शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पावसाचे बळ वाढेना, बळीराजाचे डोळे आकाशाकडे, पेरण्या खोळंबल्या

By बापू सोळुंके | Updated: June 20, 2024 17:36 IST

यावर्षी वेळेवर आणि मुबलक पाऊस पडणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. मात्र तसे झाले नाही.

छत्रपती संभाजीनगर : हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरणीची जय्यत तयारी केली. मात्र आजपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडला नाही. परिणामी जिल्ह्यातील एकूण क्षेत्राच्या केवळ २२ टक्के पेरणी झाली. मृग नक्षत्र सुरू होऊन १२ दिवस उलटले. सुरुवातीला तीन-चार दिवस आलेल्या पावसाने आता आठवड्यापासून उघडीप दिली. 

पैठण, कन्नड आणि फुलंब्री तालुक्यातील काही मंडळात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली. उर्वरित मंडळात मात्र शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले. जिल्ह्यातील एकूण लागवडलायक क्षेत्रांपैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होते. मागील १५ दिवसांत आजपर्यंत केवळ २२ टक्केच क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. तर पेरणी केवळ १६ टक्के झाली. माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली. यात सर्वाधिक कापसाची लागवड झाल्याचे दिसून येते.

पिके पाण्याअभावी होरपळून गेलीयावर्षी वेळेवर आणि मुबलक पाऊस पडणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. मात्र तसे झाले नाही. एकदा पाऊस झाल्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे आमचं खूप नुकसान झाले आहे. यापूर्वी पेरलेले मूग पिके पाण्याअभावी होरपळून गेली आहे. आता पुन्हा नव्याने पेरणी करावी लागेल.-योगेश भागीनाथ गोटे, शेतकरी चिकलठाणा.

पुन्हा पेरणी करावी लागेलचिकलठाणा शिवारात आमची शेती आहे. तेथे काही दिवसापूर्वी सोयाबीन, मका पेरणी केली. तसेच कापसाची लागवड केली. आता पिके उगवली आणि पावसाची खूप गरज आहे, अन्यथा पुन्हा पेरणी करावी लागेल.- कारभारी भागीनाथ गोटे, शेतकरी.

पावसासाठी देवाकडे प्रार्थना चिकलठाणा परिसरात आठ दिवसापूर्वी पाऊस पडला. यानंतर आम्ही पेरणी केली. आता पिके उगवू लागल्याने पावसाची गरज आहे. जोरदार पाऊस पडावा, यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करीत आहोत. - अजय नवपुते, शेतकरी

 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र