शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट: हरिभाऊ बागडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:24 IST

देशातल्या सर्व गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. हातांना काम मिळण्याची गरज आहे.

छत्रपती संभाजीनगर : हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट, असा हितोपदेश गुरुवारी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकमत’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उद्योगपतींच्या सन्मान सोहळ्यात केला.

राज्यपाल बागडे म्हणाले, दर्डा परिवार मुळात दोनशे वर्षांपूर्वी राजस्थानाहून आले. आणि यवतमाळला ते कॉटन किंग झाले. तिकडे मी त्यांचे गाव शोधले. तिथल्या सरपंचाशी बोललो. तुला काय पाहिजे ते सांग, असे मी त्याला सांगितले. राजेंद्रबाबूंना तुमच्या मूळ गावी शाळा बांधून द्या, असे मी त्यांना बोललो. त्यास ते तयार झाले आहेत. (टाळ्या) मागे इकडच्या मारवाडी समाजाने सत्कार केला. त्यावेळी त्यांनाही म्हणालो, गावाकडे येत जा. (हशा व टाळ्या) तिथल्या प्रवासी संघटनेचा (राजस्थान सोडून अन्यत्र उद्योगधंदा करणारे) कार्यक्रम झाला. त्यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगितले, देशभर पांगलेल्या लोकांना गाठा आणि इकडे गुंतवणूक करायला सांगा. (टाळ्या)

मराठवाड्यात अन्यत्र कारखानदारी वाढली नाहीमराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरच्या अवतीभवती औद्योगिक क्षेत्र आहे. मराठवाड्याच्या जिल्ह्याजिल्ह्यांत व छत्रपती संभाजीनगरच्या तालुक्यांमध्ये कारखानदारी वाढलेली नाही. बजाज कारखाना सुरू झाला आणि सहा महिन्यांतच संप सुरू झाला. ते योग्य नव्हते. कारखाना जरा वाढू द्या मग हक्क मागा. हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी ठेवा. (जोरदार टाळ्या) ना शाळांतून ना कुठून कर्तव्याबद्दलचे प्रशिक्षण झाले नाही.

गावचा विकास म्हणजे भारताचा विकासदेशातल्या सर्व गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. हातांना काम मिळण्याची गरज आहे. पूर्वी ८० ते ९० टक्के लोकांचा व्यवसाय शेतीच होता. गावचा विकास हा भारताचा विकास. गावात काय उद्योग सुरू करता येतील, याचा विचार झाला पाहिजे. मध गोळा करणे व स्वत:चे कपडे स्वत: शिवणे, असे हस्त उद्योग करता आले पाहिजे.

नापीक जमिनीवर उद्योग हवेतराष्ट्राची शेती वाढणार नाही. गावचे शिवारही वाढणार नाही. आता घरांसाठी, उद्योगांसाठी नापीक जमीन वा डोंगरांची जमीन वापरता आली पाहिजे. अन्न देणारी जमीन यात गुंतवता कामा नये, असे माझे मत आहे. आता लोकसंख्या वाढत आहे. ती वाढतच राहणार आहे. अन्नधान्यासाठी जमिनी शिल्लक ठेवाव्या लागतात. नापीक जमिनीवर उद्योग उभारून सरकारने विमानतळापासून सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे.

विकसित भारताचं स्वप्न साकार करा२०४७ साली देश विकसित व्हावा, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आहे. आपण सगळे जण या मानसिकतेत आलो पाहिजे. कोरोना काळात उद्योगपतींना अनेक कर्ज सुविधा दिल्या. मोदी आले तेव्हा देशाचा क्रमांक ११वा होता. आता तो पाचवा आहे. लवकरच तिसरा येईल, अशी अपेक्षा आहे.

उदयपूरला यालोकमत’ सर्वत्र आहे. उदयपूरला या, असे मी म्हटलेय. ‘लोकमत’च्या अनेक बातम्या माझ्या स्मरणात आहेत; पण किसनगडची बातमी व फोटो माझ्या लक्षात आहे. शेजारच्या देशातून आमची जनावरे पळवून नेतात, म्हणून औताला माणसे जुंपावी लागली, अशी ती बातमी होती. ५२ डिग्री तापमानात राहणाऱ्या लोकांना मी जाणीवपूर्वक भेटलो.

टॅग्स :LokmatलोकमतHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेRajendra Dardaराजेंद्र दर्डाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर