शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

खरं काय ते सांगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:11 IST

शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले.

ठळक मुद्देप्रधान सचिव : कचराकोंडीविषयी औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांना प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले. १६ फेबु्रवारीपासून शहरातील कचरा समस्येवर आजपर्यंत सचिव पातळीवर पाच बैठका झाल्या असून, कालबद्ध कार्यक्रम पालिकेला तयार करता आलेला नाही.नगरविकास खात्याचे प्रधान सचिव करीर यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तालयात तासभर कच-याच्या समस्येबाबत पालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. शिवाय यंत्रणेची उलटतपासणीदेखील केली. त्यांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मनपा प्रशासनाच्या अधिकाºयांची भंबेरी उडाली. १०० टक्के कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात करण्याचा शब्द घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रधान सचिवांना दिला. ७६ दिवसांपासून कचºयाची समस्या धुमसत असून, १४८ दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम नारेगाव-मांडकीतील आंदोलन सुरू असताना मनपाने सादर केला होता.रस्त्यांवर कचरा दिसत नसला तरी ओला-सुका असे वर्गीकरण होत नाही. रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई करा. सरकारी कार्यालयात डस्टबिन ठेवा. फळ विक्रेते, टपरीधारकांना डस्टबिन ठेवण्याची सक्ती करा. कचरा प्रक्र्रियेत अडथळा निर्माण करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत पुढे आल्या.बैठकीस विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपसंचालक रिता मेत्रेवार, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदी अधिकारी उपस्थित होते.प्रधान सचिवांनी केलेल्या सूचनाआठ दिवसांत वॉर्ड अधिकारी, कचरा वेचकांच्या माध्यमातून मनपाने घरोघरी जावे. ओला कचरा दरदिवशी गोळा करण्यात येईल. मात्र सुका कचरा आठवड्यातील ठराविक दिवशीच गोळा करण्यात येईल, याची सूचना नागरिकांना द्यावी. खाद्यपदार्थ, आईस्क्रीम, रसवंती, व्यावसायिक व इतर विक्रेत्यांना ओला, सुका कचरा स्वतंत्ररीत्या संकलित करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कचरापेट्या ठेवणे बंधनकारक करावे.पावसाळ्याच्या आधी सर्व नाल्यांजवळ साचलेल्या कचºयाची विल्हेवाट लावावी. उघड्यावर कचरा फेकणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.१०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया गृहनिर्माण संस्था, व्यापारी, खाजगी, आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती, हॉटेल व्यावसायिक यांच्यामार्फ त कचºयाची योग्य शास्त्रीय विल्हेवाट लावल्या जात नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद