शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

घर बंद होते अन् ड्रायव्हिंग लायसन्स परत गेले; तर काय कराल? 

By साहेबराव हिवराळे | Updated: October 27, 2023 17:45 IST

एखाद्याचे लायसन्स परत गेल्यास त्यांनी सात दिवसाच्या आत जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात सध्या वाहन चालवायचा परवाना (लायसन्स) पोस्टात बुकिंग करूनच पाठविले जाते. सप्टेंबर महिन्यात आर्टिकल बुकिंगची सुविधा छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई अशा तीन ठिकाणी सुरू झाली. या तीन ठिकाणांना राज्यातील इतर १४ आरटीओ कार्यालय कनेक्ट आहेत. येथून निघणारे परवाने ४ लाख ७२ हजार होते, ते संबंधितांना पाठविण्यात आले आहेत. संबंधित व्यक्ती या परवान्यासाठी तेवढीच अलर्ट असते, परंतु एखाद्याच्या घराचे दार बंद असल्यास ते परवाना पाकीट पोस्ट कार्यालयात सात दिवसांसाठी राखून ठेवले जाते.

आर्टिकल बुक केल्यापासून ते संबंधितांच्या घरी पोहोचेपर्यंत संदेश रजिस्टर केलेल्या मोबाइलवर येत असतो, पण तरीही एखाद्याचे घर यदाकदाचित बंद होते, म्हणून आर्टिकल परत जाते, पण अशा घटना किरकोळच आहेत. अनेक जण जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन त्वरित लायसन्सविषयी विचारपूस करून खात्री करून ते पोस्टाने आलेले लायसन्स मिळविण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचा मोबाइल नंबर लायसन्सला लिंक केलेला नसेल, तर त्यांना संदेश मिळत नाही. अशा तुरळक नागरिकांना लायसन्स परत गेल्याने पुन्हा परवाना मिळविण्यासाठी धावपळ करावीच लागते.

नंतर सातच दिवस राहते पोस्टातआर्टिकल बुक झाल्यापासून पोस्टमन ते लायसन्स घरी आणून देईपर्यंत मोबाइलवर संदेश येणे सुरूच असते. घर बंद असल्यास संबंधितांचे लायसन्स त्याला मिळावे, त्याची गैरसोय होऊ नये, म्हणून पोस्टात सात दिवस ठेवले जाते. कुणी आलेच नाही, तर ते आर्टिकल पर संबंधित आरटीओ कार्यालयाला परत पाठविले जाते.

लायसन्स परत गेले, तर काय कराल?एखाद्याचे लायसन्स परत गेल्यास त्यांनी सात दिवसाच्या आत जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे. तेथे लायसन्स मिळू शकते, परंतु त्यानंतरही ‘तो पत्ता सापडला नाही’ असा शेरा पाकिटावर मारला जातो. आरटीओ कार्यालयास जमा करावे लागते. तेथे जाऊनही चौकशी करून कागदपत्र दाखवून ते पाकीट- आर्टिकल आरटीओ विभागाच्या संबंधित खिडकीतून मिळविता येते.

आपला मोबाइल लिंक करा...आपल्या वापरात असलेला माेबाइल नंबर, आधार, तसेच इतर गरज असलेल्या डॉक्युमेंटला जोडण्याची आवश्यकता आहे. कारण काही अडचणी येऊ नयेत, संदेशातून माहिती मिळत राहणे, अलर्ट मिळत राहणे सोयीचे होते, गैरसोय होत नाही.- देवेंद्र परदेशी, उपसचिव, महाराष्ट्र गोवा सर्कल एनएफपीई.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPost Officeपोस्ट ऑफिसRto officeआरटीओ ऑफीस