शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रात्री बारानंतर येते लाईट; अनंत अडचणींमुळे ओलितापेक्षा कोरडवाहूच बरे म्हणण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 13:33 IST

अनेक ठिकाणी बिबट्याच्या भीतीने रात्री पाणी देण्याचे धाडस होईना, पिकांचे नुकसान

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जिल्ह्यात कृषी वीज ग्राहकांना म्हणजे शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिवसा वीजपुरवठा होतो, तर काही ठिकाणी रात्री. चक्राकार पद्धतीने महावितरणकडून हा वीजपुरवठा होतो. मात्र, ज्या भागांत रात्री १२ वाजल्यानंतर वीज येते, तेथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी चोरांची, तर कधी बिबट्याची भीती असते. त्यामुळे रात्री अपरात्री शेतात ओलित कसे करायचे, त्यापेक्षा कोरडवाहूच बरे, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

गडचिरोली तालुक्यातील देसाईगंज तालुक्यातील धान उत्पादक व इतर शेतकऱ्यांना केवळ आठ तास वीजपुरवठा होत असल्यावरून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावर ताेडगा निघेपर्यंत २४ तास वीज देण्याचा निर्णय तेथील अधिकाऱ्यांनी घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात कृषी वीज ग्राहकांना सकाळी आठ तास आणि रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा केला जातो. यामध्ये काही ठिकाणी रात्री, तर काही ठिकाणी दिवसा वीज दिली जाते. रात्री वीज आली की शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात धाव घ्यावी लागते. शेतकऱ्यांना दिवसाच वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी होते.

चक्राकार पद्धतीने वीजपुरवठाकृषी वीज ग्राहकांना चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो. काही भागात रात्री, तर काही भागांत दिवस वीजपुरवठा होतो. वरिष्ठ कार्यालाकडून होणाऱ्या लोड मॅनेजमेंटनुसार हा पुरवठा होतो. रोटेशननुसार वीजपुरवठा होतो. त्यामुळे कधी दिवसा-तर कधी रात्री वीज मिळते.- प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता, औरंगाबाद ग्रामीण मंडळ

दिवसा वीज द्यावळदगाव परिसरात एक आठवडा सकाळी ८.३० ते सांयकाळी ४.३०, तर दुसऱ्या आठवड्यात मध्यरात्री १२.३० ते सकाळी ८.३० पर्यंत वीज पुरवठा केला. दिवसभरातून फक्त आठ तासच वीज मिळत असल्याने मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. अशातच वळदगाव शिवारात महिनाभरापूर्वी बिबट्याने दर्शन दिल्याने रात्री शेतकरी पाणी देण्यासाठी जात नसल्याने पिके वाळत चालली आहे. या परिसरात रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची गरज आहे.- कांतराव नवले (शेतकरी, वळदगाव)

विजेअभावी पिकांचे नुकसानयंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने विहिरीही तुडुंब भरल्या आहेत. मात्र, महावितरणकडून कृषीपंपासाठी २४ तासांऐवजी फक्त आठ तासांचा वीज पुरवठा केला गेला जात आहे. सध्या शेतात गहू पेरला असून, ऊसही गाळपासाठी उभा असून केवळ विजेअभावी पाणी देता येत नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची वेळ आली आहे.- मंगेश राजपूत (शेतकरी, वाळूज)

ग्रामीण भागात किती कृषी वीजग्राहकभाग - वीजग्राहकअजिंठा-९२९३औरंगाबाद -२८,२४९गंगापूर-२७,८६०कन्नड-१७,३८९खुलताबाद-११,२८१पैठण-२९,३५०फुलंब्री-१८,५२०पिशोर-१४,२४५सिल्लोड-२७,६५२वैजापूर-४०,१००

टॅग्स :agricultureशेतीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी