शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

शेवटी बापच! पोहता येत नसताना शेततळ्यात उडी घेऊन मुलाला वाचवले, पण स्वतः मात्र बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 19:28 IST

शेततळ्यात पडलेल्या मुलाला सुखरूप बाहेर काढले, पण बापाला वर येता आले नाही, बुडून मृत्यू

फुलंब्री : तालुक्यातील पाल येथे एका शेतकऱ्याचा शेततळ्यात पडलेल्या मुलाला वाचविताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता घडली. किशोर तेजराव जाधव ( ४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. शेततळ्यात बुडालेल्या मुलाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर जाधव यांना वर येत आले नाही आणि त्यांचा बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पाल शिवारात गट ५२ मध्ये शेतकरी किशोर तेजराव जाधव यांची ५ एकर शेती आहे. या शेतात एक एकर क्षेत्रात शेततळे असून पाण्याने तुडुंब भरलेले आहे. आज, बुधवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान किशोर जाधव मुलगा आणि भाचा असे तिघे शेतात कामानिमित्त गेले होते. पाईप काढत असताना मुलाचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. हे दृश्य पाहून जाधव यांनी पोहता येत नसतानाही त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मोठ्या प्रयत्नाने मुलाला काठावर आणले असता भाच्याने त्याला हात धरून बाहेर काढले.

मात्र, जाधव यांना वर येता आले नाही. दोघांनी आरडाओरडा केला पण मदतीस कोणीही आले नाही. मुलगा आणि भाच्याने गावात जाऊन माहिती दिली असटा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तब्बल एक तासांच्या नंतर चार वाजेच्या दरम्यान जाधव यांचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले.  मृतदेह फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करिता पाठविण्यात आला आहे. शेतकरी किशोर जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आईवडील असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कैलास राठोड करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर