शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीनंतर गुरुजींची शाळेकडे पाठ, नोटिसा बजावायच्या कोणाला !

By विजय सरवदे | Updated: October 8, 2022 19:09 IST

पदस्थापनेनंतर शाळेला दांडी मारल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे

- विजय सरवदेऔरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ६३ शिक्षकांना जि. प. प्रशासनाने समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिल्या. मात्र, यापैकी सुमारे ३० शिक्षकांना गैरसोयीच्या शाळा मिळाल्यामुळे ते अद्याप नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेच नाहीत. त्यामुळे आता प्रशासनाने त्यांना नोटिसा काढल्या आहेत; परंतु ते शाळेत जात नाहीत. कुठे राहतात, त्याचा ठावठिकाणा नाही. त्यांना नोटिसा तरी बजावाव्या कुठे, असा मोठा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

आंतरजिल्हा बदलीचे आदेश २४ ऑगस्ट रोजी ऑनलाइन निर्गमित झाले. या जिल्हा परिषदेच्या शाळांतील १६८ शिक्षक बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात गेले. मात्र, दुसऱ्या जिल्ह्यातून १४९ शिक्षक या जिल्ह्यात येणार होते; परंतु आतापर्यंत अवघे ६३ शिक्षक शिक्षण विभागात रुजू झाले. त्यांना २१ सप्टेंबर रोजी समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आल्या. मात्र, अनेकांना गैरसोयीच्या शाळांमध्ये पदस्थापना मिळाली. अनेकांच्या पती-पत्नीची फाटाफूट झाली. पतीला एका तालुक्यात, तर पत्नीला ६०-७० किमी दूर दुसऱ्या तालुक्यात पदस्थापना मिळाली. त्यामुळे ६३ पैकी जवळपास ३० शिक्षक पदस्थापना मिळालेल्या ठिकाणी रुजूच झाले नाहीत. त्यांना पदस्थापना बदलून हवी आहे.

वीस दिवसांचा कालावधी झाला तरी नियुक्त शाळांवर शिक्षक रुजू न झाल्यामुळे शिक्षण विभागाने आता त्यांना कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत; पण त्या बजावण्याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. एक तर ते शाळेवर जात नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापक अथवा गटशिक्षणाधिकारी त्या शिक्षकांपर्यंत नोटीस पोहोचवू शकत नाहीत. दुसरीकडे, ते कुठे राहतात, त्याचा पत्ताही प्रशासनाकडे नाही.

८६ शिक्षकांची प्रतीक्षाचआंतरजिल्हा बदली झाल्यानंतर येथून १६८ शिक्षक तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले. बदलीने दुसऱ्या जिल्ह्यांतून १४९ शिक्षक येणार होते; परंतु आतापर्यंत अवघे ६३ शिक्षक येथे रुजू झाले आहेत. उर्वरित ८६ शिक्षक अद्यापही जिल्हा परिषदेत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे येथील जि. प. शाळांमध्ये गुरुजींचा तुटवडा निर्माण झाला आहे. आता परीक्षा तोंडावर आल्या आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. एका शिक्षकाला सध्या अनेक वर्गांचा भार सांभाळावा लागत आहे. १० टक्क़्यांपेक्षा जास्त रिक्त जागा असतील, तर शिक्षकाला कार्यमुक्त करू नये, असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे कदाचित हे शिक्षक आलेले नसावे, अशी सूत्रांची माहिती आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद