शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

उन्हाळ्याची तयारी सुरू; महापालिका यंदा ऐतिहासिक नहर-ए-अंबरीचे पाणी वापरणार

By मुजीब देवणीकर | Updated: March 22, 2023 17:19 IST

हिमायत बागेच्या आसपास नहर-ए-अंबरीमधून १२ महिने शुद्ध पाणी वाहत असते.

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईच्या झळा बसणाऱ्या नागरिकांकडून आंदोलने केली जातात. शहराला काही प्रमाणात तरी दिलासा मिळावा म्हणून ऐतिहासिक नहर-ए-अंबरीतील पाण्याचा वापर यंदा करण्यात येणार आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने यादृष्टीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. 

जटवाडा येथील डोंगरातून विविध नहरींचा उगम होतो. शहरात तीन ते चारच नहर सध्या चांगल्या स्थितीत आहेत. उर्वरित नहरींची मागील काही वर्षांमध्ये प्रचंड तोडफोड करण्यात आली आहे. हिमायत बागेच्या आसपास नहर-ए-अंबरीमधून १२ महिने शुद्ध पाणी वाहत असते. या नहरीतून दररोज ४ ते ५ लाख लिटर पाण्याचा उपसा करून ते दिल्लीगेट येथील टाकीत आणण्यात येईल. विद्युत पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने स्वच्छतेची कामे हाती करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी दिल्या आहेत. यावेळी उपअभियंता एम. एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता आशिष वाणी, मोरे आदींची उपस्थिती होती.

जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरूहर्सूल तलावात मुबलक पाणी आहे. सध्या दररोज तलावातून दररोज ५ ते ७ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. या पाण्यावर तब्बल १६ वॉर्डांची तहान भागविण्यात येत आहे. तलावातून अतिरिक्त पाणी घेण्यासाठी मनपाकडे जलशुद्धीकरण केंद्र नाही. नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी मंगळवारी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचा तसेच पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका