शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना प्रशासनाचा दे धक्का; नवीन प्रभाग आराखड्यावर सर्वपक्षीय नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 14:18 IST

शिवसेनेच्या बहुतांश प्रभागांना जेथून मतदानच मिळत नाही, अशा वसाहती जोडण्यात आल्या आहेत. तर विरोधी बाकावर असलेल्या भाजपची अवस्था ही खूप चांगली नाही.

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी महापालिकेकडे अंतिम प्रभाग आराखडा सुपूर्द केला. त्यानंतर प्रशासनाने लगेच आराखडा प्रसिद्ध केला. हा आराखडा पाहून प्रमुख राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकही या आराखड्यावर खूश नाहीत. काही मोजक्याच राजकीय मंडळींना अभय देण्यात आले आहे, अशी चर्चा रंगली आहे.

मागील आठवड्यात व्हायरल झालेला आराखडा आणि गुरुवारी प्रसिद्ध झालेला आराखडा यामध्ये थोडाफार बदल करण्यात आला आहे. आयोगाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम आराखड्यात शिवसेनेला मोठा दिलासा मिळेल, असे मानले जात होते. मात्र, ते यात दिसत नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडी वाॅर्डाचे तुकडे करण्यात आलेत. मागील २० वर्षांपासून महापालिकेत अधिराज्य गाजविणाऱ्या शिवसेनेतील दिग्गज नगरसेवकांना या प्रभाग रचनेत धक्का बसला आहे. शिवसेनेच्या बहुतांश प्रभागांना जेथून मतदानच मिळत नाही, अशा वसाहती जोडण्यात आल्या आहेत.

विरोधी बाकावर असलेल्या भाजपची अवस्था खूप चांगली नाही. ज्या वॉर्डातून भाजपचे नगरसेवक डोळे बंद करून निवडून यायचे, त्यांना आता मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. भौगोलिकदृष्ट्या काही प्रभाग अत्यंत मोठे, तर काही प्रभाग अत्यंत छोटे करण्यात आले. भाजपच्या मिशन ६० या मोहिमेला खीळ बसली आहे. एका प्रभागात भाजपचे तीन उमेदवार सहजासहजी निवडून येणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे.२०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एमआयएम या नव्या पक्षाने महापालिकेत तब्बल २४ नगरसेवक निवडून आले होते. नवीन प्रभाग रचनेत मुस्लिमबहुल भागातील प्रभागात एमआयएम दृष्टीने सोयीचे राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, प्रसिद्ध आराखडा पाहून एमआयएमच्या माजी नगरसेवकांनाही मोठा धक्का बसला. अनेक प्रभागांना हिंदू बहुल भाग जोडण्यात आले आहेत.

काय म्हणतात राजकीय पक्षांचे नेते: 

निकषांचे उल्लंघनशिवसेनेच्या दृष्टीने प्रभाग आराखडा अजिबात सोयीचा नाही. मोजकेच एक किंवा दोन प्रभाग सोडले, तर सर्वच ठिकाणी आलबेल कारभार दिसून येतो. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषांचे उल्लंघन होताना दिसून येते. सूचना आणि हरकतीद्वारे आम्ही आक्षेप घेणार आहोत.- नंदकुमार घोडेले, माजी महापौर

आक्षेप दाखल करणारप्रभाग आराखड्याचा बारकाईने अभ्यास केला असता अनेक प्रभागांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. नको असलेल्या वसाहती जोडण्यात आल्या आहेत. या वसाहती जोडताना कोणत्या निकषांचे पालन केले, हे कळायला मार्ग नाही. आम्ही मोठ्या प्रमाणात आक्षेप दाखल करणार आहोत. गरज पडली तर न्यायालयात सुद्धा जाण्याची तयारी केली जाईल.- बापू घडामोडे, माजी महापौर

ताळमेळ बसत नाहीप्रभाग रचनेचा आराखडा तयार करताना कोणत्या नियमांचे पालन केले, हे कळत नाही. तीन विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या आणि महापालिका हद्दीतील लोकसंख्या याचा ताळमेळ बसत नाही. प्रभाग तयार करताना मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा घोळ घालण्यात आला आहे. आम्ही याचा कडाडून विरोध करणार आहोत.- नासेर सिद्दिकी, माजी गटनेता एमआयएम.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका