शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना

By विकास राऊत | Updated: December 12, 2024 12:06 IST

तीन पिढ्यांपासून रस्त्यासाठी लढा; भिवधानोऱ्यातील मुले तराफ्यातून जातात शाळेत

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तराफ्यातून कसरत करीत शाळा गाठावी लागते. जायकवाडी धरणात जमिनी गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी बॅक वॉटरने वेढलेल्या शेतात राहणाऱ्या नागरिकांच्या व्यथा जिल्हा प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत गेल्या. परंतु त्यावर आजवर काहीही तोडगा निघालेला नाही. सरकार १०० कुटुंबांसाठी १०३ कोटींतून पूल बांधण्याचा निर्णय केव्हा घेणार, असा प्रश्न कायम आहे.

सोमवारी जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना सा. बां. विभाग, जलसंपदा विभागासह महसूल प्रशासनाला दिल्या. मागील अनेक वर्षांपासून सुमारे १०० कुटुंब कायमस्वरूपी रस्ता किंवा पुलाच्या मागणीसाठी प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत लढा देत आहेत. अद्याप त्यांना यश आलेले नाही. या १०० कुटुंबांसाठी १०३ कोटींचा पूल बांधावा लागणार आहे. तो पूल बांधणार कोण, असा प्रश्न आहे.

भिवधानोरा व परिसरातील गावांतील शेतकरी शेतवस्त्यांवर राहतात. त्यातील काही कुटुंब शिवना नदीच्या पलीकडे राहतात. सध्या जायकवाडीचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात आहे. पाण्यामुळे नागरिकांचा गावांशी संपर्क दुर्मिळ झालेला आहे. रस्ता नाही, पुलाचे बांधकाम कोण करणार हे माहिती नाही. हे त्रांगडे असताना मुलांना मात्र भिवधानोरा गावापर्यंत थर्माकोलच्या तराफ्यातून पाण्यातून वाट काढीत जावे लागते. शिवना नदीतून सुमारे दीड किलोमीटरपर्यंत तराफ्यातून मुलांना शाळा गाठावी लागत असल्याप्रकरणी मध्यंतरी ओरड झाल्यानंतर एनडीआरएफने एक बोट तेथे दिली. परंतु त्या बोटीचा काही उपयोग नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अधिवेशनात काय झाली होती चर्चा?पावसाळ्यात गावाचे दोन भाग होतात. त्यामुळे एका भागातून दुसरीकडे फिरून जावे लागते. तेथे रस्ता बांधण्याऐवजी पूल बांधावा लागेल. त्यासाठी ९० कोटी रुपये खर्च होणार आहे. जलसंपदा विभाग ९० कोटी खर्च करू शकत नाही. ग्रामविकास व सा. बां. विभागाशी चर्चा केली जाईल, असे उत्तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. सतीश चव्हाण यांनी २०२३ मध्ये विधानसभा अधिवेशनादरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिले होते.

उपाययोजनांवर अहवाल देण्याची सूचनाभिवधानोरा येथील बॅक वॉटर आणि नागरिकांच्या तक्रारी, सद्य:स्थितीवरून दीड तास बैठक चालली. शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांच्या, शाळकरी मुलांच्या अडचणी आहेत. तेथे काय उपाययोजना करता येईल, याबाबत सविस्तर अहवाल देण्यास सर्व यंत्रणांना सांगितले.-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

एवढी अनास्था कशासाठी?न्यायालयाने सुमोटो याचिकेवर दिलेल्या निकालानंतर प्रशासनाने बोट दिली, परंतु ती चालविण्यासाठी ऑपरेटर दिला नाही. एवढी अनास्था का आहे, हे कळत नाही.-विष्णू काळे, रहिवासी, भिवधानोरा शेतवस्ती

पाहणीनंतर पुढे काहीच नाहीअधिवेशनात शिवना नदीवर पूल बांधणीचे प्रकरण चर्चेला आले. त्यानंतर पूल बांधण्याचा मुद्दा समोर आल्याने बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी तेथे येऊन पाहणी करून गेले. सध्या जायकवाडीचे बॅक वॉटर आणि नदीचे पाणी यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.-बाबासाहेब चव्हाण, उपसरपंच, भिवधानोरा ग्रामपंचायत

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरStudentविद्यार्थीWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी