शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Talathi Exam: १ हजार रुपये फीस भरली, आता परीक्षा केंद्रावर बॅग ठेवण्यासही वेगळा चार्ज

By राम शिनगारे | Updated: August 22, 2023 12:43 IST

तलाठी भरती परीक्षेत विद्यार्थ्यांची लूट

छत्रपती संभाजीनगर : राज्यात तलाठी भरती करण्यासाठी टीसीएस कंपनी राज्यभरात परीक्षा घेत आहे. परीक्षेचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सकाळी ९ वाजता सुरू होणारा पेपर ११ वाजता सुरू झाला. त्यामुळे तीन शिफ्टमधील परीक्षा विस्कळीत झाल्या. परीक्षेसाठी १ हजार रुपये शुल्क भरल्यानंतरही शहरातील चिकलठाणा एमआयडीसीतील आयवॉन डिजिटल झोन परीक्षा केंद्रात युवकांकडून बॅग ठेवण्यासाठी २० रुपये चार्ज आकारण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यात तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे. दररोज तीन शिफ्टमध्ये परीक्षा होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात टीसीएस कंपनीचे आयऑन डिजिटल हे अधिकृत परीक्षा केंद्र आहे. त्याशिवाय सेव्हन हिल येथे बायटेझ इन्फोटेक, शहानुरमिया दर्गाह येथे युआन डिजिटल, पीईएस अभियांत्रिकी, आयसीएम इंजिनिअरिंगसह इतर ठिकाणी परीक्षा केंद्रे आहेत. या सर्वच परीक्षा केंद्रांवर सकाळी ९ वाजताच पहिल्या सत्रातील परीक्षेचे आयोजन केले होते. एकूण १०० प्रश्नांचा हा पेपर देण्यासाठी सकाळी ८ वाजताच परीक्षार्थी केंद्रांवर दाखल झाले होते. सकाळी ८ वाजता केंद्रात गेलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रत्यक्षात ११ वाजता सुरू झाली. तेथून पुढे १ वाजेपर्यंत पहिल्या सत्रातील पेपर चालला. त्यानंतर पुढील दोन्ही सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे मुख्य परीक्षा केंद्र असलेल्या चिकलठाण्यातील आयऑन परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना बाहेर बॅग ठेवण्यासाठी २० रुपये चार्ज आकारण्यात येत आहे. त्याशिवाय आतमध्ये केंद्रात विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नसल्याची धक्कादायक माहिती लोकमतशी बोलताना परीक्षार्थींनी दिली.

बाहेरुन आलेले ताटकळलेटीसीएस कंपनीच्या गोंधळामुळे छत्रपती संभाजीनगरच्या युवकांना नागपूर, अमरावती येथील केंद्र तर पुण्याच्या युवकांना छत्रपती संभाजीनगर येथील केंद्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी एक दिवस अगोदरच विद्यार्थी नातेवाइकांना घेऊन आलेले आहेत. या सर्वांना प्रचंड मनस्ताप परीक्षेच्या गोंधळामुळे सहन करावा लागला. विविध परीक्षा केंद्रांमध्ये पाच तास साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे परीक्षार्थींसह पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाStudentविद्यार्थी