शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

तीसगाव पाझर तलावातील पाण्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 18:44 IST

तीसागव पाझर तलावाच्या पाण्यावर डल्ला मारला जात असल्याचे सोमवारी उघडकीस आले.

ठळक मुद्देतीन गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

वाळूज महानगर: तीसागव पाझर तलावाच्या पाण्यावर डल्ला मारला जात असल्याचे सोमवारी उघडकीस आले. बिनधास्तपणे विद्युप मोटारी टाकून सिंचनासाठी पाण्याचा उपसा केला जात असल्याने या तलावावर अवलंबून असलेल्या तीन गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

तीसगाव पाझर तलावातून तीसगावसह लगतच्या शरणापूर व धरमपूर या तीन गावांना पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचे इतर स्त्रोत नसल्याने ही तीनही गावे याच पाण्यावर अवलंबून आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तलावात अत्यल्प जलसाठा आहे. परिसरातील शेतकरी व जनावरासाठी हा तलाव एकमेव जलस्त्रोत आहे. अत्यल्प पाऊस आणि उन्हाचा पारा पाहता दिवसेंदिवस तलावातील पाणी पातळी खालावत आहे.

केवळ दीड-दोन महिने नागरिकांना पाणी पुरेल एवढाच जलसाठा आहे. बोअर व विहिरीनेही तळ गाठला आहे. परंतू काही दिवसांपासून तीसगावसह शरणापूर, धरमपूर, मीटमीटा परिसरातील काही शेतकरी तलावातील पाण्याचा वापर सिंचनासाठी करीत असल्याचे आढळून आले आहे. शरणापूर ग्रामपंचायतीच्या शासकीय विहीरीलगत अनेकांनी तलावाच्या चारीत विद्युत मोटारी टाकून बिनदिक्कतपणे पाण्याचा उपसा सुरु केला आहे. विशेष म्हणजे या मोटारींना आकडे टाकून वीज जोडणी घेण्यात आली आहे. या भागात जवळपास १० ते १२ विद्युत मोटारी लावून दिवस-रात्र लाखो लिटर पाण्याची चोरी केली जात आहे. पाणीचोरी कोणाच्या लक्षात येवू नये म्हणून झाडा-झुडपात अडचणीच्या ठिकाणी या मोटारी बसविण्यात आल्या आहेत. हा प्रकार माजी जि.प. सदस्य रामचंद्र कसुरे व ग्रा.पं. सदस्य संजय जाधव यांनी उघडकीस आणला आहे.

तीन गावांवर टंचाईचे संकटतीसगाव, शरणापूर व धरमपूर या तीन गावांना दीड-दोन महिने पुरेल एवढाच जलसाठा तलावात आहे. यातून पाणीचोरी सुरुच राहिल्यास हा तलाव अल्पावधीतच कोरडा पडण्याची शक्यता आहे. जलसाठा संपुष्टात आल्यानंतर नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणारनागरिकांना दीड-दोन महिने पुरेल एवढेच पाणी तलावात शिल्लक आहे. यावरच गावची तहान भागते. विद्युत मोटारी टाकून तलावातील पाण्याचा उपसा केला जात असल्याने येणाºया काळात नागरिकांना प्यायला पाणी मिळणार नाही. पाणीचोरी रोखण्यासाठी ग्रामपंचायत मंगळवारी जिल्हाधिका-यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे संरपच कौशल्याबाई कसुरे व ग्रामविकस अधिकारी अशोक गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादtheftचोरी