शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

‘पुस्तकाचं गाव’ हरवलं; तुम्हाला सापडलं का? घोषणा हवेतच विरली, पुस्तकप्रेमींचा भ्रमनिरास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 20:03 IST

‘पुस्तकाचं गाव’ हरवलं; तुम्हाला सापडलं का? पुस्तकप्रेमींचा भ्रमनिराश; चार वर्षांपूर्वीची घोषणा हवेतच विरली

छत्रपती संभाजीनगर : राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, यादृष्टीने राज्य शासनाने साधारणपणे चार वर्षांपूर्वी ‘पुस्तकाचे गाव’ ही योजना जाहीर केली होती. या योजनेसाठी आपल्या जिल्ह्यातील वेरुळ हे गाव निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ही योजना वेरूळ येथे प्रत्यक्षात आजपर्यंत अंमलात आलीच नाही, हे पुस्तकप्रेमी आणि अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे.

राज्य शासनाने सन २०१९-२० मध्ये पुस्तकांचे गाव या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वेरूळसह गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले आणि सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (औदुंबर) या चार जिल्ह्यांत पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करण्यास मान्यता दिली. या योजनेंतर्गत गावामध्ये विविध साहित्य प्रकारांची विभागणी करून १० दालने तयार करणे, या दालनांमध्ये वाचकांना सर्व प्रकारची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देणे, त्यातील एका दालनात मराठी भाषा विभागाची विविध प्रकाशने उपलब्ध करण्याचे जाहीर केले होते. एवढेच नव्हे, तर येथे पर्यटक सुद्धा आकर्षित व्हावेत यासाठी गावामध्ये भिंती रंगवून वातावरण निर्मिती करण्यात यावी, अशी सूचनाही मंत्री केसरकर यांनी राज्य मराठी विकास संस्थेस देऊन या दालनांसाठी प्रत्येकी एक हजार दर्जेदार पुस्तकांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते.

पुस्तकाचं गाव; चार वर्षांपूर्वी घोषणाशासनाने साधारणपणे चार वर्षांपूर्वी राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, या हेतूने पुस्तकाचं गाव योजना राबविण्याची घोषणा केली होती.

वेरूळ गावची केली होती निवडपुस्तकाचं गाव ही योजना राबविण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील वेरूळ गावाची निवड करण्यात आली होती.

‘पुस्तकाचं गाव’मधून काय साध्य होणार? या योजनेच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा तसेच पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

दर्जेदार पुस्तकं वाचायला मिळणारपुस्तकाचं गाव या योजनेची अंमलबजावणी झाली असती, तर पुस्तकप्रेमींना सर्व प्रकारची १ हजार दर्जेदार पुस्तके वाचनासाठी उपलब्ध झाली असती.

‘पुस्तकाचं गाव’ योजनेची पानं मिटली? या योजनेची घोषणा झाली. पण, पुढे यासंदर्भात शासनाकडून कसल्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हर्षोल्हासित झालेल्या वाचकांचा भ्रमनिराश झाला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरliteratureसाहित्य