शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

'तो' पराक्रम प्राध्यापकांचा! ३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघांवर गुन्हा

By विजय सरवदे | Updated: May 26, 2023 12:09 IST

भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली.

छत्रपती संभाजीनगर : बोर्डाची झोप उडवून टाकणाऱ्या त्या ३७२ उत्तरपत्रिकांचा गुंता अखेर निकालाच्या दिवशीच सुटला. याप्रकरणी फर्दापूर ठाण्यात सोयगाव तालुक्यातील दोन प्राध्यापकांसह त्यांना मदत करणाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एका प्राध्यापिकेचाही समावेश आहे, हे विशेष!

याप्रकरणी राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळा (ता. सोयगाव) येथील प्रा. राहुल भगवानसिंग उसारे आणि याच महाविद्यालयाच्या धनवट येथील प्रा. मनीषा भागवत - शिंदे यांच्यासह पडद्यामागील साथीदारांवर ४२०, ४६८, ४६९, ४७१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली. या उत्तरपत्रिका प्रामुख्याने बीड व हिंगोली जिल्ह्यातील आहेत. बोर्ड अधिकाऱ्यांनी ९ ते १३ मे दरम्यान सुमारे ४००हून अधिक विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. विद्यार्थी व पालकांनी या प्रकरणाशी आमचा कसलाही संबंध नसल्याचे चौकशीदरम्यान लेखी दिले. त्यानंतर बोर्डाने केंद्र संचालक, कस्टोडियन, पर्यवेक्षकांची चौकशी केली. तरीही या प्रकरणाच्या मुळापर्यंत बोर्डाला पोहोचता आले नाही. त्यानंतर यापैकी ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर असल्याचा निष्कर्ष तदर्थ समितीने काढला आणि संपूर्ण यंत्रणाच हादरून गेली. उत्तरपत्रिकांना नेमके पाय फुटले कसे व कोठून, उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडला की, त्याच्या संमतीने दुसऱ्याने कोणी उत्तरे लिहिली, हे सारेच प्रश्न अनुत्तरीत होते.

दरम्यान, प्रा. राहुल उसारे आणि प्रा. मनीषा शिंदे यांच्याकडे या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या. १३ मार्चपर्यंत या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे आदेश असताना या दोघांनी त्यानंतर तब्बल २५ दिवस त्या स्वतःकडे ठेवून घेतल्या. नंतर ८ एप्रिल रोजी त्या बोर्डाकडे जमा केल्या. बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचा हा प्रसंग समोर आला. दरम्यान, या प्रकारामुळे त्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती. मात्र, बोर्डाने हस्ताक्षरातील मजकूर वगळून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केलेे व त्यांचा निकाल जाहीर केला.

आता पोलिस या उत्तरपत्रिकांत का, कशासाठी आणि कोणी उत्तरे लिहायला लावली, याचा शोध घेतीलच. परंतु, या प्रकरणात संशयाची सुई थेट विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा जाऊ शकते. त्यामुळे या दोन शिक्षकांशिवाय अनेक लोक या प्रक्रियेत सहभागी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी