शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भट्ट्या पेटल्या; गुढी पाढव्यासाठी साखरगाठी तयार, घरजावयांसाठी असते खास निर्मिती

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 18, 2024 12:24 IST

पारंपरिक कारखान्याच्या भट्ट्या पेटल्या असल्या तरी कारखान्यांची संख्या कमी झाल्याने उत्पादन ३० टन होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : नववर्षाला घरोघरी गुढी उभारली जाते, तिला साखरगाठी घातली जाते. तसेच लहान मुलांच्या गळ्यातही साखर गाठी घालून नववर्ष साजरे केले जाते. यासाठी यंदा व्यापाऱ्यांनी जवळपास ५० टन साखरगाठीची तरतूद केली आहे. पारंपरिक कारखान्याच्या भट्ट्या पेटल्या असल्या तरी कारखान्यांची संख्या कमी झाल्याने उत्पादन ३० टन होण्याची शक्यता आहे. शहराची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यावसायिकांनी जालना परभणी, नगर एवढेच नव्हे तर गुजरातेतून २० टन साखरगाठी मागविल्या आहेत.

शहरात किती पारंपरिक कारखानेशहरात २० वर्षांपूर्वी साखरगाठी बनविणारे २५ पेक्षा अधिक कारखाने होते. आजघडीला गुलमंडी, कैलासनगर, रेंगटीपुरा, जिन्सी, सिडको, चिकलठाणा येथे एकूण ७ कारखाने सुरू आहेत. महाशिवरात्रीपासून दररोज दीड ते दोन टन साखरगाठी तयार होत आहेत.

साखरगाठीवर एकच डिझाईन ‘उगवता सूर्य’साखरगाठीवर पूर्वी अनारकली, सरू, पेटी असे ५ ते ६ डिझाईन असत; पण आता लाकडी साचे बनविणारे कमी झाल्याने फक्त ‘उगवता सूर्य’ डिझाईन साखर गाठीवर दिसून येते.

साखरगाठी बनते कसेपहिले साखरेचा मळ काढला जातो. त्यानंतर पाकात लिंबू व दूध मिसळले जाते. सागवणी साच्यात दोरी ठेवून त्यात साखर पाक भरला जातो. पाक गार व घट्ट झाल्यावर साच्यातून साखरगाठी बाहेर काढल्या जाते. मात्र, हे काम वाटतेय एवढे सोपे नाही, किचकट व चिकट काम असते.

साखरगाठीत ४० रुपयांनी भाववाढसाखरगाठीसाठी सागवाणी साचे वापरले जातात. एक किलोचा साच्या १५०० वरून ३ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. ७० रुपये किलोचा लिंबू २०० रुपयात मिळतो आहे. तर १९० रुपये किलोची दोरा २४० रुपये किलोने मिळत आहे. परिणामी, साखरगाठीचे भाव ४० रुपयांनी वधारुन सध्या १४० ते १६० रुपये किलो झाले आहेत.- जगन्नाथ बसैये, साखर गाठी उत्पादक

गुजरातची साखरगाठी ‘कडक’मराठवाड्यात साखरगाठी तयार करण्यासाठी सागवाणी साचे वापरले जातात. नरम असल्याने या साखरगाठी लहानमुलेही सहज खाऊ शकतात. मात्र, गुजरातमध्ये लोखंडी मशीनमध्ये साखरगाठी तयार होतात. त्या कडक होऊन जातात. लहान मुलांना दाताने तोडणे कठीण जाते.

जावई नाराजपूर्वी लाडक्या जावयासाठी नोटा लावलेल्या साखरगाठी येत असे. मात्र, सरकारने त्यावर बंदी आणली आहे. यामुळे नोटा लावलेल्या साखरगाठी मिळत नसल्याने जावई वर्ग नाराज आहे; पण घरजावईसाठी आरसा लावलेल्या साखरगाठी बाजारात आल्या आहेत.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाAurangabadऔरंगाबाद