शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अधिकारी बदलतील, ठाणेदाराचा मोबाईल नंबर असेल 'तोच'; छत्रपती संभाजीनगरात पोलिसांचा मोठा निर्णय

By बापू सोळुंके | Updated: May 27, 2023 19:58 IST

छत्रपती संभाजीनगरात पोलीस आयुक्तांचा स्तूत्य निर्णय; 'वन युनीट, वन ऑफिसर वन मोबाइल' योजनेंतर्गत सर्व ठाणेदारांना कायमस्वरूपी मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: शासकीय नियमानुसार पोलीस ठाणे प्रमुखांच्या बदल्या होतील, ते दुसरीकडे रूजू होतील पण पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराचा मोबाइल नंबर मात्र बदलणार नाही. कारण पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या संकल्पनेनुसार 'वन युनीट, वन ऑफिसर वन मोबाइल' या योजनेंतर्गत सर्व ठाणेदारांना कायमस्वरूपी मोबाइल क्रमांक देण्यात आले आहे.एका अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर ठाणेदार म्हणून ते वापरत असलेला मोबाइलक्रमांक नव्या ठाणेदाराकडे देऊन जातील.

या योजनेविषयी अधिक माहिती देताना शहराचे पाेलीस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले की,  सामान्य जनता आणि पोलीस अधिकारी यांच्यात कायम सुसंवाद असावा, संकट समयी सहज पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर संपर्क करता यावा, यासाठी वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल ही संकल्पना पुढे आली आहे. विद्यमान ठाणेदाराचा मोबाइल क्रमांक नागरीकांकडे असतो. कालांतराने एखाद्या संकटसमयी नागरीक जेव्हा त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधतात, तेव्हा त्या अधिकाऱ्याचा मोबाइल लागत नाही अथवा त्या अधिकाऱ्याची दुसरीकडे बदली झाल्याचे त्यांना समजते. नव्या अधिकाऱ्यााच मोबाइल माहिती नसल्याने  वेळेत संपर्क होऊ न शकल्यास संकटसमयी तातडीने  मदत मिळत नाही. 

यापुढे असे होऊ नये, यासाठी वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल संकल्पना आहे. बदलीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी नव्या ठाणेदाराकडे चार्ज देताना तो त्यांचा मोबाइल सीम देईल. यामुळे  ठाणेदाराचा मोबाईल क्रमांक कायम असेल. अशाप्रकारे वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल वापरणारे राज्यातील पहिले पोलीस आयुक्तालय ठरणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी नमूद केले.  १ जूनपासून शहर पोलीस दलात राबविण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस निरीक्षक गीता बागवडे आणि पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना अधिकाऱ्यांच्या नवीन नंबरचे फलक पोलीस आयुक्तांनी दिले. यापत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, उपायुक्त शिलवंत नांदेडकर आणि गुन्हेशाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती.

संवेदनशील ठिकाणी असेल २४ तास राहुटीशहरातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील कॉलनी, चौकात आता कायमस्वरुपी सशस्त्र पोलिसांची राहुटी असेल. यासोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यात दंगा काबू पथकाला आवश्यक शस्त्र आणि साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात येणार आहे. जेणेकरून ऐनवेळी ही साहित्य घेऊन पोलीस घटनास्थळी तात्काळ पेाहचतील. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस