शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रात्री बारानंतर येते लाईट; अनंत अडचणींमुळे ओलितापेक्षा कोरडवाहूच बरे म्हणण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 13:33 IST

अनेक ठिकाणी बिबट्याच्या भीतीने रात्री पाणी देण्याचे धाडस होईना, पिकांचे नुकसान

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जिल्ह्यात कृषी वीज ग्राहकांना म्हणजे शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिवसा वीजपुरवठा होतो, तर काही ठिकाणी रात्री. चक्राकार पद्धतीने महावितरणकडून हा वीजपुरवठा होतो. मात्र, ज्या भागांत रात्री १२ वाजल्यानंतर वीज येते, तेथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी चोरांची, तर कधी बिबट्याची भीती असते. त्यामुळे रात्री अपरात्री शेतात ओलित कसे करायचे, त्यापेक्षा कोरडवाहूच बरे, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

गडचिरोली तालुक्यातील देसाईगंज तालुक्यातील धान उत्पादक व इतर शेतकऱ्यांना केवळ आठ तास वीजपुरवठा होत असल्यावरून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावर ताेडगा निघेपर्यंत २४ तास वीज देण्याचा निर्णय तेथील अधिकाऱ्यांनी घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात कृषी वीज ग्राहकांना सकाळी आठ तास आणि रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा केला जातो. यामध्ये काही ठिकाणी रात्री, तर काही ठिकाणी दिवसा वीज दिली जाते. रात्री वीज आली की शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात धाव घ्यावी लागते. शेतकऱ्यांना दिवसाच वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी होते.

चक्राकार पद्धतीने वीजपुरवठाकृषी वीज ग्राहकांना चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो. काही भागात रात्री, तर काही भागांत दिवस वीजपुरवठा होतो. वरिष्ठ कार्यालाकडून होणाऱ्या लोड मॅनेजमेंटनुसार हा पुरवठा होतो. रोटेशननुसार वीजपुरवठा होतो. त्यामुळे कधी दिवसा-तर कधी रात्री वीज मिळते.- प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता, औरंगाबाद ग्रामीण मंडळ

दिवसा वीज द्यावळदगाव परिसरात एक आठवडा सकाळी ८.३० ते सांयकाळी ४.३०, तर दुसऱ्या आठवड्यात मध्यरात्री १२.३० ते सकाळी ८.३० पर्यंत वीज पुरवठा केला. दिवसभरातून फक्त आठ तासच वीज मिळत असल्याने मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. अशातच वळदगाव शिवारात महिनाभरापूर्वी बिबट्याने दर्शन दिल्याने रात्री शेतकरी पाणी देण्यासाठी जात नसल्याने पिके वाळत चालली आहे. या परिसरात रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची गरज आहे.- कांतराव नवले (शेतकरी, वळदगाव)

विजेअभावी पिकांचे नुकसानयंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने विहिरीही तुडुंब भरल्या आहेत. मात्र, महावितरणकडून कृषीपंपासाठी २४ तासांऐवजी फक्त आठ तासांचा वीज पुरवठा केला गेला जात आहे. सध्या शेतात गहू पेरला असून, ऊसही गाळपासाठी उभा असून केवळ विजेअभावी पाणी देता येत नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची वेळ आली आहे.- मंगेश राजपूत (शेतकरी, वाळूज)

ग्रामीण भागात किती कृषी वीजग्राहकभाग - वीजग्राहकअजिंठा-९२९३औरंगाबाद -२८,२४९गंगापूर-२७,८६०कन्नड-१७,३८९खुलताबाद-११,२८१पैठण-२९,३५०फुलंब्री-१८,५२०पिशोर-१४,२४५सिल्लोड-२७,६५२वैजापूर-४०,१००

टॅग्स :agricultureशेतीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी