शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

दशक्रिया विधीसाठी वापरावे लागतेय टँकरचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:52 IST

पाणी विकत घेऊन गोदास्नान उरकावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र

- संजय जाधवपैठण (औरंगाबाद ) : दक्षिण काशी पैठण म्हणून मान्यता असलेल्या पैठण नगरीतील गोदावरीचे पात्र आटल्याने दशक्रिया विधी टँकरचे पाणी विकत घेऊन करण्याचा बाका प्रसंग नागरिकांवर ओढवला आहे. गोदावरीच्या झऱ्यातील पाणी विकत घेऊन गोदास्नान उरकावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र गोदामायेच्या पात्रात दिसून येत आहे. गेल्या सहा दशकात सन २०१६ नंतर यंदा गोदेचे पात्र आटल्याने धार्मिक विधी साठी आलेल्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. प्रशासनाने विधीसाठी अल्पदरात टँकर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे. 

 भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना माता मानले जाते या नद्यांच्या परिसरातच संस्कृतिचा जन्म व विकास झाला दक्षिण भारतात गोदावरीच्या सानिध्यात संस्कृती रूजली असे मानले जाते. पैठण शहरात गोदावरी पित्रमुखी (दक्षिण मुखी) वाहते म्हणून दक्षिणेतील काशी म्हणून पैठण नगरिचे महत्व आजही अबाधित आहे  गोदावरीच्या तीरावर पिंडदान, दशक्रिया विधी, अस्थिविसर्जन, सिंहस्थविधी, कालसर्प शांती, त्रिपिंडी विधी, नियमित होत आले आहेत हे विधी करण्यासाठी  भाविक हजारोच्या संखेने दररोज पैठण शहरात दाखल होतात 

गोदावरी आटली...नाथषष्ठी साठी गोदावरीच्या पात्रातील पाणी सोडून देण्यात आले, कोरड्या झालेल्या पात्रात वारकऱ्यांची सोय करण्यात आली. या नंतर जायकवाडी ची पाणी पातळी जोत्याखाली गेल्याने धरणावरील जलविद्युत प्रकल्प बंद पडला व गोदावरीत जलविद्युत प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा स्रोत बंद झाला. गेल्या पंधरा दिवसा पासून उन्हाच्या दाहकतेने गोदावरीतील पाणी बाष्पीभवन प्रक्रिये द्वारे उडून गेले व गोदावरी कोरडी झाली. गोदावरी पात्रात पाणी आहे असे समजून विधीसाठी आलेल्या भाविकांना ऐनवेळी टँकर चे पाणी विकत घेउन विधी उरकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. टँकरच्या पाण्याने पात्रात उभे राहुन केलेल्या स्नानास गोदास्नान मानण्याची वेळ ओढवलीआहे.

६०० रूपये टँकर.....दशक्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांना स्नानासाठी टँकर विकत घ्यावे लागत आहे. गोदावरीच्या पात्रात आठ ते दहा टँकर उपलब्ध असून एका टँकरसाठी ६०० रूपये मोजावे लागत आहेत. ऐन वेळी पाण्याच्या टँकरसाठी दाम मोजावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गोदावरीच्या झऱ्यातून पाणी पुरवठास्थानिक नागरिकांनी दुष्काळाच्या  परिस्थितीत रोजगार शोधला असून गोदावरीच्या पात्रात खोल झरे खोदुन त्यात पाझरलेले पाणी ते स्वस्तात भाविकांसाठी उपलब्ध करून देत आहेत. ज्या नागरिकांना टँकर घेउन दशक्रिया विधी करणे परवडत नाही अशा नागरिकांना या झऱ्यातील पाण्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. पाच रूपयात या झऱ्यातून बकेट भर पाणी दिले जात आहे. नाथषष्ठी नंतर ताबडतोब गोदावरी पात्रात पाणी सोडले असते तर आज अशी भिषण परिस्थिती ओढवली नसती अशी चर्चा होत  आहे.

टॅग्स :droughtदुष्काळgodavariगोदावरीAurangabadऔरंगाबादWaterपाणी