शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

पावसाचे बळ वाढेना, बळीराजाचे डोळे आकाशाकडे, पेरण्या खोळंबल्या

By बापू सोळुंके | Updated: June 20, 2024 17:36 IST

यावर्षी वेळेवर आणि मुबलक पाऊस पडणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. मात्र तसे झाले नाही.

छत्रपती संभाजीनगर : हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरणीची जय्यत तयारी केली. मात्र आजपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडला नाही. परिणामी जिल्ह्यातील एकूण क्षेत्राच्या केवळ २२ टक्के पेरणी झाली. मृग नक्षत्र सुरू होऊन १२ दिवस उलटले. सुरुवातीला तीन-चार दिवस आलेल्या पावसाने आता आठवड्यापासून उघडीप दिली. 

पैठण, कन्नड आणि फुलंब्री तालुक्यातील काही मंडळात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली. उर्वरित मंडळात मात्र शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले. जिल्ह्यातील एकूण लागवडलायक क्षेत्रांपैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होते. मागील १५ दिवसांत आजपर्यंत केवळ २२ टक्केच क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. तर पेरणी केवळ १६ टक्के झाली. माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली. यात सर्वाधिक कापसाची लागवड झाल्याचे दिसून येते.

पिके पाण्याअभावी होरपळून गेलीयावर्षी वेळेवर आणि मुबलक पाऊस पडणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. मात्र तसे झाले नाही. एकदा पाऊस झाल्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे आमचं खूप नुकसान झाले आहे. यापूर्वी पेरलेले मूग पिके पाण्याअभावी होरपळून गेली आहे. आता पुन्हा नव्याने पेरणी करावी लागेल.-योगेश भागीनाथ गोटे, शेतकरी चिकलठाणा.

पुन्हा पेरणी करावी लागेलचिकलठाणा शिवारात आमची शेती आहे. तेथे काही दिवसापूर्वी सोयाबीन, मका पेरणी केली. तसेच कापसाची लागवड केली. आता पिके उगवली आणि पावसाची खूप गरज आहे, अन्यथा पुन्हा पेरणी करावी लागेल.- कारभारी भागीनाथ गोटे, शेतकरी.

पावसासाठी देवाकडे प्रार्थना चिकलठाणा परिसरात आठ दिवसापूर्वी पाऊस पडला. यानंतर आम्ही पेरणी केली. आता पिके उगवू लागल्याने पावसाची गरज आहे. जोरदार पाऊस पडावा, यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करीत आहोत. - अजय नवपुते, शेतकरी

 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र