शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने मोबदला दिला नाही, संतप्त शेतकऱ्यांनी बड्या उद्योगांचे काम बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 15:10 IST

बडे उद्योग संकटात, मुदतीत पैसे न दिल्यामुळे शेतकरी संतप्त

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन परिसरातील बन्नीतांडा, बंगलतांडा येथील वर्ग-२ जमिनीचा २० टक्के भूसंपादनाचा मोबादला न मिळाल्यामुळे डीएमआयसीतील बड्या उद्योगांचे काम शेतकऱ्यांनी आंदोलन करून बंद पाडल्यानंतर हे प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. मदत व पुनवर्सन विभागाने याप्रकरणात लक्ष घातले असून, जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उर्वरित प्रकरणाची माहिती मागविली आहे.

मोबदल्यासाठी २७ रोजी शेतकऱ्यांनी एन्डयुरन्स, आयबीएस, कॉस्मो, प्रगती कन्सट्रक्शन्स, स्वस्तिक, एथर, जेएसडब्ल्यू, टोयोटा या कंपन्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे काम बंद पाडून आंदोलन केले. दोन महिन्यांत दोन वेळा शेतकऱ्यांनी बड्या उद्योगांचे काम बंद पाडल्यामुळे उद्योग वर्तुळात चुकीचा संदेश गेला आहे. याचे पडसाद उद्योगांच्या गुंतवणुकीवर देखील उमटू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, शासनाने दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला याप्रकरणी विचारणा केल्यानंतर प्रशासन गतीने कामाला लागले आहे.

पैठण उपविभागाचे पत्र असे...पैठण उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले हाेते. वर्ग-२ गायरान जमिनीचे विनापरवानगी झालेले खरेदीखत नियमानुकूल करण्यासाठी शासनाने १४३ पैकी ३२ प्रकरणांना ३० जानेवारी रोजी मान्यता दिली. ४ फेब्रुवारी रोजी ९ प्रकरणात चलनाद्वारे जमीन खातेदारांनी अनार्जित रक्कम शासनाला जमा केली. २३ प्रकरणांत कार्यालयास चालान प्राप्त झाले, असे आंदोलक शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी लेखी पत्राद्वारे कळविले.

१०१ प्रकरणे आहेत शिल्लक१४३ प्रकरणे शासनाकडे पाठविली. त्यातील ३२ प्रकरणांत पहिल्या टप्प्यात परवानगी मिळाली. त्याचे मोबदला वाटप आदेश पैठण उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. दुसऱ्या टप्प्यात १० प्रकरणांना शासनाने मान्यता दिली.

प्रशासनाने पूर्ण तयारी करून ठेवलीसोमवार दि. ३ मार्च रोजी आदेश जारी करू. १०१ प्रकरणे उरले आहेत. त्यात शासनाने आम्हाला प्रत्येक जमिनीचे मूल्यांकन मागविले. दुय्यम निबंधकांना मूल्यांकन करण्यास वर्षनिहाय उशीर लागणार आहे. तो अहवाल शनिवार १ मार्च रोजी मिळणे शक्य आहे. मूल्यांकन अहवाल शासनाकडे दिला जाईल. शासनाने मान्यता दिल्यावर १०१ प्रकरणांचे आदेश पैठण उपविभागाकडे जातील. ४२ प्रकरणांच्या मंजुरीचा मुद्दा संपला आहे. १०१ प्रकरणांमध्ये शासनाने आदेश दिल्यानंतरच कार्यवाही होईल. मूल्यांकन अहवाल शासनाने मंजूर केला की, मोबदला देण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रशासनाने पूर्ण तयारी करून ठेवली आहे.- विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरFarmerशेतकरी