शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

भयंकर! पैशाच्या देवाणघेवाणीवरून एकास अॅसिड टाकून जाळले, दुसऱ्यावर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 13:42 IST

खुलताबाद पोलीसांनी तीन आरोपींना केली अटक; रात्री छत्रपती संभाजीनगर रोडवरील घटना

खुलताबाद: पैशाच्या देवाणघेवाणीवरून तीन जणांनी दोन जणांवर हल्ला केला चाकू व कोयत्याने हल्ला करीत एका जणास अॅसिड टाकून जाळून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर अन्य एका जखमीवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे. खुलताबाद पोलीसांनी रात्रीच तिन्ही आरोपींना अटक करून गजाआड केले आहे. रात्री साडेअकरा वाजता ही घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नंद्राबादनजीक घडली. 

याबाबत या हल्ल्यातील जखमी असलेला आनंद बाबासाहेब वारे ( रा. फुलेनगर, उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अक्की उर्फ आकाश कैलास रणधीर ( ३६, रा वेरूळ ता खुलताबाद,  हमु सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर) हा मंगळवारी सायंकाळी वेरूळला जायच म्हणून मोटारसायलवर आला. त्याच्यासोबत वेरूळला मयूर पाटणी याच्या लॉजवर गेलो. मात्र, मयूर पाटणी याने नंद्राबादनजीक असलेल्या परमीट बारवर येण्यास सांगितले. ठेतहे त्याच्यासोबत नितीन ठाकरे देखील होता. येथे सर्वांनी दारू पिली. तेवढ्यात  रात्री ११:३० वाजता शेख नावेद त्या ठिकाणी आला. त्यानंतर मयूर पाटणीने आकाशला ७ हजार रूपये देण्यासाठी बाहेर काढले. मात्र, आकाशने आणखी १० ते १२ हजार रूपये जास्तीचे मागत पैसे घेण्यास नकार दिला. त्यावर मयूर पाटणी याने आकाश रणधीर व आनंद वारे यास हॉटेलच्या पाठीमागे घेवून गेले. अचानक मयूरने आनंद वारे याचे तोंड दाबून पाठीवर, पोटावर वार केले. त्यानंतर शेख नावेदने चाकूने आकाशच्या पोटावर व डोक्यावर वार केले. 

दरम्यान, हल्ला होत असताना मयूर पाटणीच्या हातातून कोयता हिसकावून जखमी अवस्थेत आनंद वारे तेथून फरार झाला. मित्राच्या मदतीने आनंद छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल झाला. त्याच वेळी आकाश रणधीर यास ही उपचारासाठी रूग्णवाहिकेतून आणले होते. आकाश रणधीर याच्या अंगावर ,तोंडावर ,डोळ्यावर अँसिड टाकले असल्याने तो संपूर्ण जळाला होता. येथे उपचार सुरू असताना आकाशचा मृत्यू झाला. 

माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सपोनि दिनकर गोरे यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. तसेच तत्काळ मयूर पाटणी, नितीन ठाकरे , शेख नावेद ( सर्व रा वेरूळ ता. खुलताबाद) यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे करत आहे. दरम्यान, आकाश रणधीर हा वेरूळ गावातील काही व्यापाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून खंडणीसाठी त्रास देत असल्याची गावात चर्चा आहे. सततच्या त्रासाला कंटाळूनच आरोपींनी हे कृत्य केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी