शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

औरंगाबादची पाणीपुरवठा योजना तपासणार तामिळनाडूचे अभियंते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 13:13 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी जीर्ण झाल्या असून, त्यांच्या तपासणीसाठी तामिळनाडू येथील सेवानिवृत्त अभियंत्यांचे पथक २९ मे रोजी येणार आहे

ठळक मुद्देशहरात सध्या तीन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. शहरात रोज १३५ एमएलडी पाणी येऊनही प्रशासनाकडून नियोजन केले जात नाही, असा आरोप होतो आहे.

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी जीर्ण झाल्या असून, त्यांच्या तपासणीसाठी तामिळनाडू येथील सेवानिवृत्त अभियंत्यांचे पथक २९ मे रोजी येणार आहे. त्या पथकासोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरात सध्या तीन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. 

शहरात रोज १३५ एमएलडी पाणी येऊनही प्रशासनाकडून नियोजन केले जात नाही, असा आरोप होतो आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत विद्यमान योजना चालवावी लागणार आहे. ती योजना तपासून आणखी सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी तामिळनाडूमधील सेवानिवृत्त अभियंत्यांच्या तज्ज्ञांचे पथक बोलावले आहे. पूर्वी शहरात ९७० कि.मी.ची पाईपलाईन होती. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या काळात शहरात १०० किमीची पाईपलाईन टाकण्यात आली. १०७० किमीच्या पाईपलाईनवर असलेल्या नळांना सध्या पाणी द्यावे लागले आहे. तसेच हजारो नळ कनेक्शन वाढले आहेत. वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा दावा पाणीपुवठा विभागाने केला. 

दहा एमएलडी पाणी कमी यावर्षी हर्सूल तलावात पाणीसाठा झाला नाही. हर्सूल तलावातील पाच एमएलडी पाणी काही वॉर्डांना दिले जात होते. हे पाच एमएलडी पाणी कमी झाले, तसेच जायकवाडी धरणातून ५ एमएलडी पाण्याचा उपसा कमी होत आहे. दहा एमएलडी पाणी कमी झाल्याने ताण वाढला आहे. ज्या वसाहतींना हर्सूल तलावाचे पाणी मिळत होते, त्या वसाहतींना शहर पाणीपुरवठा योजनेतून पाणी द्यावे लागत आहे. जायकवाडीतून १५९ एमएलडी पाणी मनपा उपसते, असे जायकवाडी प्रकल्प उपसा योजनेकडे रेकॉर्ड आहे. पंपिंग स्टेशनवरील मीटरदेखील नादुरुस्त होते. ते गुरुवारी दुरुस्त करण्यात आले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण