शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भरतीसाठी देशभरात कुठेही सुविधा दिल्या जात नाहीत; तापमानामुळे अग्निवीरची प्रक्रिया रात्रीतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 19:02 IST

भरतीसाठी देशभरात कुठेही सुविधा दिल्या जात नाहीत.

औरंगाबाद : सैन्य दलातील भरतीसाठी जेवणासह कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत; परंतु सौजन्य म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सेवाभावी संस्था व नागरिकांच्या मदतीने अग्निवीर भरती सुविधापूर्ण वातावरणात पार पाडण्यात येत असल्याचा दावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला. रात्री तापमान कमी असते, त्यामुळे भरतीची प्रक्रिया रात्रीतून राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, पहिल्या दिवशी १३०० तरुणांची मैदान चाचणी घेण्यात आली. १६०० मीटर धावण्याची परीक्षा आहे. मोठ्या संख्येने तरुण आले आहेत. सेवाभावी संस्थांच्या मदतीने नाश्ता व फूड पॅकेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भरतीसाठी देशभरात कुठेही सुविधा दिल्या जात नाहीत. भरती प्रक्रिया कशी असते, हे सैन्यात जाण्यासाठी तयारी करणारांना माहिती असते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये चार संस्थांच्या मदतीने जे काही करता येईल, ते केले जात आहे. कर्नल प्रवीण कुमार, मेजर जनरल दिनेश उपाध्याय व पथक या प्रक्रियेसाठी परिश्रम घेत आहे.

मोठ्या प्रमाणात तरुण आल्यामुळे कुठेही लघुशंका, प्रात:विधी करीत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. तरुणांच्या प्रात:विधीची अडचण होऊ नये, यासाठी मोबाइल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. तसेच सैन्य दलाच्या नियमानुसार शौचखड्डेदेखील करण्यात आले आहेत. तरुणांना चांगल्या प्रकारचे फूड दिले जात आहे, त्याची तपासणी प्रशासकीय यंत्रणेने केली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

९ लाखांचे बजेट आहे भरतीसाठीअग्निवीर भरतीसाठी फक्त ९ लाख रुपयांचे बजेट मंजूर झाले आहे. हे बजेट वाढवून मागण्यात येणार आहे. सीएसआरमधून इतर खर्च केला जात आहे. नागरिकदेखील प्रशासनाला मदत करीत आहेत. २२ दिवस प्रक्रिया चालणार आहे. ७६ हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. १८ ते २३ वर्षांत पाच वेळा तरुणांना भरतीसाठी प्रयत्न करता येईल. त्यामुळे तरुणांनी निराश होऊ नये, आगामी काळात पुन्हा संधी उपलब्ध होऊ शकेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान