शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विमानतळावर टर्मिनल तयार, पण आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 12:27 IST

सेवा सुरू होण्यासाठी अडथळे दूर होईना; जगभरात माल पाठविण्यासाठी मुंबई, दिल्लीवर मदार

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जगभरातील अनेक कंपन्यांच्या वाहनांत औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांत तयार झालेला एक तरी स्पेअर पार्ट आहे. याबरोबर इतर अनेक उत्पादनांची परदेशांत निर्यात होते. मात्र ही उत्पादने परदेशांत मुंबई, दिल्ली मार्गाने पाठविण्याची वेळ ओढवत आहे. कारण चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

औरंगाबाद शहर आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये ऑटोमोबाईल्स, कृषी, फार्मासह विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या आहेत. वर्षभरात उत्पादनांतून सुमारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. येथील उत्पादनांना जगभरातून मागणी आहे. चिकलठाणा विमानतळावरून उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी एअर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो कॉम्प्लेक्समध्ये रुपांतर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच विमानतळावर ड्रग इन्स्पेक्टरची नियुक्ती झाली आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले की, ही नियुक्ती आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेसाठीच झाली आहे.

किमान एक हजार ट्रक रवानाऔरंगाबादेतील विविध उत्पादने दररोज किमान एक हजार ते १५०० ट्रकमधून देशभरातील विविध शहरांत जातात. ८० देशांमध्ये औद्योगिक मालाची निर्यात होते. यात वाहन, वाहनांचे सुटे भाग, औषधी, साॅफ्टवेअरसह इतर उत्पादनांचा समावेश आहे.

तीन हजार टन माल निर्यातचिकलठाणा विमानतळावरून सध्या मुंबईमार्गे दरवर्षी दीड हजार टन माल निर्यात केला जातो. विमानतळावर आंतराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू झाल्यावर दरवर्षी जवळपास तीन हजार टन माल निर्यात होईल, अशी अपेक्षा आहे.

वर्ष २०२१ मध्ये ७०६.२ टन मालाची वाहतूकऔरंगाबाद विमानतळावरून प्रवासी विमानातून सध्या देशांतर्गत कार्गो माल पाठविला जात आहे. वर्ष २०२१ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत औरंगाबादहून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नईला तब्बल ७०६.२ टन कार्गो पाठविण्यात आल्या.

औषधी, फूड, कृषी उत्पनांची निर्यात शक्यऔषधी, फूड, भाजीपाला, फुले यांची आंतरराष्ट्रीय कार्गोद्वारे निर्यात होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कृषी उत्पनांच्या निर्यातीसाठी योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे. विमानांची संख्या वाढल्यानंतर कार्गो सेवा वाढीला मदत होईल.-मुकुंद कुलकर्णी, उद्योजक

औरंगाबादेतील उद्योग कंपन्या-२५००फार्म कंपनी- ६०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळMumbaiमुंबई