शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

रात्री बारानंतर येते लाईट; अनंत अडचणींमुळे ओलितापेक्षा कोरडवाहूच बरे म्हणण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 1:31 PM

अनेक ठिकाणी बिबट्याच्या भीतीने रात्री पाणी देण्याचे धाडस होईना, पिकांचे नुकसान

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जिल्ह्यात कृषी वीज ग्राहकांना म्हणजे शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिवसा वीजपुरवठा होतो, तर काही ठिकाणी रात्री. चक्राकार पद्धतीने महावितरणकडून हा वीजपुरवठा होतो. मात्र, ज्या भागांत रात्री १२ वाजल्यानंतर वीज येते, तेथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी चोरांची, तर कधी बिबट्याची भीती असते. त्यामुळे रात्री अपरात्री शेतात ओलित कसे करायचे, त्यापेक्षा कोरडवाहूच बरे, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

गडचिरोली तालुक्यातील देसाईगंज तालुक्यातील धान उत्पादक व इतर शेतकऱ्यांना केवळ आठ तास वीजपुरवठा होत असल्यावरून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावर ताेडगा निघेपर्यंत २४ तास वीज देण्याचा निर्णय तेथील अधिकाऱ्यांनी घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात कृषी वीज ग्राहकांना सकाळी आठ तास आणि रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा केला जातो. यामध्ये काही ठिकाणी रात्री, तर काही ठिकाणी दिवसा वीज दिली जाते. रात्री वीज आली की शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात धाव घ्यावी लागते. शेतकऱ्यांना दिवसाच वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी होते.

चक्राकार पद्धतीने वीजपुरवठाकृषी वीज ग्राहकांना चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो. काही भागात रात्री, तर काही भागांत दिवस वीजपुरवठा होतो. वरिष्ठ कार्यालाकडून होणाऱ्या लोड मॅनेजमेंटनुसार हा पुरवठा होतो. रोटेशननुसार वीजपुरवठा होतो. त्यामुळे कधी दिवसा-तर कधी रात्री वीज मिळते.- प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता, औरंगाबाद ग्रामीण मंडळ

दिवसा वीज द्यावळदगाव परिसरात एक आठवडा सकाळी ८.३० ते सांयकाळी ४.३०, तर दुसऱ्या आठवड्यात मध्यरात्री १२.३० ते सकाळी ८.३० पर्यंत वीज पुरवठा केला. दिवसभरातून फक्त आठ तासच वीज मिळत असल्याने मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. अशातच वळदगाव शिवारात महिनाभरापूर्वी बिबट्याने दर्शन दिल्याने रात्री शेतकरी पाणी देण्यासाठी जात नसल्याने पिके वाळत चालली आहे. या परिसरात रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची गरज आहे.- कांतराव नवले (शेतकरी, वळदगाव)

विजेअभावी पिकांचे नुकसानयंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने विहिरीही तुडुंब भरल्या आहेत. मात्र, महावितरणकडून कृषीपंपासाठी २४ तासांऐवजी फक्त आठ तासांचा वीज पुरवठा केला गेला जात आहे. सध्या शेतात गहू पेरला असून, ऊसही गाळपासाठी उभा असून केवळ विजेअभावी पाणी देता येत नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची वेळ आली आहे.- मंगेश राजपूत (शेतकरी, वाळूज)

ग्रामीण भागात किती कृषी वीजग्राहकभाग - वीजग्राहकअजिंठा-९२९३औरंगाबाद -२८,२४९गंगापूर-२७,८६०कन्नड-१७,३८९खुलताबाद-११,२८१पैठण-२९,३५०फुलंब्री-१८,५२०पिशोर-१४,२४५सिल्लोड-२७,६५२वैजापूर-४०,१००

टॅग्स :agricultureशेतीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी