शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

तालुका काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:37 IST

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात औरंगाबाद तालुका काँग्रेसने काढलेल्या जनआक्रोश मोर्चास आज चांगला प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात औरंगाबाद तालुका काँग्रेसने काढलेल्या जनआक्रोश मोर्चास आज चांगला प्रतिसाद मिळाला. या मोर्चात चार-पाच बैलगाड्यांच्या माध्यमातून ग्रामीण जनजीवनाचे प्रतिबिंब उमटवण्यात आले होते. कपाशीची झाडे कशी वाळताहेत, डाळिंबाची झाडे वाळून चालली आहेत, दुधाला योग्य भाव मिळत नाही म्हणून कॅन, असे जिवंत चित्र उभे करण्यात मोर्चाचे संयोजक यशस्वी झालेले दिसले.दुपारी एकच्या सुमारास क्रांतीचौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोक्यावर तिरंगी टोपी होती. एवढेच नाही तर बैलांची शिंगेसुद्धा तिरंगीच रंगविण्यात आली होती. बैलगाड्यांवर मागण्यांचे फलक लावण्यात आले होते. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चाच्या अग्रभागी ग्रामीण भागातून आलेले हलगीवादक हलगी वाजवत होते.मोर्चात महिलांचा सहभागही लक्षणीय राहिला. ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यांच्यात उत्साह जाणवत होता. घोषणांचा चोहोबाजूंनी पाऊस पडत होता. त्यातून मोदी सरकारविरुद्धचा आक्रोश बाहेर पडत होता.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील आदींच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा, शहागंजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे जाहीर सभेत मोर्चाचे विसर्जन झाले. त्यात वक्त्यांची भाषणे टोकदार झाली आणि सभा संपेपर्यंत कुणीही उठून गेले नाही.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेतील भाषणे रंगत गेली. अनेकांनी सरकारविरुद्ध जोरदार आघाडी उघडून बोचरी टीका केली. हे सरकार कसे मुळावर उठले आहे. अच्छे दिनच्या नावावर देशाची फसवणूक करीत आहे, असा टीकेचा सूर होता. सभेत औरंगाबाद तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामूकाका शेळके यांनी प्रास्ताविक केले. राहुल सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. पवन डोंगरे यांनी आभार मानले. नंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. औरंगाबाद तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला. कापसाला सात हजार रु. हमीभाव मिळावा व दुधाला तीस रु. लिटर भाव द्या, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.