शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दुपारपर्यंत शाळा भरविण्यासाठी शिक्षक संघटना आक्रमक

By राम शिनगारे | Updated: March 20, 2024 11:26 IST

विभागीय आयुक्तांना निवेदन : शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा चढल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे जिल्ह्यातील शाळांचे वर्ग दुपारपर्यंतच भरविण्याची मागणी करणारे निवेदन शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांना मंगळवारी दिले. सध्या वातावरणात पाहिजे तसा बदल झालेला नसल्यामुळे शाळेच्या वेळेत कोणताही बदल करू नये, असे आदेश जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. त्यानंतर शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली.

जिल्ह्यात एकूण ४२०० शाळा आहेत. त्यात जि. प.च्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची संख्या २१३० इतकी आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या शाळांमध्ये एकूण ९ लाख १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. दरवर्षी उन्हाचा पारा वाढला की शाळांच्या वेळेत बदल करुन त्या सकाळच्या वेळेत अर्धवेळ भरविल्या जातात. यावर्षीही शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काही दिवसांपूर्वी विभागातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवून योग्य निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार काही जिल्हा परिषदांनी सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यास सुरुवात केली. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सीईओ विकास मीना यांनी १८ मार्च रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शाळेच्या वेळेत कोणताही बदल न करण्याचे आदेश दिले. तसेच परस्पर शाळेच्या वेळेत बदल केल्याचे आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्यावर कार्यवाहीचा प्रस्ताव सीईओ कार्यालयास तत्काळ सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशाच्या विरोधात शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांना शाळांच्या वेळेत बदल करण्याचे निवेदन दिले आहे.

विभागीय आयुक्तांना निवेदन

शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांना ग्रामीण भागात पाणीटंचाई असून, उन्हाचा पारा ३६ अंशांवर गेला आहे. जि. प.च्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक शाळा पत्र्याच्या आहेत. या शाळांत पंख्यांची सोय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. अनेक वर्षांपासून जि. प.च्या शाळा १६ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्यात येतात. हाच नियम कायम ठेवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर दिलीप ढाकणे, राजेश भुसारी, विठ्ठल बदर, श्रीराम बोचरे, महेंद्र बारवाल, बाबूलाल राठोड, गणेश शेळके, सुनील जाधव, संतोष पाटील, मनोहर गावंडे, गणेश पिंपळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सीईओंची जि. प. शाळेला भेटसीईओ विकास मीना यांनी जिल्ह्यातील पाबळ तांडा येथील जि. प. शाळेला अचानक भेट देऊन तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गणित विषय शिकविला.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद