शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद; शेजारील राष्ट्रांना संरक्षण मंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 12:25 IST

'जगातल्या एकाही पंतप्रधानांना जे जमले, ते आपल्या पंतप्रधानांनी करून दाखविले'

छत्रपती संभाजीनगर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यात दोन्ही शेजारील राष्ट्रांना आरपारचा इशारा दिला असून वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद भारतीय सैनिकांमध्ये आहे, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. रेल्वेस्टेशनजवळील अयोध्यानगरी मैदानावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहरात आले होते. त्यांनी जमलेल्या हजारो जनसमुदायाला ‘ए मेरे कुुटुंब के लोगो’ या शब्दाने साद दिली.

ते म्हणाले, आजदेखील हल्दी घाटी असेल की गलवान घाटी. शत्रूंच्या कारवायापुढे भारताची मान ना कधी झुकली ना यापुढे कधी झुकणार नाही. शेजारील चीन राष्ट्राने चीनने गलवान घाटीत जे केले, ते संतापजनक होते. आम्ही कुणाला छेडणार नाही, पण जो कोणी आम्हाला छेडेल, त्याला सोडणार नाही, हा आपला संकल्प आहे. ही प्रेरणा आम्हाला महाराणा प्रतापसिंह यांच्यापासून मिळाली आहे.दुसरा शेजारचा राष्ट्र दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तो यात कधीही यशस्वी होणार नाही. आम्ही शत्रूला इकडेही मारू शकतो आणि गरज पडली तर त्यांच्या देशात घुसूनदेखील मारू शकतो, असा संदेश आपल्या सैनिकांना दिला. हीच आहे भारताची ताकत, असे राजनाथ म्हणाले.

संरक्षणमंत्री झाल्यानंतर जे चित्र होते ते नवल करणारे होते. भारतीय सेनेसाठी रायफल, टँक, बाॅम्ब, मिसाइल हे दुसऱ्या देशातून आयात केले जात होते. पंतप्रधानांनी निर्णय घेतला की, यापुढे टँक, बॉम्ब, मिसाइल जे काही असेल, ती सारी शस्त्रे आता आपल्याच देशात तयार केले जातील. सन २०१४ पूर्वी जगातील देशांना आपण ९०० कोटी रुपयांची शस्त्रे निर्यात करत होतो. आता १६ हजार कोटींहून अधिक रुपयांची शस्त्रे निर्यात दुसऱ्या देशांना करत आहोत. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू होते तेव्हा तिकडे २३ हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडले होते. त्यांना सोडवून आणण्यासाठी पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याशी बोलणी केली आणि थोड्या काळासाठी युद्ध थांबले. तिकडे अडकलेले भारतीय विद्यार्थी सुखरूप भारतात पोहोचले. जगातल्या एकाही पंतप्रधानांना जे जमले, ते आपल्या पंतप्रधानांनी करून दाखविले, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहAurangabadऔरंगाबादBJPभाजपाchinaचीनPakistanपाकिस्तान