शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

औरंगाबादची पाणीपुरवठा योजना तपासणार तामिळनाडूचे अभियंते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 13:13 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी जीर्ण झाल्या असून, त्यांच्या तपासणीसाठी तामिळनाडू येथील सेवानिवृत्त अभियंत्यांचे पथक २९ मे रोजी येणार आहे

ठळक मुद्देशहरात सध्या तीन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. शहरात रोज १३५ एमएलडी पाणी येऊनही प्रशासनाकडून नियोजन केले जात नाही, असा आरोप होतो आहे.

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी जीर्ण झाल्या असून, त्यांच्या तपासणीसाठी तामिळनाडू येथील सेवानिवृत्त अभियंत्यांचे पथक २९ मे रोजी येणार आहे. त्या पथकासोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरात सध्या तीन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. 

शहरात रोज १३५ एमएलडी पाणी येऊनही प्रशासनाकडून नियोजन केले जात नाही, असा आरोप होतो आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत विद्यमान योजना चालवावी लागणार आहे. ती योजना तपासून आणखी सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी तामिळनाडूमधील सेवानिवृत्त अभियंत्यांच्या तज्ज्ञांचे पथक बोलावले आहे. पूर्वी शहरात ९७० कि.मी.ची पाईपलाईन होती. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या काळात शहरात १०० किमीची पाईपलाईन टाकण्यात आली. १०७० किमीच्या पाईपलाईनवर असलेल्या नळांना सध्या पाणी द्यावे लागले आहे. तसेच हजारो नळ कनेक्शन वाढले आहेत. वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा दावा पाणीपुवठा विभागाने केला. 

दहा एमएलडी पाणी कमी यावर्षी हर्सूल तलावात पाणीसाठा झाला नाही. हर्सूल तलावातील पाच एमएलडी पाणी काही वॉर्डांना दिले जात होते. हे पाच एमएलडी पाणी कमी झाले, तसेच जायकवाडी धरणातून ५ एमएलडी पाण्याचा उपसा कमी होत आहे. दहा एमएलडी पाणी कमी झाल्याने ताण वाढला आहे. ज्या वसाहतींना हर्सूल तलावाचे पाणी मिळत होते, त्या वसाहतींना शहर पाणीपुरवठा योजनेतून पाणी द्यावे लागत आहे. जायकवाडीतून १५९ एमएलडी पाणी मनपा उपसते, असे जायकवाडी प्रकल्प उपसा योजनेकडे रेकॉर्ड आहे. पंपिंग स्टेशनवरील मीटरदेखील नादुरुस्त होते. ते गुरुवारी दुरुस्त करण्यात आले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण