शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिदर्जाची दहा पदे; विकासाची मात्र वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:39 IST

पाणीपुरवठा, रस्ते चौपदरीकरण, जालना रोड, बीड बायपासची कामे प्रलंबित

ठळक मुद्दे भाजपकडे मंत्री, राज्यमंत्री पदांचा फौजफाटा 

- विकास राऊत 

औरंगाबाद : जिल्ह्यात मंत्री आणि राज्यमंत्री दर्जांची दहा पदे असून, ती सर्व भाजपच्या वाट्याला आलेली आहेत, असे असतानाही शहर पाणीपुरवठा योजना, औरंगाबाद-अजिंठा रस्त्याचे चौपदरीकरण, जालना रोड, बीड बायपासच्या कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे या सर्व पदधारकांची ताकद कमी पडत असल्याचे दिसते आहे. 

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आहेत, त्यांचे पद फार मोठे आहे. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातून जाणाऱ्या अजिंठा रस्त्याच्या कामाकडे पोटतिडकीने लक्ष घालणे गरजेचे आहे; परंतु त्यांनी त्याबाबत आजवर संबंधित यंत्रणेला काहीही जाब विचारलेला नाही. त्याखालोखाल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव येते. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात सिल्लोड, फुलंब्री, पैठण आणि शहरातील दहा वॉर्ड येतात. औरंगाबाद शहर व मतदारसंघ म्हणून येथील रखडलेल्या कामांबाबत त्यांनी आजवर ठोस आदेश दिल्याचे ऐकिवात नाही.

महिनाभरापूर्वी अतुल सावे यांना उद्योग राज्यमंत्री पदाची संधी मिळालेली आहे. त्यांनी शहर पाणीपुरवठा योजनेत लक्ष घातले आहे; परंतु औद्योगिक समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच म्हाडाचे सभापती संजय केणेकर यांनाही दहा दिवसांपूर्वी त्या पदावर संधी मिळाली आहे. स्वस्तातील घरकुल बांधणे, तसेच शहरातील म्हाडाच्या वसाहतींना सुविधा पुरविण्याबाबत त्यांनी अजून तरी काही आढावा घेतलेला नाही.

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या महिना दोन महिन्यांतून कधीतरी सुभेदारीवर बैठका घेऊन महिलांच्या तक्रारी ऐकतात; परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाशी त्यांची जवळीक असूनही त्यांनी शहरासाठी आजवर कोणतीही विशेष योजना आणलेली नाही. बालहक्क आयोगावर प्रवीण घुगे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. विद्यार्थी वसतिगृह, बालसुधारगृहांतील कारभारांबाबत घुगे यांनी नियुक्तीपासून आजवर काय काम केले हे त्यांनी जाहीरपणे आजवर समोर आणलेले नाही. आ. प्रशांत बंब यांची रोजगार हमी योजनेवर शासनाने नियुक्ती केली आहे. हे देखील राज्यमंत्री दर्जाचे पद आहे. आ. बंब यांनी हमी योजनेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम केले. मात्र, योजना पारदर्शक करण्यासाठी त्यांनी अजून तरी काही सुचविलेले नाही.

ही मानद पदे देखील औरंगाबादचीचमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या मराठवाडा विकास मंडळावर डॉ.भागवत कराड यांची नियुक्ती होऊन १ वर्ष झाले. मंडळाच्या ५० हून अधिक बैठका वर्षभरात झाल्या. बऱ्याच वर्षांनी शासनाने मंडळाला ५० कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. तसेच ग्राहक मंचावर अरुण देशपांडे आणि माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनाही शासनाने पदे दिली आहेत. देशपांडे हे पुण्याला असतात; परंतु ते औरंगाबादचे मूळ रहिवासी आहेत. याशिवाय बसवराज मंगरूळे यांना देखील नॉलेज कमिटीवर नियुक्त करण्यात आलेले आहे. एवढ्या मोठ्या पदांचा फौजफाटा जिल्ह्यात भाजपने दिलेला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfundsनिधीState Governmentराज्य सरकार