शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

सोयगावात शेतीला विकतचे पाणी; उन्हाळी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 11:28 IST

सोयगावसह तालुक्यात ठिबक सिंचनवर उन्हाळी पिके आणि भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, अचानक पाण्याचे गंभीर संकट पसरल्याने शेतकऱ्यांना विकतचे पाणी घेऊन पिकांना जगवावे लागत आहे.

सोयगाव (औरंगाबाद ) : सोयगावसह तालुक्यात ठिबक सिंचनवर उन्हाळी पिके आणि भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, अचानक पाण्याचे गंभीर संकट पसरल्याने शेतकऱ्यांना विकतचे पाणी घेऊन पिकांना जगवावे लागत आहे. पिण्यासाठी आणि पिकांसाठी पाणी असणाऱ्या विहीरीतून किंवा टॅंकरद्वारे विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

उन्हाच्या झळा वाढल्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून तालुक्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष पसरले आहे. तसे पाहता मार्च महिन्यातच नागरिकांना पिण्यासाठी विकतचे पाणी घेण्याची वेळ आली होती. आता मे हिटच्या तडाख्यात उन्हाळी पिकांसोबत भाजीपाल्याचे क्षेत्र जगविण्यासाठी आसपासच्या पाणी असलेल्या विहिरीतून पाईपलाईन अथवा टॅंकरद्वारे विकतचे पाणी घेवून विहिरीत सोडावे लागत आहे. यांनतर याचा वापर पिकांना पाणी देण्यासाठी होतो.

एकंदरीत परिसरात उन्हाळी पिकांची व भाजीपाल्याची निगा राखण्यासाठी महिन्याला जवळपास २५ हजाराचे पाणी एका शेतकऱ्याला विकत घ्यावे लागले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी पाहता हा आकडा महिन्याला ३० लाखावर जातो. पिण्यासाठी पाण्याची चिंता न करता शेतकरी पिकांच्या पाण्याची चिंता करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विकत घेतलेले पाणी शेतकरी विहिरीत सोडून पिकांना देतात. त्यामुळे पिकांसाठी पाणीही विकतचे त्यात वीजपंपाचे अवाढव्य बिल यामुळे हा उन्हाळी पिकांचा हंगाम तालुक्यासाठी महागडा ठरला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीwater shortageपाणीकपातAgriculture Sectorशेती क्षेत्र