शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

पारंपरिक पिकांना फाटा, अद्रक उत्पादनातून तांबेवाडीच्या शेतकऱ्यांनी कमावले तब्बल ४५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 11:20 IST

तांबेवाडी येथील अद्रक बियाणे हे निर्दोष असते. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अद्रक बियाणांना देशभरातून मागणी असते.

छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गावर अवलंबून न राहता, फुलंब्री तालुक्यातील तांबेवाडी येथील ७२ शेतकरी कुटुंबांनी त्यांच्या शेतात शेततळे खोदून बाराही महिने शेतीला पाणी उपलब्ध केले. एवढेच नव्हे, तर पारंपरिक पिकांना फाटा देत प्रामुख्याने अद्रकाची मुख्य पीक म्हणून लागवड सुरू केली. दहा ते बारा वर्षांपासून तांबेवाडीत अद्रक उत्पादनातून कोट्यवधींचे उत्पन्न होत आहे.

यावर्षी येथील शेतकऱ्यांनी अद्रक उत्पादनातून तब्बल ४५ कोटी रुपये कमावत शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी या गावातील ७२ शेतकरी शेतातच घर करून राहतात. तांबे आडनाव असलेल्या या शेतकऱ्यांच्या वसाहतीला तांबेवाडी हे नाव पडले आहे. २०१२ पर्यंत येथील शेतकरी ज्वारी, बाजरी, मका, कापूस या पारंपरिक पिकांची लागवड करीत असत. सिंचनासाठी मुबलक पाणी नसल्याने त्यांना रब्बी पिकांचे उत्पादनही त्यांना घेता येत नव्हते. मात्र, २०१२ पासून आतापर्यंत तांबेवाडीतील प्रत्येक शेतकरी कुटुंबाने त्यांच्या शेतात लहान, मोठ्या आकाराचे शेततळे खोदले. पावसाळ्यात ही कुटुंबे शेततळी विहिरीतील पाणी उपसून पाण्याने तुडुंब भरून घेतात. 

विहिरीचे पाणी शेतीला कमी पडू लागताच शेततळ्याच्या पाण्याचा सिंचनासाठी वापर सुरू करतात. शेततळ्याचे पाणी उपलब्ध झाल्यापासून तांबेवाडीतील सर्वच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात अद्रकाची लागवड केली आहे. गादी वाफा पद्धतीने अद्रकाच्या लागवडीसोबत रासायनिक आणि जैविक खतांचा निम्मा, निम्मा वापर करणे, जमिनीत जास्तीत जास्त जिवाणूंची संख्या वाढेल, यासाठी कंपोस्ट खताचा वापर जाणूनबुजून करण्यात येतो. यातून त्यांना दरवर्षी अद्रकाचे चांगले उत्पादन होत असते. यावर्षी येथील शेतकऱ्यांनी तब्बल २५० एकरवर अद्रकाची लागवड केली होती. दोन महिन्यांपासून अद्रकाचे उत्पादन सुरू झाले आहे. तांबेवाडीच्या अद्रकाची गुणवत्ता सर्वोत्तम असल्याने बाजारात १० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर त्यांना मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी अद्रक उत्पादनातून येथील प्रत्येक कुटुंबाने २० लाख ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. येथील ७२ कुटुंबांनी अद्रक उत्पादनातून तब्बल ४५ कोटी रुपयांची कमाई करून राज्यातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.

तांबेवाडीच्या अद्रक बियाणास देशभर मागणीतांबेवाडी येथील अद्रक बियाणे हे निर्दोष असते. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अद्रक बियाणांना देशभरातून मागणी असते. बाजारात अद्रकाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असला तर बियाण्याला ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो. शेतकरी तांबेवाडी येथे येऊन अद्रकाचे बियाणे घेऊन जातात.

१२ एकरांवर अद्रकाची लागवडशेततळ्यामुळे बाराही महिने शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने तांबेवाडीचे चित्रच बदलले. आमची २५ एकर शेती आहे. यातील १२ एकरांवर अद्रकाची लागवड करण्यात आली होती. यातून एकरी ९०० क्विंटल उत्पन्न मिळाले. आम्हाला सुमारे दीड कोटीचे उत्पन्न मिळाले.- बाबा तांबे पाटील, शेतकरी, तांबेवाडी.

तांबेवाडीचा आदर्श सर्वच शेतकऱ्यांनी घ्यावातांबेवाडी येथील शेतकऱ्यांनी अद्रक उत्पादनातून रेकॉर्डब्रेक उत्पन्न मिळाल्याचे कळताच, आपण शुक्रवारी सकाळी तांबेवाडीला भेट दिली. ७२ शेतकरी कुटुंबांनी अद्रकाची लागवड केल्याचे दिसून आले. प्रत्येक कुटुंबाची एक ते दोन शेततळी आहेत. शेततळ्यामुळे त्यांना बाराही महिने सिंचनाची सुविधा झाल्याने अद्रकासह अन्य पिके ते घेतात. यंदा अद्रकाला चांगला दर मिळत असल्याने २५० एकरांवरील अद्रक उत्पादनातून तांबेवाडीकरांनी ४५ कोटी रुपयांचे उत्पन्न घेतले.--- डॉ. तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद