शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

दूध संघावर अखेर अवसायक नियुक्त

By admin | Updated: July 30, 2015 00:44 IST

उस्मानाबाद : दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरलेला तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध संघ गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

उस्मानाबाद : दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरलेला तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध संघ गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक किसन सागर यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा धक्का असून, नियोजनाचा बोजवारा उडाल्याने संघ गुंडाळण्याची नामुष्की ओढवली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेती कायम बेभरोसी राहिली आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि त्यातच अत्यंत कमी सिंचन क्षेत्र यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादनाकडे आपला मोर्चा वळविला होता. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोठा आधार मिळू लागला. पर्यायाने काही वर्षापूर्वी दुध संघाची व्याप्तीही वाढली होती. विशेषत: उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यासह भूम, परंडा, वाशी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी दुध उत्पादनाकडे आकृष्ट झाले होते. मात्र ढिसाळ कारभारामुळे संघ अवसायनात काढण्याची वेळ ओढावली आहे. मागील वर्षीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ हजार ५२४ दुग्धविकास सहकारी संस्थांची नोंद असून, या संस्थामध्ये ७७ हजार ५२० हून अधिक सभासद आहेत. २०१३ मध्ये या संस्थांच्या माध्यमातून १ कोटी ६३ लाख १ हजार लिटर दुधाचे संकलन झाले होते. म्हणजेच दुध संकलन करण्याची मोठी क्षमता असतानाही तसेच या व्यवसायाची व्याप्ती अधिक वाढविण्याच्या संधी असतानाही जिल्हा दुध संघ तोट्यात जातोच कसा? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार २०१३ मध्ये दुग्ध विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून परंडा तालुक्यात १७,४९००० लिटर दुध संकलन झाले होते. भूम तालुक्यात ८०,६२००० लिटर, वाशी तालुक्यात ५११०००, कळंब २४७४०००, उस्मानाबाद १६६७०००, तुळजापूर ३४७०००, लोहारा ४०४००० तर उमरगा तालुक्यात १०८७००० लिटर दुधाचे संकलन झाले होते. एकंदरीत जिल्ह्यातील दुग्ध संकलन पाहता हा संघ टिकण्याची आवश्यकता होती. मात्र मागील काही वर्षांपासून दुध संघाला घरघर लागली होती. अखेर प्रशासनाने हा संघ गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून, जिल्हा विशेष लेखा परिक्षक सागर यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे. अवसायकपदी नियुक्ती झाल्यानंतर संघाचा हिशोब सुरु करण्यात आला आहे. ज्यांचे संघाकडे येणे आहे त्यांनी त्यांचा हिशोब पुराव्यासह दाखल करुन रक्कमेची मागणी करावी. तसेच देणे असलेल्या रक्कमेचा व्याजासह तात्काळ भरणा करावा, असे आदेश किसन सागर यांनी दिले आहेत. संघाचे येणे असलेल्या रक्कमा अदा न झाल्यास संस्थेच्या दप्तरामध्ये नमूद केलेल्या रक्कमा वसूल करण्यासाठी कायद्यानुसार योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.