शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तालुका काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:37 IST

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात औरंगाबाद तालुका काँग्रेसने काढलेल्या जनआक्रोश मोर्चास आज चांगला प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात औरंगाबाद तालुका काँग्रेसने काढलेल्या जनआक्रोश मोर्चास आज चांगला प्रतिसाद मिळाला. या मोर्चात चार-पाच बैलगाड्यांच्या माध्यमातून ग्रामीण जनजीवनाचे प्रतिबिंब उमटवण्यात आले होते. कपाशीची झाडे कशी वाळताहेत, डाळिंबाची झाडे वाळून चालली आहेत, दुधाला योग्य भाव मिळत नाही म्हणून कॅन, असे जिवंत चित्र उभे करण्यात मोर्चाचे संयोजक यशस्वी झालेले दिसले.दुपारी एकच्या सुमारास क्रांतीचौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोक्यावर तिरंगी टोपी होती. एवढेच नाही तर बैलांची शिंगेसुद्धा तिरंगीच रंगविण्यात आली होती. बैलगाड्यांवर मागण्यांचे फलक लावण्यात आले होते. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चाच्या अग्रभागी ग्रामीण भागातून आलेले हलगीवादक हलगी वाजवत होते.मोर्चात महिलांचा सहभागही लक्षणीय राहिला. ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यांच्यात उत्साह जाणवत होता. घोषणांचा चोहोबाजूंनी पाऊस पडत होता. त्यातून मोदी सरकारविरुद्धचा आक्रोश बाहेर पडत होता.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील आदींच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा, शहागंजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे जाहीर सभेत मोर्चाचे विसर्जन झाले. त्यात वक्त्यांची भाषणे टोकदार झाली आणि सभा संपेपर्यंत कुणीही उठून गेले नाही.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेतील भाषणे रंगत गेली. अनेकांनी सरकारविरुद्ध जोरदार आघाडी उघडून बोचरी टीका केली. हे सरकार कसे मुळावर उठले आहे. अच्छे दिनच्या नावावर देशाची फसवणूक करीत आहे, असा टीकेचा सूर होता. सभेत औरंगाबाद तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामूकाका शेळके यांनी प्रास्ताविक केले. राहुल सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. पवन डोंगरे यांनी आभार मानले. नंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. औरंगाबाद तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला. कापसाला सात हजार रु. हमीभाव मिळावा व दुधाला तीस रु. लिटर भाव द्या, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.