शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
3
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
4
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
5
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
6
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
7
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
8
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
9
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
10
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
11
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
12
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
13
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
14
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
15
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
16
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
17
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
18
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
19
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
20
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट: हरिभाऊ बागडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:24 IST

देशातल्या सर्व गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. हातांना काम मिळण्याची गरज आहे.

छत्रपती संभाजीनगर : हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट, असा हितोपदेश गुरुवारी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकमत’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उद्योगपतींच्या सन्मान सोहळ्यात केला.

राज्यपाल बागडे म्हणाले, दर्डा परिवार मुळात दोनशे वर्षांपूर्वी राजस्थानाहून आले. आणि यवतमाळला ते कॉटन किंग झाले. तिकडे मी त्यांचे गाव शोधले. तिथल्या सरपंचाशी बोललो. तुला काय पाहिजे ते सांग, असे मी त्याला सांगितले. राजेंद्रबाबूंना तुमच्या मूळ गावी शाळा बांधून द्या, असे मी त्यांना बोललो. त्यास ते तयार झाले आहेत. (टाळ्या) मागे इकडच्या मारवाडी समाजाने सत्कार केला. त्यावेळी त्यांनाही म्हणालो, गावाकडे येत जा. (हशा व टाळ्या) तिथल्या प्रवासी संघटनेचा (राजस्थान सोडून अन्यत्र उद्योगधंदा करणारे) कार्यक्रम झाला. त्यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगितले, देशभर पांगलेल्या लोकांना गाठा आणि इकडे गुंतवणूक करायला सांगा. (टाळ्या)

मराठवाड्यात अन्यत्र कारखानदारी वाढली नाहीमराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरच्या अवतीभवती औद्योगिक क्षेत्र आहे. मराठवाड्याच्या जिल्ह्याजिल्ह्यांत व छत्रपती संभाजीनगरच्या तालुक्यांमध्ये कारखानदारी वाढलेली नाही. बजाज कारखाना सुरू झाला आणि सहा महिन्यांतच संप सुरू झाला. ते योग्य नव्हते. कारखाना जरा वाढू द्या मग हक्क मागा. हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी ठेवा. (जोरदार टाळ्या) ना शाळांतून ना कुठून कर्तव्याबद्दलचे प्रशिक्षण झाले नाही.

गावचा विकास म्हणजे भारताचा विकासदेशातल्या सर्व गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. हातांना काम मिळण्याची गरज आहे. पूर्वी ८० ते ९० टक्के लोकांचा व्यवसाय शेतीच होता. गावचा विकास हा भारताचा विकास. गावात काय उद्योग सुरू करता येतील, याचा विचार झाला पाहिजे. मध गोळा करणे व स्वत:चे कपडे स्वत: शिवणे, असे हस्त उद्योग करता आले पाहिजे.

नापीक जमिनीवर उद्योग हवेतराष्ट्राची शेती वाढणार नाही. गावचे शिवारही वाढणार नाही. आता घरांसाठी, उद्योगांसाठी नापीक जमीन वा डोंगरांची जमीन वापरता आली पाहिजे. अन्न देणारी जमीन यात गुंतवता कामा नये, असे माझे मत आहे. आता लोकसंख्या वाढत आहे. ती वाढतच राहणार आहे. अन्नधान्यासाठी जमिनी शिल्लक ठेवाव्या लागतात. नापीक जमिनीवर उद्योग उभारून सरकारने विमानतळापासून सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे.

विकसित भारताचं स्वप्न साकार करा२०४७ साली देश विकसित व्हावा, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आहे. आपण सगळे जण या मानसिकतेत आलो पाहिजे. कोरोना काळात उद्योगपतींना अनेक कर्ज सुविधा दिल्या. मोदी आले तेव्हा देशाचा क्रमांक ११वा होता. आता तो पाचवा आहे. लवकरच तिसरा येईल, अशी अपेक्षा आहे.

उदयपूरला यालोकमत’ सर्वत्र आहे. उदयपूरला या, असे मी म्हटलेय. ‘लोकमत’च्या अनेक बातम्या माझ्या स्मरणात आहेत; पण किसनगडची बातमी व फोटो माझ्या लक्षात आहे. शेजारच्या देशातून आमची जनावरे पळवून नेतात, म्हणून औताला माणसे जुंपावी लागली, अशी ती बातमी होती. ५२ डिग्री तापमानात राहणाऱ्या लोकांना मी जाणीवपूर्वक भेटलो.

टॅग्स :LokmatलोकमतHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेRajendra Dardaराजेंद्र दर्डाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर