शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Talathi Exam: १ हजार रुपये फीस भरली, आता परीक्षा केंद्रावर बॅग ठेवण्यासही वेगळा चार्ज

By राम शिनगारे | Updated: August 22, 2023 12:43 IST

तलाठी भरती परीक्षेत विद्यार्थ्यांची लूट

छत्रपती संभाजीनगर : राज्यात तलाठी भरती करण्यासाठी टीसीएस कंपनी राज्यभरात परीक्षा घेत आहे. परीक्षेचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सकाळी ९ वाजता सुरू होणारा पेपर ११ वाजता सुरू झाला. त्यामुळे तीन शिफ्टमधील परीक्षा विस्कळीत झाल्या. परीक्षेसाठी १ हजार रुपये शुल्क भरल्यानंतरही शहरातील चिकलठाणा एमआयडीसीतील आयवॉन डिजिटल झोन परीक्षा केंद्रात युवकांकडून बॅग ठेवण्यासाठी २० रुपये चार्ज आकारण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यात तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे. दररोज तीन शिफ्टमध्ये परीक्षा होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात टीसीएस कंपनीचे आयऑन डिजिटल हे अधिकृत परीक्षा केंद्र आहे. त्याशिवाय सेव्हन हिल येथे बायटेझ इन्फोटेक, शहानुरमिया दर्गाह येथे युआन डिजिटल, पीईएस अभियांत्रिकी, आयसीएम इंजिनिअरिंगसह इतर ठिकाणी परीक्षा केंद्रे आहेत. या सर्वच परीक्षा केंद्रांवर सकाळी ९ वाजताच पहिल्या सत्रातील परीक्षेचे आयोजन केले होते. एकूण १०० प्रश्नांचा हा पेपर देण्यासाठी सकाळी ८ वाजताच परीक्षार्थी केंद्रांवर दाखल झाले होते. सकाळी ८ वाजता केंद्रात गेलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रत्यक्षात ११ वाजता सुरू झाली. तेथून पुढे १ वाजेपर्यंत पहिल्या सत्रातील पेपर चालला. त्यानंतर पुढील दोन्ही सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे मुख्य परीक्षा केंद्र असलेल्या चिकलठाण्यातील आयऑन परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना बाहेर बॅग ठेवण्यासाठी २० रुपये चार्ज आकारण्यात येत आहे. त्याशिवाय आतमध्ये केंद्रात विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नसल्याची धक्कादायक माहिती लोकमतशी बोलताना परीक्षार्थींनी दिली.

बाहेरुन आलेले ताटकळलेटीसीएस कंपनीच्या गोंधळामुळे छत्रपती संभाजीनगरच्या युवकांना नागपूर, अमरावती येथील केंद्र तर पुण्याच्या युवकांना छत्रपती संभाजीनगर येथील केंद्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी एक दिवस अगोदरच विद्यार्थी नातेवाइकांना घेऊन आलेले आहेत. या सर्वांना प्रचंड मनस्ताप परीक्षेच्या गोंधळामुळे सहन करावा लागला. विविध परीक्षा केंद्रांमध्ये पाच तास साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे परीक्षार्थींसह पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाStudentविद्यार्थी