शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद; शेजारील राष्ट्रांना संरक्षण मंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 12:25 IST

'जगातल्या एकाही पंतप्रधानांना जे जमले, ते आपल्या पंतप्रधानांनी करून दाखविले'

छत्रपती संभाजीनगर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यात दोन्ही शेजारील राष्ट्रांना आरपारचा इशारा दिला असून वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद भारतीय सैनिकांमध्ये आहे, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. रेल्वेस्टेशनजवळील अयोध्यानगरी मैदानावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहरात आले होते. त्यांनी जमलेल्या हजारो जनसमुदायाला ‘ए मेरे कुुटुंब के लोगो’ या शब्दाने साद दिली.

ते म्हणाले, आजदेखील हल्दी घाटी असेल की गलवान घाटी. शत्रूंच्या कारवायापुढे भारताची मान ना कधी झुकली ना यापुढे कधी झुकणार नाही. शेजारील चीन राष्ट्राने चीनने गलवान घाटीत जे केले, ते संतापजनक होते. आम्ही कुणाला छेडणार नाही, पण जो कोणी आम्हाला छेडेल, त्याला सोडणार नाही, हा आपला संकल्प आहे. ही प्रेरणा आम्हाला महाराणा प्रतापसिंह यांच्यापासून मिळाली आहे.दुसरा शेजारचा राष्ट्र दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तो यात कधीही यशस्वी होणार नाही. आम्ही शत्रूला इकडेही मारू शकतो आणि गरज पडली तर त्यांच्या देशात घुसूनदेखील मारू शकतो, असा संदेश आपल्या सैनिकांना दिला. हीच आहे भारताची ताकत, असे राजनाथ म्हणाले.

संरक्षणमंत्री झाल्यानंतर जे चित्र होते ते नवल करणारे होते. भारतीय सेनेसाठी रायफल, टँक, बाॅम्ब, मिसाइल हे दुसऱ्या देशातून आयात केले जात होते. पंतप्रधानांनी निर्णय घेतला की, यापुढे टँक, बॉम्ब, मिसाइल जे काही असेल, ती सारी शस्त्रे आता आपल्याच देशात तयार केले जातील. सन २०१४ पूर्वी जगातील देशांना आपण ९०० कोटी रुपयांची शस्त्रे निर्यात करत होतो. आता १६ हजार कोटींहून अधिक रुपयांची शस्त्रे निर्यात दुसऱ्या देशांना करत आहोत. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू होते तेव्हा तिकडे २३ हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडले होते. त्यांना सोडवून आणण्यासाठी पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याशी बोलणी केली आणि थोड्या काळासाठी युद्ध थांबले. तिकडे अडकलेले भारतीय विद्यार्थी सुखरूप भारतात पोहोचले. जगातल्या एकाही पंतप्रधानांना जे जमले, ते आपल्या पंतप्रधानांनी करून दाखविले, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहAurangabadऔरंगाबादBJPभाजपाchinaचीनPakistanपाकिस्तान