शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

बालभारतीच्या पुस्तकांना पानांचे वजन सहन होईना; तीनच दिवसांत पाने साथ सोडू लागली

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 19, 2023 16:41 IST

निष्कृष्ट बांधणीने तीनच दिवसांत फाटू लागले नवीन पुस्तक

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी बालभारतीने यंदा अभिनव प्रयोग केला. ६ विषयांचे एकच पुस्तक तयार केले. पण निकृष्ट बांधणीमुळे पुस्तकाला २०० पानाचे ओझे सहन होईना, शाळा सुरू होऊन तीन दिवसात पुस्तकाची पाने साथ सोडू लागली आहेत. यासंदर्भात विद्यार्थी-पालक शाळेत तक्रार करीत आहेत; पण ‘घरीच पुस्तकाला पाने चिटकवून घ्या’ असा सल्ला शिक्षक देत आहेत. यामुळे पुस्तक बांधणीच्या गुणवत्ता तपासणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ या पथदर्शी प्रकल्प यंदा राबविण्यात येत आहे. विद्यार्थी एकाचवेळी सर्व विषयांचे पुस्तक दप्तरात नेत असे. त्याऐवजी सर्व विषयाचे मिळून एकच पुस्तक तयार करण्यात आले. मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते सातवीसाठी पाठ्यपुस्तकांचे चार भाग तयार करण्यात आले. चारही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. त्यातील भाग पहिला विद्यार्थी शाळेत घेऊन जात आहे. इयत्ता सातवीच्या पुस्तकात पहिल्या भागात १९४ पाने देण्यात आली आहेत. शाळा सुरू होऊन तीन दिवस झाली. वारंवार एकच पुस्तक हाताळले जात असल्याने पुस्तकाची पाने वेगवेगळी होऊ लागली आहेत. एकच नाही तर प्रत्येक शाळेत पुस्तक फाटल्याची तक्रारी विद्यार्थी करीत आहेत. काही पालकांनी पाने चिटकविली, तर काही पालकांनी जाड दोऱ्याने पुस्तक बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. बालभारती पुस्तकांची बांधणीची गुणवत्ता तपासते की नाही, असा प्रश्न आता यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. फाटके पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेत जावे का, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.

निकृष्ट बांधणी हेच मुख्य कारणविद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व विषयाचे एक पुस्तक असावे, ही चांगली कल्पना आहे. मात्र, एक पुस्तक २०० पानाचे झाले आहे. पुस्तक बांधणी ‘परफेक्ट बायडिंग’ या प्रकारातील आहे. पुस्तकाचे मागील भागात ‘गिल्व्ह’ (चिकट पदार्थ) लावून पाने व वरील कव्हर चिटकविले जाते. यात शिलाई कुठेच नसते किंवा पिनसुद्धा मारलेली नसते. ज्यावेळी पुस्तकाला २०० पेक्षा जास्त पाने होतात. तेव्हा चांगल्या दर्जाचे ‘गिल्व्ह’ वापरायला पाहिजे. म्हणजे पाने निघत नाही. मात्र, निकृष्ट गिल्व्ह वापरल्याने बालभारतीच्या पुस्तकाचे पाने निघत आहेत. पालकांकडून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत.- अविनाश फरसुले, व्यावसायिक

बालभारतीच्या भंडार व्यवस्थापकाकडे तक्रार दाखल करामहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ व पुस्तक बांधणीचे टेंडर घेणाऱ्यांमध्ये करार झालेला असतो, त्यानुसार पुस्तक खराब निघाले तर ते बदलून दिले जाते. पुस्तक विनाअनुदानित शाळांना बालभारतीचे पुस्तक व्यापारी विकतात. खराब, फाटलेले पुस्तक, खराब प्रिंटिंग असेल तर ते पुस्तक आम्ही बालभारतीच्या भंडार व्यवस्थापकांना परत करतो व त्या बदल्यात नवीन पुस्तक दिले जाते. शाळेतील शिक्षकांची जबाबदारी आहे की, त्यांनी मोफत मिळालेले पुस्तक पाठ्यपुस्तक मंडळाला द्यावी व नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना द्यावी.- सुनील अजमेरा, सहसचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद