शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

‘पुस्तकाचं गाव’ हरवलं; तुम्हाला सापडलं का? घोषणा हवेतच विरली, पुस्तकप्रेमींचा भ्रमनिरास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 20:03 IST

‘पुस्तकाचं गाव’ हरवलं; तुम्हाला सापडलं का? पुस्तकप्रेमींचा भ्रमनिराश; चार वर्षांपूर्वीची घोषणा हवेतच विरली

छत्रपती संभाजीनगर : राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, यादृष्टीने राज्य शासनाने साधारणपणे चार वर्षांपूर्वी ‘पुस्तकाचे गाव’ ही योजना जाहीर केली होती. या योजनेसाठी आपल्या जिल्ह्यातील वेरुळ हे गाव निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ही योजना वेरूळ येथे प्रत्यक्षात आजपर्यंत अंमलात आलीच नाही, हे पुस्तकप्रेमी आणि अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे.

राज्य शासनाने सन २०१९-२० मध्ये पुस्तकांचे गाव या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वेरूळसह गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले आणि सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (औदुंबर) या चार जिल्ह्यांत पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करण्यास मान्यता दिली. या योजनेंतर्गत गावामध्ये विविध साहित्य प्रकारांची विभागणी करून १० दालने तयार करणे, या दालनांमध्ये वाचकांना सर्व प्रकारची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देणे, त्यातील एका दालनात मराठी भाषा विभागाची विविध प्रकाशने उपलब्ध करण्याचे जाहीर केले होते. एवढेच नव्हे, तर येथे पर्यटक सुद्धा आकर्षित व्हावेत यासाठी गावामध्ये भिंती रंगवून वातावरण निर्मिती करण्यात यावी, अशी सूचनाही मंत्री केसरकर यांनी राज्य मराठी विकास संस्थेस देऊन या दालनांसाठी प्रत्येकी एक हजार दर्जेदार पुस्तकांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते.

पुस्तकाचं गाव; चार वर्षांपूर्वी घोषणाशासनाने साधारणपणे चार वर्षांपूर्वी राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, या हेतूने पुस्तकाचं गाव योजना राबविण्याची घोषणा केली होती.

वेरूळ गावची केली होती निवडपुस्तकाचं गाव ही योजना राबविण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील वेरूळ गावाची निवड करण्यात आली होती.

‘पुस्तकाचं गाव’मधून काय साध्य होणार? या योजनेच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा तसेच पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

दर्जेदार पुस्तकं वाचायला मिळणारपुस्तकाचं गाव या योजनेची अंमलबजावणी झाली असती, तर पुस्तकप्रेमींना सर्व प्रकारची १ हजार दर्जेदार पुस्तके वाचनासाठी उपलब्ध झाली असती.

‘पुस्तकाचं गाव’ योजनेची पानं मिटली? या योजनेची घोषणा झाली. पण, पुढे यासंदर्भात शासनाकडून कसल्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हर्षोल्हासित झालेल्या वाचकांचा भ्रमनिराश झाला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरliteratureसाहित्य