शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अधिकारी बदलतील, ठाणेदाराचा मोबाईल नंबर असेल 'तोच'; छत्रपती संभाजीनगरात पोलिसांचा मोठा निर्णय

By बापू सोळुंके | Updated: May 27, 2023 19:58 IST

छत्रपती संभाजीनगरात पोलीस आयुक्तांचा स्तूत्य निर्णय; 'वन युनीट, वन ऑफिसर वन मोबाइल' योजनेंतर्गत सर्व ठाणेदारांना कायमस्वरूपी मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: शासकीय नियमानुसार पोलीस ठाणे प्रमुखांच्या बदल्या होतील, ते दुसरीकडे रूजू होतील पण पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराचा मोबाइल नंबर मात्र बदलणार नाही. कारण पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या संकल्पनेनुसार 'वन युनीट, वन ऑफिसर वन मोबाइल' या योजनेंतर्गत सर्व ठाणेदारांना कायमस्वरूपी मोबाइल क्रमांक देण्यात आले आहे.एका अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर ठाणेदार म्हणून ते वापरत असलेला मोबाइलक्रमांक नव्या ठाणेदाराकडे देऊन जातील.

या योजनेविषयी अधिक माहिती देताना शहराचे पाेलीस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले की,  सामान्य जनता आणि पोलीस अधिकारी यांच्यात कायम सुसंवाद असावा, संकट समयी सहज पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर संपर्क करता यावा, यासाठी वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल ही संकल्पना पुढे आली आहे. विद्यमान ठाणेदाराचा मोबाइल क्रमांक नागरीकांकडे असतो. कालांतराने एखाद्या संकटसमयी नागरीक जेव्हा त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधतात, तेव्हा त्या अधिकाऱ्याचा मोबाइल लागत नाही अथवा त्या अधिकाऱ्याची दुसरीकडे बदली झाल्याचे त्यांना समजते. नव्या अधिकाऱ्यााच मोबाइल माहिती नसल्याने  वेळेत संपर्क होऊ न शकल्यास संकटसमयी तातडीने  मदत मिळत नाही. 

यापुढे असे होऊ नये, यासाठी वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल संकल्पना आहे. बदलीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी नव्या ठाणेदाराकडे चार्ज देताना तो त्यांचा मोबाइल सीम देईल. यामुळे  ठाणेदाराचा मोबाईल क्रमांक कायम असेल. अशाप्रकारे वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल वापरणारे राज्यातील पहिले पोलीस आयुक्तालय ठरणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी नमूद केले.  १ जूनपासून शहर पोलीस दलात राबविण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस निरीक्षक गीता बागवडे आणि पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना अधिकाऱ्यांच्या नवीन नंबरचे फलक पोलीस आयुक्तांनी दिले. यापत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, उपायुक्त शिलवंत नांदेडकर आणि गुन्हेशाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती.

संवेदनशील ठिकाणी असेल २४ तास राहुटीशहरातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील कॉलनी, चौकात आता कायमस्वरुपी सशस्त्र पोलिसांची राहुटी असेल. यासोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यात दंगा काबू पथकाला आवश्यक शस्त्र आणि साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात येणार आहे. जेणेकरून ऐनवेळी ही साहित्य घेऊन पोलीस घटनास्थळी तात्काळ पेाहचतील. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस