शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना

By विकास राऊत | Updated: December 12, 2024 12:06 IST

तीन पिढ्यांपासून रस्त्यासाठी लढा; भिवधानोऱ्यातील मुले तराफ्यातून जातात शाळेत

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तराफ्यातून कसरत करीत शाळा गाठावी लागते. जायकवाडी धरणात जमिनी गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी बॅक वॉटरने वेढलेल्या शेतात राहणाऱ्या नागरिकांच्या व्यथा जिल्हा प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत गेल्या. परंतु त्यावर आजवर काहीही तोडगा निघालेला नाही. सरकार १०० कुटुंबांसाठी १०३ कोटींतून पूल बांधण्याचा निर्णय केव्हा घेणार, असा प्रश्न कायम आहे.

सोमवारी जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना सा. बां. विभाग, जलसंपदा विभागासह महसूल प्रशासनाला दिल्या. मागील अनेक वर्षांपासून सुमारे १०० कुटुंब कायमस्वरूपी रस्ता किंवा पुलाच्या मागणीसाठी प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत लढा देत आहेत. अद्याप त्यांना यश आलेले नाही. या १०० कुटुंबांसाठी १०३ कोटींचा पूल बांधावा लागणार आहे. तो पूल बांधणार कोण, असा प्रश्न आहे.

भिवधानोरा व परिसरातील गावांतील शेतकरी शेतवस्त्यांवर राहतात. त्यातील काही कुटुंब शिवना नदीच्या पलीकडे राहतात. सध्या जायकवाडीचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात आहे. पाण्यामुळे नागरिकांचा गावांशी संपर्क दुर्मिळ झालेला आहे. रस्ता नाही, पुलाचे बांधकाम कोण करणार हे माहिती नाही. हे त्रांगडे असताना मुलांना मात्र भिवधानोरा गावापर्यंत थर्माकोलच्या तराफ्यातून पाण्यातून वाट काढीत जावे लागते. शिवना नदीतून सुमारे दीड किलोमीटरपर्यंत तराफ्यातून मुलांना शाळा गाठावी लागत असल्याप्रकरणी मध्यंतरी ओरड झाल्यानंतर एनडीआरएफने एक बोट तेथे दिली. परंतु त्या बोटीचा काही उपयोग नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अधिवेशनात काय झाली होती चर्चा?पावसाळ्यात गावाचे दोन भाग होतात. त्यामुळे एका भागातून दुसरीकडे फिरून जावे लागते. तेथे रस्ता बांधण्याऐवजी पूल बांधावा लागेल. त्यासाठी ९० कोटी रुपये खर्च होणार आहे. जलसंपदा विभाग ९० कोटी खर्च करू शकत नाही. ग्रामविकास व सा. बां. विभागाशी चर्चा केली जाईल, असे उत्तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. सतीश चव्हाण यांनी २०२३ मध्ये विधानसभा अधिवेशनादरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिले होते.

उपाययोजनांवर अहवाल देण्याची सूचनाभिवधानोरा येथील बॅक वॉटर आणि नागरिकांच्या तक्रारी, सद्य:स्थितीवरून दीड तास बैठक चालली. शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांच्या, शाळकरी मुलांच्या अडचणी आहेत. तेथे काय उपाययोजना करता येईल, याबाबत सविस्तर अहवाल देण्यास सर्व यंत्रणांना सांगितले.-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

एवढी अनास्था कशासाठी?न्यायालयाने सुमोटो याचिकेवर दिलेल्या निकालानंतर प्रशासनाने बोट दिली, परंतु ती चालविण्यासाठी ऑपरेटर दिला नाही. एवढी अनास्था का आहे, हे कळत नाही.-विष्णू काळे, रहिवासी, भिवधानोरा शेतवस्ती

पाहणीनंतर पुढे काहीच नाहीअधिवेशनात शिवना नदीवर पूल बांधणीचे प्रकरण चर्चेला आले. त्यानंतर पूल बांधण्याचा मुद्दा समोर आल्याने बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी तेथे येऊन पाहणी करून गेले. सध्या जायकवाडीचे बॅक वॉटर आणि नदीचे पाणी यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.-बाबासाहेब चव्हाण, उपसरपंच, भिवधानोरा ग्रामपंचायत

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरStudentविद्यार्थीWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी