शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

भरतीसाठी देशभरात कुठेही सुविधा दिल्या जात नाहीत; तापमानामुळे अग्निवीरची प्रक्रिया रात्रीतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 19:02 IST

भरतीसाठी देशभरात कुठेही सुविधा दिल्या जात नाहीत.

औरंगाबाद : सैन्य दलातील भरतीसाठी जेवणासह कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत; परंतु सौजन्य म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सेवाभावी संस्था व नागरिकांच्या मदतीने अग्निवीर भरती सुविधापूर्ण वातावरणात पार पाडण्यात येत असल्याचा दावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला. रात्री तापमान कमी असते, त्यामुळे भरतीची प्रक्रिया रात्रीतून राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, पहिल्या दिवशी १३०० तरुणांची मैदान चाचणी घेण्यात आली. १६०० मीटर धावण्याची परीक्षा आहे. मोठ्या संख्येने तरुण आले आहेत. सेवाभावी संस्थांच्या मदतीने नाश्ता व फूड पॅकेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भरतीसाठी देशभरात कुठेही सुविधा दिल्या जात नाहीत. भरती प्रक्रिया कशी असते, हे सैन्यात जाण्यासाठी तयारी करणारांना माहिती असते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये चार संस्थांच्या मदतीने जे काही करता येईल, ते केले जात आहे. कर्नल प्रवीण कुमार, मेजर जनरल दिनेश उपाध्याय व पथक या प्रक्रियेसाठी परिश्रम घेत आहे.

मोठ्या प्रमाणात तरुण आल्यामुळे कुठेही लघुशंका, प्रात:विधी करीत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. तरुणांच्या प्रात:विधीची अडचण होऊ नये, यासाठी मोबाइल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. तसेच सैन्य दलाच्या नियमानुसार शौचखड्डेदेखील करण्यात आले आहेत. तरुणांना चांगल्या प्रकारचे फूड दिले जात आहे, त्याची तपासणी प्रशासकीय यंत्रणेने केली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

९ लाखांचे बजेट आहे भरतीसाठीअग्निवीर भरतीसाठी फक्त ९ लाख रुपयांचे बजेट मंजूर झाले आहे. हे बजेट वाढवून मागण्यात येणार आहे. सीएसआरमधून इतर खर्च केला जात आहे. नागरिकदेखील प्रशासनाला मदत करीत आहेत. २२ दिवस प्रक्रिया चालणार आहे. ७६ हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. १८ ते २३ वर्षांत पाच वेळा तरुणांना भरतीसाठी प्रयत्न करता येईल. त्यामुळे तरुणांनी निराश होऊ नये, आगामी काळात पुन्हा संधी उपलब्ध होऊ शकेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान