शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

उन्हाळ्याची तयारी सुरू; महापालिका यंदा ऐतिहासिक नहर-ए-अंबरीचे पाणी वापरणार

By मुजीब देवणीकर | Updated: March 22, 2023 17:19 IST

हिमायत बागेच्या आसपास नहर-ए-अंबरीमधून १२ महिने शुद्ध पाणी वाहत असते.

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईच्या झळा बसणाऱ्या नागरिकांकडून आंदोलने केली जातात. शहराला काही प्रमाणात तरी दिलासा मिळावा म्हणून ऐतिहासिक नहर-ए-अंबरीतील पाण्याचा वापर यंदा करण्यात येणार आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने यादृष्टीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. 

जटवाडा येथील डोंगरातून विविध नहरींचा उगम होतो. शहरात तीन ते चारच नहर सध्या चांगल्या स्थितीत आहेत. उर्वरित नहरींची मागील काही वर्षांमध्ये प्रचंड तोडफोड करण्यात आली आहे. हिमायत बागेच्या आसपास नहर-ए-अंबरीमधून १२ महिने शुद्ध पाणी वाहत असते. या नहरीतून दररोज ४ ते ५ लाख लिटर पाण्याचा उपसा करून ते दिल्लीगेट येथील टाकीत आणण्यात येईल. विद्युत पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने स्वच्छतेची कामे हाती करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी दिल्या आहेत. यावेळी उपअभियंता एम. एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता आशिष वाणी, मोरे आदींची उपस्थिती होती.

जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरूहर्सूल तलावात मुबलक पाणी आहे. सध्या दररोज तलावातून दररोज ५ ते ७ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. या पाण्यावर तब्बल १६ वॉर्डांची तहान भागविण्यात येत आहे. तलावातून अतिरिक्त पाणी घेण्यासाठी मनपाकडे जलशुद्धीकरण केंद्र नाही. नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी मंगळवारी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचा तसेच पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका