शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीच्या पुस्तकांना पानांचे वजन सहन होईना; तीनच दिवसांत पाने साथ सोडू लागली

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 19, 2023 16:41 IST

निष्कृष्ट बांधणीने तीनच दिवसांत फाटू लागले नवीन पुस्तक

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी बालभारतीने यंदा अभिनव प्रयोग केला. ६ विषयांचे एकच पुस्तक तयार केले. पण निकृष्ट बांधणीमुळे पुस्तकाला २०० पानाचे ओझे सहन होईना, शाळा सुरू होऊन तीन दिवसात पुस्तकाची पाने साथ सोडू लागली आहेत. यासंदर्भात विद्यार्थी-पालक शाळेत तक्रार करीत आहेत; पण ‘घरीच पुस्तकाला पाने चिटकवून घ्या’ असा सल्ला शिक्षक देत आहेत. यामुळे पुस्तक बांधणीच्या गुणवत्ता तपासणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ या पथदर्शी प्रकल्प यंदा राबविण्यात येत आहे. विद्यार्थी एकाचवेळी सर्व विषयांचे पुस्तक दप्तरात नेत असे. त्याऐवजी सर्व विषयाचे मिळून एकच पुस्तक तयार करण्यात आले. मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते सातवीसाठी पाठ्यपुस्तकांचे चार भाग तयार करण्यात आले. चारही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. त्यातील भाग पहिला विद्यार्थी शाळेत घेऊन जात आहे. इयत्ता सातवीच्या पुस्तकात पहिल्या भागात १९४ पाने देण्यात आली आहेत. शाळा सुरू होऊन तीन दिवस झाली. वारंवार एकच पुस्तक हाताळले जात असल्याने पुस्तकाची पाने वेगवेगळी होऊ लागली आहेत. एकच नाही तर प्रत्येक शाळेत पुस्तक फाटल्याची तक्रारी विद्यार्थी करीत आहेत. काही पालकांनी पाने चिटकविली, तर काही पालकांनी जाड दोऱ्याने पुस्तक बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. बालभारती पुस्तकांची बांधणीची गुणवत्ता तपासते की नाही, असा प्रश्न आता यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. फाटके पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेत जावे का, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.

निकृष्ट बांधणी हेच मुख्य कारणविद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व विषयाचे एक पुस्तक असावे, ही चांगली कल्पना आहे. मात्र, एक पुस्तक २०० पानाचे झाले आहे. पुस्तक बांधणी ‘परफेक्ट बायडिंग’ या प्रकारातील आहे. पुस्तकाचे मागील भागात ‘गिल्व्ह’ (चिकट पदार्थ) लावून पाने व वरील कव्हर चिटकविले जाते. यात शिलाई कुठेच नसते किंवा पिनसुद्धा मारलेली नसते. ज्यावेळी पुस्तकाला २०० पेक्षा जास्त पाने होतात. तेव्हा चांगल्या दर्जाचे ‘गिल्व्ह’ वापरायला पाहिजे. म्हणजे पाने निघत नाही. मात्र, निकृष्ट गिल्व्ह वापरल्याने बालभारतीच्या पुस्तकाचे पाने निघत आहेत. पालकांकडून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत.- अविनाश फरसुले, व्यावसायिक

बालभारतीच्या भंडार व्यवस्थापकाकडे तक्रार दाखल करामहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ व पुस्तक बांधणीचे टेंडर घेणाऱ्यांमध्ये करार झालेला असतो, त्यानुसार पुस्तक खराब निघाले तर ते बदलून दिले जाते. पुस्तक विनाअनुदानित शाळांना बालभारतीचे पुस्तक व्यापारी विकतात. खराब, फाटलेले पुस्तक, खराब प्रिंटिंग असेल तर ते पुस्तक आम्ही बालभारतीच्या भंडार व्यवस्थापकांना परत करतो व त्या बदल्यात नवीन पुस्तक दिले जाते. शाळेतील शिक्षकांची जबाबदारी आहे की, त्यांनी मोफत मिळालेले पुस्तक पाठ्यपुस्तक मंडळाला द्यावी व नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना द्यावी.- सुनील अजमेरा, सहसचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद