शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

खरं काय ते सांगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:11 IST

शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले.

ठळक मुद्देप्रधान सचिव : कचराकोंडीविषयी औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांना प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले. १६ फेबु्रवारीपासून शहरातील कचरा समस्येवर आजपर्यंत सचिव पातळीवर पाच बैठका झाल्या असून, कालबद्ध कार्यक्रम पालिकेला तयार करता आलेला नाही.नगरविकास खात्याचे प्रधान सचिव करीर यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तालयात तासभर कच-याच्या समस्येबाबत पालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. शिवाय यंत्रणेची उलटतपासणीदेखील केली. त्यांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मनपा प्रशासनाच्या अधिकाºयांची भंबेरी उडाली. १०० टक्के कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात करण्याचा शब्द घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रधान सचिवांना दिला. ७६ दिवसांपासून कचºयाची समस्या धुमसत असून, १४८ दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम नारेगाव-मांडकीतील आंदोलन सुरू असताना मनपाने सादर केला होता.रस्त्यांवर कचरा दिसत नसला तरी ओला-सुका असे वर्गीकरण होत नाही. रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई करा. सरकारी कार्यालयात डस्टबिन ठेवा. फळ विक्रेते, टपरीधारकांना डस्टबिन ठेवण्याची सक्ती करा. कचरा प्रक्र्रियेत अडथळा निर्माण करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत पुढे आल्या.बैठकीस विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपसंचालक रिता मेत्रेवार, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदी अधिकारी उपस्थित होते.प्रधान सचिवांनी केलेल्या सूचनाआठ दिवसांत वॉर्ड अधिकारी, कचरा वेचकांच्या माध्यमातून मनपाने घरोघरी जावे. ओला कचरा दरदिवशी गोळा करण्यात येईल. मात्र सुका कचरा आठवड्यातील ठराविक दिवशीच गोळा करण्यात येईल, याची सूचना नागरिकांना द्यावी. खाद्यपदार्थ, आईस्क्रीम, रसवंती, व्यावसायिक व इतर विक्रेत्यांना ओला, सुका कचरा स्वतंत्ररीत्या संकलित करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कचरापेट्या ठेवणे बंधनकारक करावे.पावसाळ्याच्या आधी सर्व नाल्यांजवळ साचलेल्या कचºयाची विल्हेवाट लावावी. उघड्यावर कचरा फेकणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.१०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया गृहनिर्माण संस्था, व्यापारी, खाजगी, आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती, हॉटेल व्यावसायिक यांच्यामार्फ त कचºयाची योग्य शास्त्रीय विल्हेवाट लावल्या जात नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद