शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

‘खुद की बॅग खुदने संभालनी चाहिए’; उद्योजकाने विनंती केली अन् रतन टाटा उद्गारले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 13:18 IST

२४ वर्षांपूर्वी रतन टाटांच्या हस्ते झाले होते छत्रपती संभाजीनगर मधील डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा १० नोव्हेंबर २००० या दिवशी शहरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे उद्घाटन झाले होते. हा शानदार सोहळा अजूनही शहरवासीयांच्या स्मरणात आहे.

उद्घाटनप्रसंगी टाटा म्हणाले होते की, शासनाच्या मदतीशिवाय लोकांच्या सहभागातून हेडगेवार रुग्णालयासारख्या संस्था उभ्या राहतात. अशाच संस्था जागोजागी उभ्या राहिल्या पाहिजे. वैद्यकीय व्यवसायात ज्याप्रमाणे एकत्र येऊन काम केले जाते, तसेच अन्य क्षेत्रातही काम झाले तर देश उभारणीसाठी मदत होईल. जागतिकीकरणामुळे आज आपण जवळ येत आहोत. जग हे एक खेडे बनत चालले आहे. अशा वेळी रुग्णांच्या सेवेत इमारत उभारण्यात येते, यासाठी सरकारची मदत घेतली जात नाही. समाजातील श्रीमंतांनी आपण समाजाचे काही देणे लागतो, असे समजून पुढे आले पाहिजे. त्या सोहळ्यात तत्कालीन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री राजेंद्र दर्डा तसेच प्रांत संघचालक डॉ. अशोक कुकडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या सोहळ्यात भाषणात बरेच हास्यविनोदही झाले होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्राॅफ, माजी खा. मोरेश्वर सावे, आ. हरिभाऊ बागडे, शरद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

खरात गुरुजींसाठी केली होती प्रार्थनाडॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बौद्ध महासंघ सभाचे कार्यकर्ते जी.आर. खरात यांना अचानक चक्कर आली होती. लगेच त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. रतन टाटा यांनी आपल्या भाषणात त्यांचा उल्लेख केला. खरात गुरुजींना लवकर आराम मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली होती.

अन् रतन टाटा उद्गारले, ‘खुद की बॅग खुदने संभालनी चाहिए’छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या उद्घाटनाला प्रसिद्ध उद्योगपती रतर टाटा आले होते. मुंबईहून हेलिकॉप्टरने ते निघाले. त्यांच्यासमवेत नितीन गडकरी व छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक विवेक देशपांडे होते. हेलिकॉप्टरमध्ये रतन टाटा यांच्या हातात एक छोटी बॅग होती. देशपांडे त्यांना म्हणाले, ती बॅग माझ्याकडे द्या, मी सांभाळतो. त्यावर रतन टाटा उद्गारले, ‘खुद की बॅग खुदने संभालनी चाहिए’. यातून मी खूप काही शिकलो. मोठा- छोटा हा भेद त्यांनी केला नाही. ते सर्वांना बरोबरीची वागणूक देत होते. उद्योगपती असण्याचा कुठलाही आव त्यांच्याकडे नव्हता, अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRatan Tataरतन टाटाNitin Gadkariनितीन गडकरी