शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

पावसाचे बळ वाढेना, बळीराजाचे डोळे आकाशाकडे, पेरण्या खोळंबल्या

By बापू सोळुंके | Updated: June 20, 2024 17:36 IST

यावर्षी वेळेवर आणि मुबलक पाऊस पडणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. मात्र तसे झाले नाही.

छत्रपती संभाजीनगर : हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरणीची जय्यत तयारी केली. मात्र आजपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडला नाही. परिणामी जिल्ह्यातील एकूण क्षेत्राच्या केवळ २२ टक्के पेरणी झाली. मृग नक्षत्र सुरू होऊन १२ दिवस उलटले. सुरुवातीला तीन-चार दिवस आलेल्या पावसाने आता आठवड्यापासून उघडीप दिली. 

पैठण, कन्नड आणि फुलंब्री तालुक्यातील काही मंडळात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली. उर्वरित मंडळात मात्र शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले. जिल्ह्यातील एकूण लागवडलायक क्षेत्रांपैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होते. मागील १५ दिवसांत आजपर्यंत केवळ २२ टक्केच क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. तर पेरणी केवळ १६ टक्के झाली. माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली. यात सर्वाधिक कापसाची लागवड झाल्याचे दिसून येते.

पिके पाण्याअभावी होरपळून गेलीयावर्षी वेळेवर आणि मुबलक पाऊस पडणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. मात्र तसे झाले नाही. एकदा पाऊस झाल्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे आमचं खूप नुकसान झाले आहे. यापूर्वी पेरलेले मूग पिके पाण्याअभावी होरपळून गेली आहे. आता पुन्हा नव्याने पेरणी करावी लागेल.-योगेश भागीनाथ गोटे, शेतकरी चिकलठाणा.

पुन्हा पेरणी करावी लागेलचिकलठाणा शिवारात आमची शेती आहे. तेथे काही दिवसापूर्वी सोयाबीन, मका पेरणी केली. तसेच कापसाची लागवड केली. आता पिके उगवली आणि पावसाची खूप गरज आहे, अन्यथा पुन्हा पेरणी करावी लागेल.- कारभारी भागीनाथ गोटे, शेतकरी.

पावसासाठी देवाकडे प्रार्थना चिकलठाणा परिसरात आठ दिवसापूर्वी पाऊस पडला. यानंतर आम्ही पेरणी केली. आता पिके उगवू लागल्याने पावसाची गरज आहे. जोरदार पाऊस पडावा, यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करीत आहोत. - अजय नवपुते, शेतकरी

 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र