शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

महापालिकेत एक फाइल फिरते ४० टेबलांवरून; फाइलींचे ‘टप्पे’ अन् ‘टक्के’ होणार कमी!

By मुजीब देवणीकर | Updated: May 16, 2023 14:29 IST

विकासकामांची एक फाइल फिरते ४० टेबलांवरून

छत्रपती संभाजीनगर : शहराचे सरकार अशी ओळख असलेल्या महापालिका प्रशासनाने आपल्या कामकाजात आमूलाग्र बदल करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. येथे विकासकामांची एक फाइल तब्बल ४० टेबलांवरून फिरते. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी वाट पाहावी लागते. फाइलींचे ‘टप्पे’ आणि ‘टक्के’ कसे कमी करता येतील, यादृष्टीने प्रशासनाने काम सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागरिकांची कामे लवकरात लवकर व्हावीत, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे.

शहरातील १८ लाख नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. नागरिकांना सोयीसुविधा देताना बोगस कामे, बिले मंजूर होऊ नयेत यासाठी प्रशासनाने प्रत्येक फाइलचा प्रवास थोडा लांबलचक ठेवला. वर्षानुवर्षे याच पद्धतीने अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार काम करीत आहेत. एका विकासकामाचे अंदाजपत्रक तयार होऊन काम पूर्ण होईपर्यंत जवळपास २० टेबलांवर मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी किमान अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. काम झाल्यानंतर पुन्हा त्याच २० टेबलांवरून बिल न्यावे लागते. नवनियुक्त प्रशासकांनी मागील आठवड्यात कामकाजाचा आढावा घेतला. त्यात फाइलींचा प्रवास कसा होतो हे त्यांच्या निदर्शनास आले. फाइलींचे ‘टप्पे’ कमी झाले तर आपोआप ‘टक्के’ही कमी होतात. बिल मंजुरीसाठी प्रत्येक टेबलवर ‘टक्का’ द्यावाच लागतो. त्यादृष्टीने काही तज्ज्ञ अधिकारी कामाची पद्धत बदलण्यासाठी अभ्यास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कामाच्या मंजुरीचा प्रवासकनिष्ठ अभियंता कामाचे अंदाजपत्रक तयार करतो. उपअभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा लिपिक, लेखाधिकारी, मुख्य लेखाधिकारी, तांत्रिक कक्ष, अतिरिक्त आयुक्त, १५ लाखांपेक्षा मोठे काम असेल तर आयुक्तांची मंजुरी आवश्यक आहे. त्यानंतर ई-निविदा प्रसिद्धी, पात्र कंत्राटदाराची निवड करण्यासाठी वॉर्ड लिपिक, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, लेखा लिपिक, लेखाधिकारी, मुख्य लेखाधिकारी, अतिरिक्त आयुक्त आणि १५ लाखांपेक्षा मोठे काम असल्यास आयुक्तांची सही.

काम झाल्यानंतरचा प्रवासविकासकामांचे बिल मंजूर करण्यासाठी लिपिक, कनिठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा लिपिक, लेखाधिकारी, मुख्य लेखाधिकारी, तांत्रिक कक्ष, अतिरिक्त आयुक्त आणि गरज असेल तर आयुक्तांची सही आवश्यक आहे.

दरवर्षी २०० कोटींची कामेमहापालिकेच्या निधीतून दरवर्षी २०० कोटी रुपयांची छोटी-मोठी विकासकामे शहरात करण्यात येतात. विविध शासन योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वेगळी कामे करण्यात येतात.

अत्यावश्यक कामांची अडचणमहापालिकेच्या या पद्धतीमुळे अत्यावश्यक कामे खोळंबतात. ड्रेनेज लाइन बदलणे, दूषित पाणीपुरवठा, पॅचवर्क, औषध खरेदी आदी अनेक ठिकाणी मंजुरीशिवाय कामच करता येत नाही. आणीबाणी कायद्याचा बराच दुरुपयोग झाल्याने सध्या त्यानुसारही कामे बंद आहेत.

काय म्हणाले तज्ज्ञ?कामनिहाय अर्थसंकल्पात विकासकामांची तरतूद केली तर लेखा विभागाला फाइल जाणारच नाही. काही टप्पे आणखी सहजपणे कमी करता येऊ शकतात. काम अतिरिक्त झाले तर मंजुरीसाठी लेखा विभागात फाइल गेली पाहिजे. कामाची पद्धतच चुकीची आहे. विकासकामांसाठी स्वतंत्र लेखा विभाग असायला हवा.- सी. एस. सोनी, निवृत्त शहर अभियंता, मनपा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका