शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महापालिकेत एक फाइल फिरते ४० टेबलांवरून; फाइलींचे ‘टप्पे’ अन् ‘टक्के’ होणार कमी!

By मुजीब देवणीकर | Updated: May 16, 2023 14:29 IST

विकासकामांची एक फाइल फिरते ४० टेबलांवरून

छत्रपती संभाजीनगर : शहराचे सरकार अशी ओळख असलेल्या महापालिका प्रशासनाने आपल्या कामकाजात आमूलाग्र बदल करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. येथे विकासकामांची एक फाइल तब्बल ४० टेबलांवरून फिरते. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी वाट पाहावी लागते. फाइलींचे ‘टप्पे’ आणि ‘टक्के’ कसे कमी करता येतील, यादृष्टीने प्रशासनाने काम सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागरिकांची कामे लवकरात लवकर व्हावीत, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे.

शहरातील १८ लाख नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. नागरिकांना सोयीसुविधा देताना बोगस कामे, बिले मंजूर होऊ नयेत यासाठी प्रशासनाने प्रत्येक फाइलचा प्रवास थोडा लांबलचक ठेवला. वर्षानुवर्षे याच पद्धतीने अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार काम करीत आहेत. एका विकासकामाचे अंदाजपत्रक तयार होऊन काम पूर्ण होईपर्यंत जवळपास २० टेबलांवर मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी किमान अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. काम झाल्यानंतर पुन्हा त्याच २० टेबलांवरून बिल न्यावे लागते. नवनियुक्त प्रशासकांनी मागील आठवड्यात कामकाजाचा आढावा घेतला. त्यात फाइलींचा प्रवास कसा होतो हे त्यांच्या निदर्शनास आले. फाइलींचे ‘टप्पे’ कमी झाले तर आपोआप ‘टक्के’ही कमी होतात. बिल मंजुरीसाठी प्रत्येक टेबलवर ‘टक्का’ द्यावाच लागतो. त्यादृष्टीने काही तज्ज्ञ अधिकारी कामाची पद्धत बदलण्यासाठी अभ्यास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कामाच्या मंजुरीचा प्रवासकनिष्ठ अभियंता कामाचे अंदाजपत्रक तयार करतो. उपअभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा लिपिक, लेखाधिकारी, मुख्य लेखाधिकारी, तांत्रिक कक्ष, अतिरिक्त आयुक्त, १५ लाखांपेक्षा मोठे काम असेल तर आयुक्तांची मंजुरी आवश्यक आहे. त्यानंतर ई-निविदा प्रसिद्धी, पात्र कंत्राटदाराची निवड करण्यासाठी वॉर्ड लिपिक, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, लेखा लिपिक, लेखाधिकारी, मुख्य लेखाधिकारी, अतिरिक्त आयुक्त आणि १५ लाखांपेक्षा मोठे काम असल्यास आयुक्तांची सही.

काम झाल्यानंतरचा प्रवासविकासकामांचे बिल मंजूर करण्यासाठी लिपिक, कनिठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा लिपिक, लेखाधिकारी, मुख्य लेखाधिकारी, तांत्रिक कक्ष, अतिरिक्त आयुक्त आणि गरज असेल तर आयुक्तांची सही आवश्यक आहे.

दरवर्षी २०० कोटींची कामेमहापालिकेच्या निधीतून दरवर्षी २०० कोटी रुपयांची छोटी-मोठी विकासकामे शहरात करण्यात येतात. विविध शासन योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वेगळी कामे करण्यात येतात.

अत्यावश्यक कामांची अडचणमहापालिकेच्या या पद्धतीमुळे अत्यावश्यक कामे खोळंबतात. ड्रेनेज लाइन बदलणे, दूषित पाणीपुरवठा, पॅचवर्क, औषध खरेदी आदी अनेक ठिकाणी मंजुरीशिवाय कामच करता येत नाही. आणीबाणी कायद्याचा बराच दुरुपयोग झाल्याने सध्या त्यानुसारही कामे बंद आहेत.

काय म्हणाले तज्ज्ञ?कामनिहाय अर्थसंकल्पात विकासकामांची तरतूद केली तर लेखा विभागाला फाइल जाणारच नाही. काही टप्पे आणखी सहजपणे कमी करता येऊ शकतात. काम अतिरिक्त झाले तर मंजुरीसाठी लेखा विभागात फाइल गेली पाहिजे. कामाची पद्धतच चुकीची आहे. विकासकामांसाठी स्वतंत्र लेखा विभाग असायला हवा.- सी. एस. सोनी, निवृत्त शहर अभियंता, मनपा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका