शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

सायबर सेलला ठाण्याचा दर्जा, तरीही तक्रार पहिल्यांदा आवक-जावक विभागात देण्याचा सल्ला

By सुमित डोळे | Updated: October 14, 2023 18:55 IST

....मग सायबर सेलला ठाण्याचा दर्जा मिळून उपयोग तरी काय? 

छत्रपती संभाजीनगर : सायबर पोलिस ठाणे असूनही येथे अद्यापही तक्रारदारांची थेट तक्रार न स्वीकारता आवक -जावक विभागात तक्रार देण्यास सांगितले जाते. परिणामी, सायंकाळी ६ वाजल्यानंतर, शासकीय सुट्टीच्या दिवशी सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी अधिकृतरीत्या स्वीकारल्या जात नाहीत. तक्रारदारांना एकतर ऑनलाइन तक्रार करायचा सल्ला मिळतो, नसता तक्रारीसाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी चक्कर मारावी लागते. त्यामुळे सायबर सेलला ठाण्याचा दर्जा असूनही उपयोग तरी काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पोलिस ठाण्यांप्रमाणेच सायबर पोलिस सेलही आता स्वतंत्र पोलिस ठाणे म्हणून कार्यरत आहे. सात वर्षांपूर्वी या सेलला पोलिस ठाण्याचा दर्जा मिळाला होता. व्यापारी श्रीनिवास कारवा (६७, रा. गांधीनगर) हे २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता कर्णपुऱ्याजवळील वॉकिंग प्लाझा येथे गेले होते. तेथून घरी परतत असताना अज्ञाताने त्यांचा मोबाइल चोरला. छावणी पोलिसांनी याप्रकरणी दोन ओळींची प्राॅपर्टी मिसिंगची नोंद केली. मात्र, त्याच्या तीन दिवसांनी कारवा यांना अचानक त्यांच्या बँक खात्यातून २ लाख २० हजार रुपये वळते झाल्याचे दिसून आले.२९ सप्टेंबर रोजी हे कळताच कारवा यांनी सायंकाळी ६ वाजता सायबर पोलिस ठाणे गाठले. तेथे त्यांना पहिले आवक-जावक विभागात तक्रार देण्यास सांगितले. कारवा जाईपर्यंत तो विभाग बंद झाला होता. त्यानंतर सायबरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना १९०९ क्रमांकावर कॉल व ऑनलाइन संकेतस्थळावर नोंद करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे फसवणुकीमुळे आधीच तणावात असलेल्या कारवा यांना कुठल्याही मदतीशिवायच घरी परतावे लागले.कारवा यांच्या मोबाइलमध्ये कुठलेही वॉलेट ॲप नसताना चोराने मोबाइल क्रमांकाच्या मदतीने हा प्रकार केला. सहा वेळेला व्यवहार झाले तरी कारवा यांना बँकेकडून त्याचा एकही मेसेज प्राप्त झाला नाही, हे विशेष. त्यामुळे सायबर गुन्हेगाराने नेमके कसे पैसे वळविले, हे कळू शकले नाही.

..तर तक्रारदाराच्या हाती शून्यऑनलाइन फसवणुकीत तत्काळ तपास होणे गरजेचे असते. मात्र, सायबर ठाण्याच्या आवक-जावकचा हट्ट व इतर लांबलचक प्रक्रियेमुळे नाेंदच उशिरा होते. कारवा यांनी वरिष्ठांमार्फत शनिवारी पुन्हा सायबर ठाणे गाठल्यानंतर त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली. सुट्टीमुळे आवक-जावक शाखा बंद होती. त्यामुळे त्यांना तक्रारीची कॉपीच मिळाली नाही. थेट सही-शिक्का देण्याचा अधिकारच सायबर ठाण्याला नाही. त्यामुळे सोमवारपर्यंत त्यात कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. कारवाई अशक्य झाल्यावर दोन-तीन महिन्यांच्या कालावधीनंतर सायबर फसवणुकीचे प्रकरण ठाण्यांकडे वर्ग केल्यानंतर गुन्हे दाखल होतात. परिणामी, तक्रारदाराच्या हाती काहीच लागत नाही.

पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न करूआयुक्तालयात येणारी प्रत्येक तक्रार आवक-जावकमध्ये स्वीकारायचा नियम आहे. वरिष्ठांच्या माध्यमातून त्याचे वर्गीकरण होते. त्यामुळे सायबरच्या तक्रारीही तेथेच स्वीकारल्या जात असतील. मात्र, सुट्टीमुळे तक्रारी स्वीकारल्या जात नसतील तर वरिष्ठांसमोर ही बाब ठेवून पर्यायी व्यवस्थेसाठी निश्चित प्रयत्न करू. सायबर पोलिस ठाण्यातही तक्रारदाराचे प्राथमिक पातळीवरच निरसन होण्यासाठी आवश्यक सूचना करू.- धनंजय पाटील, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

-२०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सायबर सेलची स्थापना.-२०१८ मध्ये सेल ठाण्यांमध्ये रूपांतरित करण्यात आले.-अन्य ठाण्यांप्रमाणे प्रभारीपदी पोलिस निरीक्षक व अन्य अधिकारी, कर्मचारी, डिओ अधिकारी, पीएसओ, स्टेशन डायरी व स्वतंत्र एफआयआर दाखल होतो.-सध्या पोलिस आयुक्तालयाच्या सायबर ठाण्यात निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, तीन उपनिरीक्षकांसह ३५पेक्षा अधिक कर्मचारी आहेत.-पोलिस अधीक्षक कार्यालयातही तक्रार थेट सायबर पोलिस ठाण्यातच स्वीकारली जाते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस