शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

‘दहा फूट मागे मागे’; महापालिकेची अतिक्रमणाविरोधात नाविन्यपूर्ण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 19:17 IST

मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची संकल्पना

ठळक मुद्देस्वत:हून अतिक्रमणे दहा फूट मागे न घेतल्यास जेसीबी चालणार‘जिथे झाड तिथे पाऊस’ ही संकल्पना घेऊन महापालिका काम करणार आहे.

औरंगाबाद : शहराला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. जिथे जागा दिसेल तेथे अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी ‘दहा फूट मागे मागे’ ही नावीन्यपूर्ण योजना शहरात लवकरच राबविण्यात येणार आहे. अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

भविष्यात येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा, शुद्ध पाणी देणे हे आपले कर्तव्य आहे. ‘जिथे झाड तिथे पाऊस’ ही संकल्पना घेऊन महापालिका काम करणार आहे. झाडे वाढविली पाहिजेत. मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन हब तयार करावे लागणार आहेत. या कामासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही होकार दर्शविला आहे. झाड लावायचे तरी कोठे, असा प्रश्न सध्या निर्माण होतो. जिथे तिथे अतिक्रमणे झाली आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणेच अतिक्रमणे आहेत. आमखास मैैदानावर अतिक्रमणे काढून यशस्वीपणे वृक्षारोप करण्यात आले. दिल्लीगेटवर अतिक्रमणे काढून वृक्षारोप केले. शहरात ठिकठिकाणी अशा पद्धतीने मोहीम राबविण्यात येईल. त्यापूर्वी अतिक्रमण केलेल्यांना स्वत:हून अतिक्रमणे काढून घ्या, अशी विनंती मनपाकडून करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले. ‘१० फूट मागे मागे’ या योजनेत स्वत:हून अतिक्रमणे दहा फूट मागे न घेतल्यास महापालिकेचा जेसीबी पुढील काम करणार आहे.

शौचालयांची संख्या वाढविणारशहराची एक मोठी समस्या म्हणजे शैचालयांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ही संख्या वाढविण्यासाठी मनपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही मॉडेल शौचालये लवकरच सुरू केले जातील. नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळाल्यास त्याची संख्या अधिक वाढविली जाणार आहे. शौचालये नसल्याने महिलांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

सरोवर परिसरात चांगले लोक आले पाहिजेतसलीम अली सरोवरात पक्षी आलेच पाहिजेत. पक्ष्यांसाठी हे नंदनवन आहे. सरोवराचा वाद न्यायप्रविष्ट आहे. येथे सर्वसामान्य चांगले नागरिक जोपर्यंत जाणार नाहीत, तोपर्यंत नकारात्मक मानसिकता ठेवणाऱ्यांचा वावर तेथे वाढेल, असेही पाण्डेय यांनी नमूद केले.

‘लोकमत’चा पाठपुरावाशहरातील प्रमुख रस्त्यांवर चालण्यासाठीही जागा मिळत नसल्याबद्दल ‘लोकमत’ने वृत्त मालिका प्रकाशित केली होती. या वृत्त मालिकेची दखल खंडपीठाने घेतली होती. खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना पायीसुद्धा चालणे मुश्कील झाले आहे.४ ‘लोकमत’च्या वृत्त मालिकेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही घेण्यात आली होती. बैठकीस पोलीस उपायुक्त मीना मकवाना, पोलीस निरीक्षक दादासाहेब शिनगारे उपस्थित होते. मनपाने यासंदर्भात अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याचे आश्वासन दिले होते. आजपर्यंत असा कोणताही अ‍ॅक्शन प्लॅन मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तयार केला नाही. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण