शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद; शेजारील राष्ट्रांना संरक्षण मंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 12:25 IST

'जगातल्या एकाही पंतप्रधानांना जे जमले, ते आपल्या पंतप्रधानांनी करून दाखविले'

छत्रपती संभाजीनगर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यात दोन्ही शेजारील राष्ट्रांना आरपारचा इशारा दिला असून वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद भारतीय सैनिकांमध्ये आहे, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. रेल्वेस्टेशनजवळील अयोध्यानगरी मैदानावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहरात आले होते. त्यांनी जमलेल्या हजारो जनसमुदायाला ‘ए मेरे कुुटुंब के लोगो’ या शब्दाने साद दिली.

ते म्हणाले, आजदेखील हल्दी घाटी असेल की गलवान घाटी. शत्रूंच्या कारवायापुढे भारताची मान ना कधी झुकली ना यापुढे कधी झुकणार नाही. शेजारील चीन राष्ट्राने चीनने गलवान घाटीत जे केले, ते संतापजनक होते. आम्ही कुणाला छेडणार नाही, पण जो कोणी आम्हाला छेडेल, त्याला सोडणार नाही, हा आपला संकल्प आहे. ही प्रेरणा आम्हाला महाराणा प्रतापसिंह यांच्यापासून मिळाली आहे.दुसरा शेजारचा राष्ट्र दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तो यात कधीही यशस्वी होणार नाही. आम्ही शत्रूला इकडेही मारू शकतो आणि गरज पडली तर त्यांच्या देशात घुसूनदेखील मारू शकतो, असा संदेश आपल्या सैनिकांना दिला. हीच आहे भारताची ताकत, असे राजनाथ म्हणाले.

संरक्षणमंत्री झाल्यानंतर जे चित्र होते ते नवल करणारे होते. भारतीय सेनेसाठी रायफल, टँक, बाॅम्ब, मिसाइल हे दुसऱ्या देशातून आयात केले जात होते. पंतप्रधानांनी निर्णय घेतला की, यापुढे टँक, बॉम्ब, मिसाइल जे काही असेल, ती सारी शस्त्रे आता आपल्याच देशात तयार केले जातील. सन २०१४ पूर्वी जगातील देशांना आपण ९०० कोटी रुपयांची शस्त्रे निर्यात करत होतो. आता १६ हजार कोटींहून अधिक रुपयांची शस्त्रे निर्यात दुसऱ्या देशांना करत आहोत. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू होते तेव्हा तिकडे २३ हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडले होते. त्यांना सोडवून आणण्यासाठी पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याशी बोलणी केली आणि थोड्या काळासाठी युद्ध थांबले. तिकडे अडकलेले भारतीय विद्यार्थी सुखरूप भारतात पोहोचले. जगातल्या एकाही पंतप्रधानांना जे जमले, ते आपल्या पंतप्रधानांनी करून दाखविले, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहAurangabadऔरंगाबादBJPभाजपाchinaचीनPakistanपाकिस्तान