शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

सायबर सेलला ठाण्याचा दर्जा, तरीही तक्रार पहिल्यांदा आवक-जावक विभागात देण्याचा सल्ला

By सुमित डोळे | Updated: October 14, 2023 18:55 IST

....मग सायबर सेलला ठाण्याचा दर्जा मिळून उपयोग तरी काय? 

छत्रपती संभाजीनगर : सायबर पोलिस ठाणे असूनही येथे अद्यापही तक्रारदारांची थेट तक्रार न स्वीकारता आवक -जावक विभागात तक्रार देण्यास सांगितले जाते. परिणामी, सायंकाळी ६ वाजल्यानंतर, शासकीय सुट्टीच्या दिवशी सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी अधिकृतरीत्या स्वीकारल्या जात नाहीत. तक्रारदारांना एकतर ऑनलाइन तक्रार करायचा सल्ला मिळतो, नसता तक्रारीसाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी चक्कर मारावी लागते. त्यामुळे सायबर सेलला ठाण्याचा दर्जा असूनही उपयोग तरी काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पोलिस ठाण्यांप्रमाणेच सायबर पोलिस सेलही आता स्वतंत्र पोलिस ठाणे म्हणून कार्यरत आहे. सात वर्षांपूर्वी या सेलला पोलिस ठाण्याचा दर्जा मिळाला होता. व्यापारी श्रीनिवास कारवा (६७, रा. गांधीनगर) हे २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता कर्णपुऱ्याजवळील वॉकिंग प्लाझा येथे गेले होते. तेथून घरी परतत असताना अज्ञाताने त्यांचा मोबाइल चोरला. छावणी पोलिसांनी याप्रकरणी दोन ओळींची प्राॅपर्टी मिसिंगची नोंद केली. मात्र, त्याच्या तीन दिवसांनी कारवा यांना अचानक त्यांच्या बँक खात्यातून २ लाख २० हजार रुपये वळते झाल्याचे दिसून आले.२९ सप्टेंबर रोजी हे कळताच कारवा यांनी सायंकाळी ६ वाजता सायबर पोलिस ठाणे गाठले. तेथे त्यांना पहिले आवक-जावक विभागात तक्रार देण्यास सांगितले. कारवा जाईपर्यंत तो विभाग बंद झाला होता. त्यानंतर सायबरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना १९०९ क्रमांकावर कॉल व ऑनलाइन संकेतस्थळावर नोंद करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे फसवणुकीमुळे आधीच तणावात असलेल्या कारवा यांना कुठल्याही मदतीशिवायच घरी परतावे लागले.कारवा यांच्या मोबाइलमध्ये कुठलेही वॉलेट ॲप नसताना चोराने मोबाइल क्रमांकाच्या मदतीने हा प्रकार केला. सहा वेळेला व्यवहार झाले तरी कारवा यांना बँकेकडून त्याचा एकही मेसेज प्राप्त झाला नाही, हे विशेष. त्यामुळे सायबर गुन्हेगाराने नेमके कसे पैसे वळविले, हे कळू शकले नाही.

..तर तक्रारदाराच्या हाती शून्यऑनलाइन फसवणुकीत तत्काळ तपास होणे गरजेचे असते. मात्र, सायबर ठाण्याच्या आवक-जावकचा हट्ट व इतर लांबलचक प्रक्रियेमुळे नाेंदच उशिरा होते. कारवा यांनी वरिष्ठांमार्फत शनिवारी पुन्हा सायबर ठाणे गाठल्यानंतर त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली. सुट्टीमुळे आवक-जावक शाखा बंद होती. त्यामुळे त्यांना तक्रारीची कॉपीच मिळाली नाही. थेट सही-शिक्का देण्याचा अधिकारच सायबर ठाण्याला नाही. त्यामुळे सोमवारपर्यंत त्यात कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. कारवाई अशक्य झाल्यावर दोन-तीन महिन्यांच्या कालावधीनंतर सायबर फसवणुकीचे प्रकरण ठाण्यांकडे वर्ग केल्यानंतर गुन्हे दाखल होतात. परिणामी, तक्रारदाराच्या हाती काहीच लागत नाही.

पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न करूआयुक्तालयात येणारी प्रत्येक तक्रार आवक-जावकमध्ये स्वीकारायचा नियम आहे. वरिष्ठांच्या माध्यमातून त्याचे वर्गीकरण होते. त्यामुळे सायबरच्या तक्रारीही तेथेच स्वीकारल्या जात असतील. मात्र, सुट्टीमुळे तक्रारी स्वीकारल्या जात नसतील तर वरिष्ठांसमोर ही बाब ठेवून पर्यायी व्यवस्थेसाठी निश्चित प्रयत्न करू. सायबर पोलिस ठाण्यातही तक्रारदाराचे प्राथमिक पातळीवरच निरसन होण्यासाठी आवश्यक सूचना करू.- धनंजय पाटील, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

-२०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सायबर सेलची स्थापना.-२०१८ मध्ये सेल ठाण्यांमध्ये रूपांतरित करण्यात आले.-अन्य ठाण्यांप्रमाणे प्रभारीपदी पोलिस निरीक्षक व अन्य अधिकारी, कर्मचारी, डिओ अधिकारी, पीएसओ, स्टेशन डायरी व स्वतंत्र एफआयआर दाखल होतो.-सध्या पोलिस आयुक्तालयाच्या सायबर ठाण्यात निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, तीन उपनिरीक्षकांसह ३५पेक्षा अधिक कर्मचारी आहेत.-पोलिस अधीक्षक कार्यालयातही तक्रार थेट सायबर पोलिस ठाण्यातच स्वीकारली जाते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस