शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'तो' पराक्रम प्राध्यापकांचा! ३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघांवर गुन्हा

By विजय सरवदे | Updated: May 26, 2023 12:09 IST

भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली.

छत्रपती संभाजीनगर : बोर्डाची झोप उडवून टाकणाऱ्या त्या ३७२ उत्तरपत्रिकांचा गुंता अखेर निकालाच्या दिवशीच सुटला. याप्रकरणी फर्दापूर ठाण्यात सोयगाव तालुक्यातील दोन प्राध्यापकांसह त्यांना मदत करणाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एका प्राध्यापिकेचाही समावेश आहे, हे विशेष!

याप्रकरणी राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळा (ता. सोयगाव) येथील प्रा. राहुल भगवानसिंग उसारे आणि याच महाविद्यालयाच्या धनवट येथील प्रा. मनीषा भागवत - शिंदे यांच्यासह पडद्यामागील साथीदारांवर ४२०, ४६८, ४६९, ४७१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली. या उत्तरपत्रिका प्रामुख्याने बीड व हिंगोली जिल्ह्यातील आहेत. बोर्ड अधिकाऱ्यांनी ९ ते १३ मे दरम्यान सुमारे ४००हून अधिक विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. विद्यार्थी व पालकांनी या प्रकरणाशी आमचा कसलाही संबंध नसल्याचे चौकशीदरम्यान लेखी दिले. त्यानंतर बोर्डाने केंद्र संचालक, कस्टोडियन, पर्यवेक्षकांची चौकशी केली. तरीही या प्रकरणाच्या मुळापर्यंत बोर्डाला पोहोचता आले नाही. त्यानंतर यापैकी ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर असल्याचा निष्कर्ष तदर्थ समितीने काढला आणि संपूर्ण यंत्रणाच हादरून गेली. उत्तरपत्रिकांना नेमके पाय फुटले कसे व कोठून, उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडला की, त्याच्या संमतीने दुसऱ्याने कोणी उत्तरे लिहिली, हे सारेच प्रश्न अनुत्तरीत होते.

दरम्यान, प्रा. राहुल उसारे आणि प्रा. मनीषा शिंदे यांच्याकडे या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या. १३ मार्चपर्यंत या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे आदेश असताना या दोघांनी त्यानंतर तब्बल २५ दिवस त्या स्वतःकडे ठेवून घेतल्या. नंतर ८ एप्रिल रोजी त्या बोर्डाकडे जमा केल्या. बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचा हा प्रसंग समोर आला. दरम्यान, या प्रकारामुळे त्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती. मात्र, बोर्डाने हस्ताक्षरातील मजकूर वगळून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केलेे व त्यांचा निकाल जाहीर केला.

आता पोलिस या उत्तरपत्रिकांत का, कशासाठी आणि कोणी उत्तरे लिहायला लावली, याचा शोध घेतीलच. परंतु, या प्रकरणात संशयाची सुई थेट विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा जाऊ शकते. त्यामुळे या दोन शिक्षकांशिवाय अनेक लोक या प्रक्रियेत सहभागी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी