसा बदल झालेला नसल्यामुळे शाळेच्या वेळेत कोणताही बदल करू नये, असे आदेश जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. त्यानंतर शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली.

जिल्ह्यात एकूण ४२०० शाळा आहेत. त्यात जि. प.च्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची संख्या २१३० इतकी आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या शाळांमध्ये एकूण ९ लाख १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. दरवर्षी उन्हाचा पारा वाढला की शाळांच्या वेळेत बदल करुन त्या सकाळच्या वेळेत अर्धवेळ भरविल्या जातात. यावर्षीही शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काही दिवसांपूर्वी विभागातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवून योग्य निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार काही जिल्हा परिषदांनी सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यास सुरुवात केली. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सीईओ विकास मीना यांनी १८ मार्च रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शाळेच्या वेळेत कोणताही बदल न करण्याचे आदेश दिले. तसेच परस्पर शाळेच्या वेळेत बदल केल्याचे आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्यावर कार्यवाहीचा प्रस्ताव सीईओ कार्यालयास तत्काळ सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशाच्या विरोधात शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांना शाळांच्या वेळेत बदल करण्याचे निवेदन दिले आहे.

विभागीय आयुक्तांना निवेदन

शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांना ग्रामीण भागात पाणीटंचाई असून, उन्हाचा पारा ३६ अंशांवर गेला आहे. जि. प.च्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक शाळा पत्र्याच्या आहेत. या शाळांत पंख्यांची सोय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. अनेक वर्षांपासून जि. प.च्या शाळा १६ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्यात येतात. हाच नियम कायम ठेवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर दिलीप ढाकणे, राजेश भुसारी, विठ्ठल बदर, श्रीराम बोचरे, महेंद्र बारवाल, बाबूलाल राठोड, गणेश शेळके, सुनील जाधव, संतोष पाटील, मनोहर गावंडे, गणेश पिंपळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सीईओंची जि. प. शाळेला भेटसीईओ विकास मीना यांनी जिल्ह्यातील पाबळ तांडा येथील जि. प. शाळेला अचानक भेट देऊन तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गणित विषय शिकविला.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद