शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
4
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
5
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
6
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
7
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
8
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
9
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
10
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
11
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
13
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
14
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
15
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
16
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
18
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
19
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
20
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...

दशक्रिया विधीसाठी वापरावे लागतेय टँकरचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:52 IST

पाणी विकत घेऊन गोदास्नान उरकावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र

- संजय जाधवपैठण (औरंगाबाद ) : दक्षिण काशी पैठण म्हणून मान्यता असलेल्या पैठण नगरीतील गोदावरीचे पात्र आटल्याने दशक्रिया विधी टँकरचे पाणी विकत घेऊन करण्याचा बाका प्रसंग नागरिकांवर ओढवला आहे. गोदावरीच्या झऱ्यातील पाणी विकत घेऊन गोदास्नान उरकावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र गोदामायेच्या पात्रात दिसून येत आहे. गेल्या सहा दशकात सन २०१६ नंतर यंदा गोदेचे पात्र आटल्याने धार्मिक विधी साठी आलेल्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. प्रशासनाने विधीसाठी अल्पदरात टँकर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे. 

 भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना माता मानले जाते या नद्यांच्या परिसरातच संस्कृतिचा जन्म व विकास झाला दक्षिण भारतात गोदावरीच्या सानिध्यात संस्कृती रूजली असे मानले जाते. पैठण शहरात गोदावरी पित्रमुखी (दक्षिण मुखी) वाहते म्हणून दक्षिणेतील काशी म्हणून पैठण नगरिचे महत्व आजही अबाधित आहे  गोदावरीच्या तीरावर पिंडदान, दशक्रिया विधी, अस्थिविसर्जन, सिंहस्थविधी, कालसर्प शांती, त्रिपिंडी विधी, नियमित होत आले आहेत हे विधी करण्यासाठी  भाविक हजारोच्या संखेने दररोज पैठण शहरात दाखल होतात 

गोदावरी आटली...नाथषष्ठी साठी गोदावरीच्या पात्रातील पाणी सोडून देण्यात आले, कोरड्या झालेल्या पात्रात वारकऱ्यांची सोय करण्यात आली. या नंतर जायकवाडी ची पाणी पातळी जोत्याखाली गेल्याने धरणावरील जलविद्युत प्रकल्प बंद पडला व गोदावरीत जलविद्युत प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा स्रोत बंद झाला. गेल्या पंधरा दिवसा पासून उन्हाच्या दाहकतेने गोदावरीतील पाणी बाष्पीभवन प्रक्रिये द्वारे उडून गेले व गोदावरी कोरडी झाली. गोदावरी पात्रात पाणी आहे असे समजून विधीसाठी आलेल्या भाविकांना ऐनवेळी टँकर चे पाणी विकत घेउन विधी उरकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. टँकरच्या पाण्याने पात्रात उभे राहुन केलेल्या स्नानास गोदास्नान मानण्याची वेळ ओढवलीआहे.

६०० रूपये टँकर.....दशक्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांना स्नानासाठी टँकर विकत घ्यावे लागत आहे. गोदावरीच्या पात्रात आठ ते दहा टँकर उपलब्ध असून एका टँकरसाठी ६०० रूपये मोजावे लागत आहेत. ऐन वेळी पाण्याच्या टँकरसाठी दाम मोजावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गोदावरीच्या झऱ्यातून पाणी पुरवठास्थानिक नागरिकांनी दुष्काळाच्या  परिस्थितीत रोजगार शोधला असून गोदावरीच्या पात्रात खोल झरे खोदुन त्यात पाझरलेले पाणी ते स्वस्तात भाविकांसाठी उपलब्ध करून देत आहेत. ज्या नागरिकांना टँकर घेउन दशक्रिया विधी करणे परवडत नाही अशा नागरिकांना या झऱ्यातील पाण्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. पाच रूपयात या झऱ्यातून बकेट भर पाणी दिले जात आहे. नाथषष्ठी नंतर ताबडतोब गोदावरी पात्रात पाणी सोडले असते तर आज अशी भिषण परिस्थिती ओढवली नसती अशी चर्चा होत  आहे.

टॅग्स :droughtदुष्काळgodavariगोदावरीAurangabadऔरंगाबादWaterपाणी