शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

भरतीसाठी देशभरात कुठेही सुविधा दिल्या जात नाहीत; तापमानामुळे अग्निवीरची प्रक्रिया रात्रीतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 19:02 IST

भरतीसाठी देशभरात कुठेही सुविधा दिल्या जात नाहीत.

औरंगाबाद : सैन्य दलातील भरतीसाठी जेवणासह कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत; परंतु सौजन्य म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सेवाभावी संस्था व नागरिकांच्या मदतीने अग्निवीर भरती सुविधापूर्ण वातावरणात पार पाडण्यात येत असल्याचा दावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला. रात्री तापमान कमी असते, त्यामुळे भरतीची प्रक्रिया रात्रीतून राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, पहिल्या दिवशी १३०० तरुणांची मैदान चाचणी घेण्यात आली. १६०० मीटर धावण्याची परीक्षा आहे. मोठ्या संख्येने तरुण आले आहेत. सेवाभावी संस्थांच्या मदतीने नाश्ता व फूड पॅकेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भरतीसाठी देशभरात कुठेही सुविधा दिल्या जात नाहीत. भरती प्रक्रिया कशी असते, हे सैन्यात जाण्यासाठी तयारी करणारांना माहिती असते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये चार संस्थांच्या मदतीने जे काही करता येईल, ते केले जात आहे. कर्नल प्रवीण कुमार, मेजर जनरल दिनेश उपाध्याय व पथक या प्रक्रियेसाठी परिश्रम घेत आहे.

मोठ्या प्रमाणात तरुण आल्यामुळे कुठेही लघुशंका, प्रात:विधी करीत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. तरुणांच्या प्रात:विधीची अडचण होऊ नये, यासाठी मोबाइल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. तसेच सैन्य दलाच्या नियमानुसार शौचखड्डेदेखील करण्यात आले आहेत. तरुणांना चांगल्या प्रकारचे फूड दिले जात आहे, त्याची तपासणी प्रशासकीय यंत्रणेने केली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

९ लाखांचे बजेट आहे भरतीसाठीअग्निवीर भरतीसाठी फक्त ९ लाख रुपयांचे बजेट मंजूर झाले आहे. हे बजेट वाढवून मागण्यात येणार आहे. सीएसआरमधून इतर खर्च केला जात आहे. नागरिकदेखील प्रशासनाला मदत करीत आहेत. २२ दिवस प्रक्रिया चालणार आहे. ७६ हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. १८ ते २३ वर्षांत पाच वेळा तरुणांना भरतीसाठी प्रयत्न करता येईल. त्यामुळे तरुणांनी निराश होऊ नये, आगामी काळात पुन्हा संधी उपलब्ध होऊ शकेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान