शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

तीसगाव पाझर तलावातील पाण्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 18:44 IST

तीसागव पाझर तलावाच्या पाण्यावर डल्ला मारला जात असल्याचे सोमवारी उघडकीस आले.

ठळक मुद्देतीन गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

वाळूज महानगर: तीसागव पाझर तलावाच्या पाण्यावर डल्ला मारला जात असल्याचे सोमवारी उघडकीस आले. बिनधास्तपणे विद्युप मोटारी टाकून सिंचनासाठी पाण्याचा उपसा केला जात असल्याने या तलावावर अवलंबून असलेल्या तीन गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

तीसगाव पाझर तलावातून तीसगावसह लगतच्या शरणापूर व धरमपूर या तीन गावांना पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचे इतर स्त्रोत नसल्याने ही तीनही गावे याच पाण्यावर अवलंबून आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तलावात अत्यल्प जलसाठा आहे. परिसरातील शेतकरी व जनावरासाठी हा तलाव एकमेव जलस्त्रोत आहे. अत्यल्प पाऊस आणि उन्हाचा पारा पाहता दिवसेंदिवस तलावातील पाणी पातळी खालावत आहे.

केवळ दीड-दोन महिने नागरिकांना पाणी पुरेल एवढाच जलसाठा आहे. बोअर व विहिरीनेही तळ गाठला आहे. परंतू काही दिवसांपासून तीसगावसह शरणापूर, धरमपूर, मीटमीटा परिसरातील काही शेतकरी तलावातील पाण्याचा वापर सिंचनासाठी करीत असल्याचे आढळून आले आहे. शरणापूर ग्रामपंचायतीच्या शासकीय विहीरीलगत अनेकांनी तलावाच्या चारीत विद्युत मोटारी टाकून बिनदिक्कतपणे पाण्याचा उपसा सुरु केला आहे. विशेष म्हणजे या मोटारींना आकडे टाकून वीज जोडणी घेण्यात आली आहे. या भागात जवळपास १० ते १२ विद्युत मोटारी लावून दिवस-रात्र लाखो लिटर पाण्याची चोरी केली जात आहे. पाणीचोरी कोणाच्या लक्षात येवू नये म्हणून झाडा-झुडपात अडचणीच्या ठिकाणी या मोटारी बसविण्यात आल्या आहेत. हा प्रकार माजी जि.प. सदस्य रामचंद्र कसुरे व ग्रा.पं. सदस्य संजय जाधव यांनी उघडकीस आणला आहे.

तीन गावांवर टंचाईचे संकटतीसगाव, शरणापूर व धरमपूर या तीन गावांना दीड-दोन महिने पुरेल एवढाच जलसाठा तलावात आहे. यातून पाणीचोरी सुरुच राहिल्यास हा तलाव अल्पावधीतच कोरडा पडण्याची शक्यता आहे. जलसाठा संपुष्टात आल्यानंतर नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणारनागरिकांना दीड-दोन महिने पुरेल एवढेच पाणी तलावात शिल्लक आहे. यावरच गावची तहान भागते. विद्युत मोटारी टाकून तलावातील पाण्याचा उपसा केला जात असल्याने येणाºया काळात नागरिकांना प्यायला पाणी मिळणार नाही. पाणीचोरी रोखण्यासाठी ग्रामपंचायत मंगळवारी जिल्हाधिका-यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे संरपच कौशल्याबाई कसुरे व ग्रामविकस अधिकारी अशोक गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादtheftचोरी