शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

झोपेसाठी सर्रास गोळ्या घेताय? रक्तदाब, हृदयरोगाचा होऊ शकतो धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:13 IST

दिवसभर संगणक आणि मोबाइलच्या स्क्रीनवर डोळे लावल्याने झोपेचे चक्र बिघडले आहे

छत्रपती संभाजीनगर : वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि मोबाइलच्या विळख्यात अडकलेल्या दिनचर्येमुळे अनेकांना झोपेच्या समस्या भेडसावत आहेत. झोप येत नाही, म्हणून अनेक जण सर्रास झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र, या गोळ्यांचे डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन केल्याने रक्तदाब, हृदयरोगाची शक्यता बळावते, असे तज्ज्ञांनी म्हटले.

मोबाइल, टीव्हीने उडाली झोपदिवसभर संगणक आणि मोबाइलच्या स्क्रीनवर डोळे लावल्याने झोपेचे चक्र बिघडते आणि त्याचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी लवकर उठण्याची वेळ सांभाळण्याच्या प्रयत्नात शरीर थकल्यासारखे वाटते. झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे थकवा आणि चिडचिड वाढते.

डोक्यात डिग्री, ‘पॅकेज’ची गणितं!महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षा आणि भविष्यातील करिअरच्या चिंता करत रात्रभर अभ्यासात व्यग्र राहतात, तर नोकरदार वर्ग सतत उच्च वेतन, पदोन्नती, कामाच्या तणावाचा सतत विचार करत असतात. डोक्यात डिग्री आणि पगाराच्या आकड्यांची गणितं सुरू असल्यानेही झोपेवर परिणाम होते.

अपुरी झोप, तणावामुळे व्यसनाधीनताअपुरी झोप आणि वाढता तणाव यामुळे अनेक जण मद्यपान, सिगारेट आणि झोपेच्या गोळ्यांसारख्या गोष्टींमध्ये आधार शोधू लागतात. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

डॉक्टर, झोप येत नाहीय; औषध लिहून द्या!‘डॉक्टर, झोप येत नाहीय; काही औषध लिहून द्या,’ असा आग्रह अनेक जण स्वत:हूनच डाॅक्टरांकडे धरतात. सुरुवातीला या गोळ्या तणावमुक्त झोप देतात. मात्र, त्यांचा दीर्घकालीन परिणाम शरीरावर होऊ शकतो.

झोपेच्या गोळ्यांमुळे रक्तदाबावर परिणामअनेक संशोधनांनुसार झोपेच्या गोळ्यांचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. या गोळ्यांमुळे मेंदूवरील नैसर्गिक न्यूरोट्रान्समीटर क्रियाशीलता प्रभावित होते. परिणामी, हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

हृदयरोगाची शक्यता; मेंदूवर परिणामझोपेच्या गोळ्यांचा दीर्घकाळ वापर केल्यास हृदयरोगाची शक्यता वाढते. हृदयाचे ठोके अनियमित होणे, रक्तदाब वाढणे आणि मानसिक क्षमता कमी होणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात. या औषधांचा प्रभाव मेंदूवरही पडतो. स्मरणशक्ती कमी होणे, सतत गुंगी येणे, मानसिक आरोग्यावर परिणाम होणे, अशी स्थिती निर्माण होते.

तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या नकोझोपेच्या अडचणी शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही समस्यांशी निगडित आहेत. झोपेच्या समस्या मानसिक आरोग्याच्या स्थितीत योगदान देऊ शकतात किंवा वाढवू शकतात आणि इतर मानसिक आरोग्य स्थितींचे लक्षण असू शकतात. झोपेच्या विकारांवर औषधोपचार खरच महत्त्वाचे आहेत; पण मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ती घेतली पाहिजे.- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य