शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

'तो' पराक्रम प्राध्यापकांचा! ३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघांवर गुन्हा

By विजय सरवदे | Updated: May 26, 2023 12:09 IST

भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली.

छत्रपती संभाजीनगर : बोर्डाची झोप उडवून टाकणाऱ्या त्या ३७२ उत्तरपत्रिकांचा गुंता अखेर निकालाच्या दिवशीच सुटला. याप्रकरणी फर्दापूर ठाण्यात सोयगाव तालुक्यातील दोन प्राध्यापकांसह त्यांना मदत करणाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एका प्राध्यापिकेचाही समावेश आहे, हे विशेष!

याप्रकरणी राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळा (ता. सोयगाव) येथील प्रा. राहुल भगवानसिंग उसारे आणि याच महाविद्यालयाच्या धनवट येथील प्रा. मनीषा भागवत - शिंदे यांच्यासह पडद्यामागील साथीदारांवर ४२०, ४६८, ४६९, ४७१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली. या उत्तरपत्रिका प्रामुख्याने बीड व हिंगोली जिल्ह्यातील आहेत. बोर्ड अधिकाऱ्यांनी ९ ते १३ मे दरम्यान सुमारे ४००हून अधिक विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. विद्यार्थी व पालकांनी या प्रकरणाशी आमचा कसलाही संबंध नसल्याचे चौकशीदरम्यान लेखी दिले. त्यानंतर बोर्डाने केंद्र संचालक, कस्टोडियन, पर्यवेक्षकांची चौकशी केली. तरीही या प्रकरणाच्या मुळापर्यंत बोर्डाला पोहोचता आले नाही. त्यानंतर यापैकी ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर असल्याचा निष्कर्ष तदर्थ समितीने काढला आणि संपूर्ण यंत्रणाच हादरून गेली. उत्तरपत्रिकांना नेमके पाय फुटले कसे व कोठून, उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडला की, त्याच्या संमतीने दुसऱ्याने कोणी उत्तरे लिहिली, हे सारेच प्रश्न अनुत्तरीत होते.

दरम्यान, प्रा. राहुल उसारे आणि प्रा. मनीषा शिंदे यांच्याकडे या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या. १३ मार्चपर्यंत या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे आदेश असताना या दोघांनी त्यानंतर तब्बल २५ दिवस त्या स्वतःकडे ठेवून घेतल्या. नंतर ८ एप्रिल रोजी त्या बोर्डाकडे जमा केल्या. बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचा हा प्रसंग समोर आला. दरम्यान, या प्रकारामुळे त्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती. मात्र, बोर्डाने हस्ताक्षरातील मजकूर वगळून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केलेे व त्यांचा निकाल जाहीर केला.

आता पोलिस या उत्तरपत्रिकांत का, कशासाठी आणि कोणी उत्तरे लिहायला लावली, याचा शोध घेतीलच. परंतु, या प्रकरणात संशयाची सुई थेट विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा जाऊ शकते. त्यामुळे या दोन शिक्षकांशिवाय अनेक लोक या प्रक्रियेत सहभागी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी