शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

तापमानाचा कहर! छत्रपती संभाजीनगर ४२.५ अंश सेल्सिअसवर; पाच दिवसांत ३.१ अंशांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:55 IST

दरवर्षी एप्रिलअखेर आणि वैशाखाच्या सुरुवातीपूर्वी एवढे तापमान असते. तो आकडा एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांतच गाठल्याने पुढील काळात काय होणार, याची चिंता आहे.

छत्रपती संभाजीनगर : पाच दिवसांपासून शहर व परिसरावर सूर्य आग ओकत आहे. बुधवारने मागील चार दिवसांतील तापमानाचा उच्चांक गाठला. ८ एप्रिलपर्यंत मागील तीन दिवसांतील तापमानाचे रेकॉर्ड मोडल्यानंतर बुधवारी कमाल तापमान ४२.५ अंश सेल्सिअसपर्यंत नाेंदविले गेले. ९ अंशांनी तापमान वाढले, यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. 

दरवर्षी एप्रिलअखेर आणि वैशाखाच्या सुरुवातीपूर्वी एवढे तापमान असते. तो आकडा एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांतच गाठल्याने पुढील काळात काय होणार, याची चिंता आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी वाढ हाेत तापमान ४२.५ अंशांवर पाेहोचले, जे सरासरीपेक्षा जास्त होते. परिणामी, रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक ४२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. वाढलेल्या तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य होते. तापमान झपाट्याने वाढत असल्यामुळे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तापमान वाढत जाईल...एप्रिलअखेरचे तापमान पहिल्याच आठवड्यात झाले आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील. नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शासनानेदेखील तातडीने जनजागृती मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानशास्त्रज्ञ

पाच दिवसांत ३.१ अंशांनी वाढले तापमानतारीख- कमाल-किमान५ एप्रिल - ३९.४ -२२.६६ एप्रिल - ४०.२ -२३.३७ एप्रिल- ४१.०- २४.१८ एप्रिल- ४१.६- २६.२९ एप्रिल- ४२.५ - २५.०

५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्षवाढत्या तापमानामुळे जि.प. सीईओ अंकित यांनी जिल्ह्यातील ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिल ते जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो, तसेच त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. त्यातच आतापासूनच जिल्ह्यात कमाल तापमान वाढत चालल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHeat Strokeउष्माघात