शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

'लक्ष्य आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे'; औरंगाबाद विमानतळाचा बुद्धिस्ट सर्किटसाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:40 IST

 कोलंबो-मुंबई विमान औरंगाबादपर्यंत आणण्याची  मागणी

ठळक मुद्दे५० विमाने हाताळण्याची क्षमताप्राधिकरणाने दिले प्रस्ताव

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून उदयपूर विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी बुधवारी एअर इंडियाकडे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कोलंबो - मुंबई विमान औरंगाबादपर्यंत आणण्याची मागणी केली. विमानतळासाठी कस्टमचे मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी विमानतळ सज्ज आहे. बुद्धिस्ट सर्किटच्या कनेक्टिव्हिटीसह आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी यापुढे प्रयत्न आणि पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास विमानतळ प्राधिकरण आणि उद्योजकांनी व्यक्त केला.

एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद- उदयपूर विमानाच्या उड्डाणानंतर बुधवारी उपस्थित मान्यवरांनी विमानसेवेसंदर्भात संवाद साधला. हॉटेल उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, एअर इंडियाने अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. एखादी विमानसेवा सुरू झाली की, त्याला प्रतिसाद वाढत जातो, हे स्पाईस जेटच्या औरंगाबाद-दिल्ली विमानसेवेवरून दिसून येत आहे. विविध शहरांसाठी विमानसेवेची मागणी करण्यात आलेली आहे. गया येथे यावर्षी थायलंडहून आंतरराष्ट्रीय विमाने येणार आहेत. ही विमाने औरंगाबादला आणण्याची मागणी केली जात आहे. औरंगाबाद-भोपाळ- गया अशी विमानसेवा शक्य आहे. गया येथे जाणारे लोक नंतर वाराणसी, लखनऊ येथे जातात. तेथून ते परत थायलंडला जातात. ही विमान वाहतूक औरंगाबादला आली पाहिजे, असे ते म्हणाले. उद्योजक ऋषी बागला म्हणाले, औरंगाबादेत ऐतिहासिक, धार्मिकस्थळे आहेत. ‘डीएमआयसी’मुळे देशातील पहिले मॉडर्न शहर होत आहे. विमानसेवा उपलब्ध होत असल्याने पुढे वापर वाढत जाईल. इटालीहून औरंगाबादला येण्यासाठी ३६ घंटे लागतात. हा वेळ कमी होण्याची गरज आहे. 

५० विमाने हाताळण्याची क्षमतायाप्रसंगी कोलंबो - मुंबई विमान औरंगाबादपर्यंत आणावे, अशी मागणी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी  एअर इंडियाचे सेल्स व्यवस्थापक संतोष नायर यांच्याकडे केली. चिकलठाणा विमानतळाची दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची क्षमता आहे. नाईट पार्किंगची सुविधा मोफत दिली जात आहे. त्या माध्यमातूनही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे साळवे यांनी सांगितले.

प्राधिकरणाने दिले प्रस्तावथायलंडच्या राजदूताना औरंगाबादहून बँकॉकसह आशियाई देशांसाठी विमानसेवा सुरू करून आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रस्ताव देण्यात आलेला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनाही प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. यासह अन्य देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद