शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

‘पुस्तकाचं गाव’ हरवलं; तुम्हाला सापडलं का? घोषणा हवेतच विरली, पुस्तकप्रेमींचा भ्रमनिरास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 20:03 IST

‘पुस्तकाचं गाव’ हरवलं; तुम्हाला सापडलं का? पुस्तकप्रेमींचा भ्रमनिराश; चार वर्षांपूर्वीची घोषणा हवेतच विरली

छत्रपती संभाजीनगर : राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, यादृष्टीने राज्य शासनाने साधारणपणे चार वर्षांपूर्वी ‘पुस्तकाचे गाव’ ही योजना जाहीर केली होती. या योजनेसाठी आपल्या जिल्ह्यातील वेरुळ हे गाव निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ही योजना वेरूळ येथे प्रत्यक्षात आजपर्यंत अंमलात आलीच नाही, हे पुस्तकप्रेमी आणि अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे.

राज्य शासनाने सन २०१९-२० मध्ये पुस्तकांचे गाव या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वेरूळसह गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले आणि सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (औदुंबर) या चार जिल्ह्यांत पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करण्यास मान्यता दिली. या योजनेंतर्गत गावामध्ये विविध साहित्य प्रकारांची विभागणी करून १० दालने तयार करणे, या दालनांमध्ये वाचकांना सर्व प्रकारची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देणे, त्यातील एका दालनात मराठी भाषा विभागाची विविध प्रकाशने उपलब्ध करण्याचे जाहीर केले होते. एवढेच नव्हे, तर येथे पर्यटक सुद्धा आकर्षित व्हावेत यासाठी गावामध्ये भिंती रंगवून वातावरण निर्मिती करण्यात यावी, अशी सूचनाही मंत्री केसरकर यांनी राज्य मराठी विकास संस्थेस देऊन या दालनांसाठी प्रत्येकी एक हजार दर्जेदार पुस्तकांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते.

पुस्तकाचं गाव; चार वर्षांपूर्वी घोषणाशासनाने साधारणपणे चार वर्षांपूर्वी राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, या हेतूने पुस्तकाचं गाव योजना राबविण्याची घोषणा केली होती.

वेरूळ गावची केली होती निवडपुस्तकाचं गाव ही योजना राबविण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील वेरूळ गावाची निवड करण्यात आली होती.

‘पुस्तकाचं गाव’मधून काय साध्य होणार? या योजनेच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा तसेच पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

दर्जेदार पुस्तकं वाचायला मिळणारपुस्तकाचं गाव या योजनेची अंमलबजावणी झाली असती, तर पुस्तकप्रेमींना सर्व प्रकारची १ हजार दर्जेदार पुस्तके वाचनासाठी उपलब्ध झाली असती.

‘पुस्तकाचं गाव’ योजनेची पानं मिटली? या योजनेची घोषणा झाली. पण, पुढे यासंदर्भात शासनाकडून कसल्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हर्षोल्हासित झालेल्या वाचकांचा भ्रमनिराश झाला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरliteratureसाहित्य