शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाची लढाई जोमाने लढावी लागेल: संजय शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:18 IST

मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, मसिआ आणि टीम ऑफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात रविवारी दुसरी जलसंवाद परिषद पार पडली.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याने पाणी मागताच, अहिल्यानगर आणि नाशिकचे पुढारी हे पाणी जणू पाकिस्तानला चालले आहे, अशा पद्धतीची भूमिका घेतात. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतोय. पक्षीय लेबल बाजूला ठेवून मराठवाड्याचे सर्व आमदार, खासदार एकत्र आले तरच पाणीप्रश्न सुटेल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी येथे जलसंवाद परिषदेत केले.

मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, मसिआ आणि टीम ऑफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात रविवारी दुसरी जलसंवाद परिषद पार पडली. पालकमंत्री संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, धाराशिवचे आ. कैलास पाटील, आ. अनुराधा चव्हाण, माजी आ. राजेश टोपे, सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, जलतज्ज्ञ डॉ. या. रा. जाधव, संजय लाखे पाटील, आयोजक डॉ. शंकर नागरे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, रमाकांत पुलकुंडवार, अभियंता जयसिंह हिरे, सर्जेराव वाघ आणि महेंद्र वडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोपट्यांना पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. संजय शिरसाट म्हणाले की, पाणीप्रश्नासंदर्भात अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील जनतेचा उठाव नाही, परंतु तेथील पुढारी जाणूनबुजून माथी भडकवण्यासाठी मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करतात आणि त्यांचा प्रदेश सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी प्रयत्न करतोय, हे दाखवतात. या परिषदेकडे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याबाबत ते म्हणाले की, जनता पाण्याच्या प्रश्नांवर कान टोचत नसल्याने त्यांना गांभीर्य नाही. रमाकांत पुलकुंडवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नागरे, हिरे आणि वडगावकर यांनी मराठवाड्याच्या जलस्थितीचे सादरीकरण केले.

दबाव गट करावाआजपर्यंत आयोजित सर्व पाणी परिषदेला आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआरमध्ये समन्यायी पाणीवाटपाबाबत उल्लेख आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने असलेल्या गोष्टी त्यात आहेत. त्यांची अंमलबजावणी व्हावी. मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी दबावगट निर्माण करावा.- राजेश टोपे, माजी मंत्री

मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र यावेमराठवाड्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यांना याबाबत कळत नाही की जाणून घ्यायची इच्छा नाही? एकूणच जनरेटा त्यांच्यामागे नाही. म्हणूनच ते याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते. समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पाणी मिळावे.- आ. कैलास पाटील

आमच्या धरणातून शहापूरला पाणी नकोदुष्काळग्रस्त वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यांसाठी नाशिक जिल्ह्यात बांधलेल्या भाम, वाकी, भावली आणि मुकणे इ. धरणांतील पाणी २५ टक्के पाणीही आम्हाला मिळत नाही. कायद्यानुसार हे पाणी देता येत नाही. असे असताना मुबलक पाणी असलेल्या शहापूरला आमच्या प्रकल्पावर पाणीपुरवठा याेजना आणली, हे कायद्याच्या विरोधात आहे.- आ. रमेश बोरनारे

मराठवाड्यातील आमदारांनी एकत्र येणे गरजेचेमराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदारांनी एकत्र येऊन पाणीप्रश्न सोडविणे शक्य आहे, कारण आपली बाजू सत्याची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याला देण्यास तयार आहेत, परंतु मराठवाड्यातील आमदारांची साथ नसल्याने तेही काही करू शकत नसल्याचे दिसते. यातून मराठवाड्याचे नुकसान होतेय.- आ. प्रशांत बंब

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSanjay Shirsatसंजय शिरसाटJayakwadi Damजायकवाडी धरण