शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

'लक्ष्य आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे'; औरंगाबाद विमानतळाचा बुद्धिस्ट सर्किटसाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:40 IST

 कोलंबो-मुंबई विमान औरंगाबादपर्यंत आणण्याची  मागणी

ठळक मुद्दे५० विमाने हाताळण्याची क्षमताप्राधिकरणाने दिले प्रस्ताव

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून उदयपूर विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी बुधवारी एअर इंडियाकडे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कोलंबो - मुंबई विमान औरंगाबादपर्यंत आणण्याची मागणी केली. विमानतळासाठी कस्टमचे मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी विमानतळ सज्ज आहे. बुद्धिस्ट सर्किटच्या कनेक्टिव्हिटीसह आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी यापुढे प्रयत्न आणि पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास विमानतळ प्राधिकरण आणि उद्योजकांनी व्यक्त केला.

एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद- उदयपूर विमानाच्या उड्डाणानंतर बुधवारी उपस्थित मान्यवरांनी विमानसेवेसंदर्भात संवाद साधला. हॉटेल उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, एअर इंडियाने अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. एखादी विमानसेवा सुरू झाली की, त्याला प्रतिसाद वाढत जातो, हे स्पाईस जेटच्या औरंगाबाद-दिल्ली विमानसेवेवरून दिसून येत आहे. विविध शहरांसाठी विमानसेवेची मागणी करण्यात आलेली आहे. गया येथे यावर्षी थायलंडहून आंतरराष्ट्रीय विमाने येणार आहेत. ही विमाने औरंगाबादला आणण्याची मागणी केली जात आहे. औरंगाबाद-भोपाळ- गया अशी विमानसेवा शक्य आहे. गया येथे जाणारे लोक नंतर वाराणसी, लखनऊ येथे जातात. तेथून ते परत थायलंडला जातात. ही विमान वाहतूक औरंगाबादला आली पाहिजे, असे ते म्हणाले. उद्योजक ऋषी बागला म्हणाले, औरंगाबादेत ऐतिहासिक, धार्मिकस्थळे आहेत. ‘डीएमआयसी’मुळे देशातील पहिले मॉडर्न शहर होत आहे. विमानसेवा उपलब्ध होत असल्याने पुढे वापर वाढत जाईल. इटालीहून औरंगाबादला येण्यासाठी ३६ घंटे लागतात. हा वेळ कमी होण्याची गरज आहे. 

५० विमाने हाताळण्याची क्षमतायाप्रसंगी कोलंबो - मुंबई विमान औरंगाबादपर्यंत आणावे, अशी मागणी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी  एअर इंडियाचे सेल्स व्यवस्थापक संतोष नायर यांच्याकडे केली. चिकलठाणा विमानतळाची दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची क्षमता आहे. नाईट पार्किंगची सुविधा मोफत दिली जात आहे. त्या माध्यमातूनही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे साळवे यांनी सांगितले.

प्राधिकरणाने दिले प्रस्तावथायलंडच्या राजदूताना औरंगाबादहून बँकॉकसह आशियाई देशांसाठी विमानसेवा सुरू करून आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रस्ताव देण्यात आलेला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनाही प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. यासह अन्य देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद