शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

घर बंद होते अन् ड्रायव्हिंग लायसन्स परत गेले; तर काय कराल? 

By साहेबराव हिवराळे | Updated: October 27, 2023 17:45 IST

एखाद्याचे लायसन्स परत गेल्यास त्यांनी सात दिवसाच्या आत जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात सध्या वाहन चालवायचा परवाना (लायसन्स) पोस्टात बुकिंग करूनच पाठविले जाते. सप्टेंबर महिन्यात आर्टिकल बुकिंगची सुविधा छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई अशा तीन ठिकाणी सुरू झाली. या तीन ठिकाणांना राज्यातील इतर १४ आरटीओ कार्यालय कनेक्ट आहेत. येथून निघणारे परवाने ४ लाख ७२ हजार होते, ते संबंधितांना पाठविण्यात आले आहेत. संबंधित व्यक्ती या परवान्यासाठी तेवढीच अलर्ट असते, परंतु एखाद्याच्या घराचे दार बंद असल्यास ते परवाना पाकीट पोस्ट कार्यालयात सात दिवसांसाठी राखून ठेवले जाते.

आर्टिकल बुक केल्यापासून ते संबंधितांच्या घरी पोहोचेपर्यंत संदेश रजिस्टर केलेल्या मोबाइलवर येत असतो, पण तरीही एखाद्याचे घर यदाकदाचित बंद होते, म्हणून आर्टिकल परत जाते, पण अशा घटना किरकोळच आहेत. अनेक जण जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन त्वरित लायसन्सविषयी विचारपूस करून खात्री करून ते पोस्टाने आलेले लायसन्स मिळविण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचा मोबाइल नंबर लायसन्सला लिंक केलेला नसेल, तर त्यांना संदेश मिळत नाही. अशा तुरळक नागरिकांना लायसन्स परत गेल्याने पुन्हा परवाना मिळविण्यासाठी धावपळ करावीच लागते.

नंतर सातच दिवस राहते पोस्टातआर्टिकल बुक झाल्यापासून पोस्टमन ते लायसन्स घरी आणून देईपर्यंत मोबाइलवर संदेश येणे सुरूच असते. घर बंद असल्यास संबंधितांचे लायसन्स त्याला मिळावे, त्याची गैरसोय होऊ नये, म्हणून पोस्टात सात दिवस ठेवले जाते. कुणी आलेच नाही, तर ते आर्टिकल पर संबंधित आरटीओ कार्यालयाला परत पाठविले जाते.

लायसन्स परत गेले, तर काय कराल?एखाद्याचे लायसन्स परत गेल्यास त्यांनी सात दिवसाच्या आत जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे. तेथे लायसन्स मिळू शकते, परंतु त्यानंतरही ‘तो पत्ता सापडला नाही’ असा शेरा पाकिटावर मारला जातो. आरटीओ कार्यालयास जमा करावे लागते. तेथे जाऊनही चौकशी करून कागदपत्र दाखवून ते पाकीट- आर्टिकल आरटीओ विभागाच्या संबंधित खिडकीतून मिळविता येते.

आपला मोबाइल लिंक करा...आपल्या वापरात असलेला माेबाइल नंबर, आधार, तसेच इतर गरज असलेल्या डॉक्युमेंटला जोडण्याची आवश्यकता आहे. कारण काही अडचणी येऊ नयेत, संदेशातून माहिती मिळत राहणे, अलर्ट मिळत राहणे सोयीचे होते, गैरसोय होत नाही.- देवेंद्र परदेशी, उपसचिव, महाराष्ट्र गोवा सर्कल एनएफपीई.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPost Officeपोस्ट ऑफिसRto officeआरटीओ ऑफीस