शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

पोलवरील रोहित्र अचानक खाली कोसळले, त्याखाली दबून पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2023 12:25 IST

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सरपंच आणि ग्रामस्थांनी केला आहे.

- श्रीकांत पोफळे

करमाड : पोलवरील रोहित्र अंगावर पडल्याने गाढेजळगाव ( ता. छत्रपती संभाजीनगर ) येथील पणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. शेख हयाज शेख नसरुद्दीन (४९) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ही घटना आज सकाळी 7 च्या सुमारास घडली. केवळ वायरच्या साह्याने लटकवलेले रोहित्र दोन दिवसांपासून आलेल्या वादळामुळे खाली पडले. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सरपंच आणि ग्रामस्थांनी केला.

काही दिवसांपूर्वी या डीपीवरील रोहित्र वारंटी काळात खराब झाल्याने ते बदलून येईपर्यंत महावितरणामार्फत दुसरे तात्पुरत्या स्वरूपाचे रोहित्र बसविण्यात आले होते. मात्र, हे बसवीत असताना त्याचे नटबोल्ट टाईट करण्यात आले नसावे. त्याला फक्त रोपवायरच्या सहाय्याने  लटकून दिले होते. दरम्यान, मागील दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वायर तुटून हे रोहित्र अचानक खाली पडले. दुर्दैवाने त्याचवेळी तेथे असणाऱ्या ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी शेख हयाज शेख नसरुद्दीन यांच्यावर रोहित्र पडले. अवजड रोहित्राखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, पाणीपुरवठा कर्मचारी हा कुठलीही कल्पना न देता त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी गेला. यावेळी त्याला विद्युत प्रवाहाचा धक्का लागला, यातच त्याचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती महावितरणमार्फत देण्यात येत आहे. मात्र, हा मृत्यू महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप सरपंच आणि ग्रामस्थांनी केला आहे. मयत फयाज हे भूमिहीन असून मंडप बांधायचे काम व ग्रामपंचायतमध्ये पाणीपुरवठ्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पाश्चात आई, तीन लहान बहिणी व एक लहान भाऊ आहे. या घरातील कमविता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. याबाबत पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद