शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

तालुका काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:37 IST

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात औरंगाबाद तालुका काँग्रेसने काढलेल्या जनआक्रोश मोर्चास आज चांगला प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात औरंगाबाद तालुका काँग्रेसने काढलेल्या जनआक्रोश मोर्चास आज चांगला प्रतिसाद मिळाला. या मोर्चात चार-पाच बैलगाड्यांच्या माध्यमातून ग्रामीण जनजीवनाचे प्रतिबिंब उमटवण्यात आले होते. कपाशीची झाडे कशी वाळताहेत, डाळिंबाची झाडे वाळून चालली आहेत, दुधाला योग्य भाव मिळत नाही म्हणून कॅन, असे जिवंत चित्र उभे करण्यात मोर्चाचे संयोजक यशस्वी झालेले दिसले.दुपारी एकच्या सुमारास क्रांतीचौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोक्यावर तिरंगी टोपी होती. एवढेच नाही तर बैलांची शिंगेसुद्धा तिरंगीच रंगविण्यात आली होती. बैलगाड्यांवर मागण्यांचे फलक लावण्यात आले होते. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चाच्या अग्रभागी ग्रामीण भागातून आलेले हलगीवादक हलगी वाजवत होते.मोर्चात महिलांचा सहभागही लक्षणीय राहिला. ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यांच्यात उत्साह जाणवत होता. घोषणांचा चोहोबाजूंनी पाऊस पडत होता. त्यातून मोदी सरकारविरुद्धचा आक्रोश बाहेर पडत होता.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील आदींच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा, शहागंजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे जाहीर सभेत मोर्चाचे विसर्जन झाले. त्यात वक्त्यांची भाषणे टोकदार झाली आणि सभा संपेपर्यंत कुणीही उठून गेले नाही.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेतील भाषणे रंगत गेली. अनेकांनी सरकारविरुद्ध जोरदार आघाडी उघडून बोचरी टीका केली. हे सरकार कसे मुळावर उठले आहे. अच्छे दिनच्या नावावर देशाची फसवणूक करीत आहे, असा टीकेचा सूर होता. सभेत औरंगाबाद तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामूकाका शेळके यांनी प्रास्ताविक केले. राहुल सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. पवन डोंगरे यांनी आभार मानले. नंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. औरंगाबाद तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला. कापसाला सात हजार रु. हमीभाव मिळावा व दुधाला तीस रु. लिटर भाव द्या, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.