शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष वाचविण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 15:40 IST

: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील चार दिवसांपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या कॅरिआॅनचा मुद्दा गाजत आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील चार दिवसांपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या कॅरिआॅनचा मुद्दा गाजत आहे. यासाठी विद्यापीठाने तात्काळ व्यवस्थापन परिषदेची बैठक घेत कॅरिआॅन न देण्यावर शिक्कामोर्तब के ले. मात्र, विद्यार्थ्यांच्या सततच्या आंदोलनामुळे तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्यावर्षी लेखी हमीच्या आधारावर तात्पुरता प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.

विद्यापीठाशी संलग्न नऊ महाविद्यालये लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न झाली आहेत. या महाविद्यालयांतील तिसऱ्या आणि चौथ्या वर्षांतील विद्यार्थीच औरंगाबादच्या विद्यापीठाशी संलग्न आहेत. मागील वर्षी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे काय?  असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लेखी हमीच्या आधारावर प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना १८ आॅगस्ट २०१७ रोजी कॅरिआॅन देण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षापर्यंत हा नियम लागू आहे.

यामुळे केवळ तिसऱ्या वर्षात एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षात प्रवेश देण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र, या विद्यार्थ्यांनी कॅ रिआॅन न देता केवळ लेखी हमीच्या आधारावर तात्पुरता प्रवेश देण्याची मागणी केली, तसेच पुढील वर्षापासून चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम लागू होणार असल्यामुळे तीन विषय अतिरिक्त राहणार असल्याचा मुद्दाही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. डॉ. तेजनकर यांनी चार अधिष्ठाता आणि परीक्षा संचालक, अधिकाऱ्यांना संयुक्त बैठक घेण्याच्या सूचना केल्या. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांच्या लेखी हमीच्या आधारावर तात्पुरता प्रवेश देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉ. तेजनकर यांनी स्पष्ट केले. नियम बनविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

...असे असणार नियमअभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ज्या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षाची परीक्षा दिलेली आहे. मात्र, त्यांचे द्वितीय आणि तृतीय वर्षांतील काही विषय ‘बॅक’ राहिलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षासाठी तात्पुरता प्रवेश दिला जाईल. या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत मागील दोन्ही वर्षांचे सर्व विषय उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.  याशिवाय चौथ्या वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षाही नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये देता येणार नाही. दोन्ही सत्रांची परीक्षा मे/जून २०१९ मध्ये द्यावी लागणार आहे. जर विद्यार्थी डिसेंबरच्या परीक्षेत मागील विषय उत्तीर्ण झाला नाही, तर त्याचा प्रवेश रद्द समजण्यात येईल. तशा पद्धतीची लेखी हमी विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय