शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सरसकट दुष्काळ जाहीर करून युद्धपातळीवर उपाययोजना करा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 19:53 IST

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कुठल्याही प्रक्रियांमध्ये न अडकता सरसकट दुष्काळ जाहीर करून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या पाहिजेत

औरंगाबाद : परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कुठल्याही प्रक्रियांमध्ये न अडकता सरसकट दुष्काळ जाहीर करून पशुधन व फळबागा वाचविण्यासाठी, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.

चिखली येथे भारत बोंद्रे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहून शरद पवार हे औरंगाबादला आले होते. तिकडे जाण्यासाठी रात्री मुक्कामही औरंगाबादेतच केला होता. शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळावर पत्रकारांशी विस्ताराने चर्चा केली व सध्या माझे याच प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य आहे, असे ते म्हणाले. 

सत्ताधारी अचाट कल्पना मांडत असतात. परदेशातून कडबा आणायला माझी काहीच हरकत नाही; पण यात वेळ किती जाईल? असा सवाल उपस्थित करून ‘आपण सर्वज्ञ आहात; पण जाणकारांचा सल्ला जरा घेत चला ना,’ असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 

‘चाइल्डिश’ म्हणणार नाही कारण... पवार यांनी सांगितले की, आम्ही सत्तेत असताना दुष्काळ की दुष्काळसदृश, अशा शब्दांमध्ये अडकून न पडता तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करीत होतो. निर्णय घ्यायला उशीर लावत नव्हतो आणि शब्दांचा खेळ करीत बसण्याची ही वेळ नाही. सध्या लहान मुलांसारखे चालू आहे. याला मी ‘चाइल्डिश’ म्हणणार नाही. कारण मुख्यमंत्रीपदाची किंमत कमी होऊ नये,’ असाही टोला लगावायला पवार विसरले नाहीत.

साखर उत्पादनासाठी बीटची शेती फायदेशीर ऊस उत्पादनासाठी पाणी आणि कालावधीही जास्त लागतो. हे लक्षात घेऊन मागच्याच आठवड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे आम्ही फ्रान्स, नेदरलॅण्ड, स्पेन आणि बेल्जियम या देशांना भेटी देऊन आलो. तेथील बीटची शेती पाहिली. ती परवडणारी वाटली. सहा महिन्यांत बीट येते व तुलनेने पाणीही कमी लागते. शिवाय  बीटमध्ये साखरेचे प्रमाणही १३ टक्केआहे. बीटपासून इथेनॉलही तयार करता येतो. हे फायदे लक्षात घेता येत्या महिनाभरात बीट शेतीचा अंतिम निर्णय आम्ही घेणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. 

प्यायच्या पाण्यात वाद नको नगर-नाशिकच्या धरणांमधील पाणी जायकवाडीत सोडण्यावरून सध्या वाद सुरू आहे. राजकारण रंगले आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधताच शरद पवार उत्तरले, हे राजकारण नाही. तिकडच्या मंडळींना आपले पाणी आपल्याकडेच राहावे असे वाटू शकते; पण आज  मराठवाड्याची परिस्थिती गंभीर आहे. प्यायला पाणी आताच उपलब्ध नाही. आणखी आठ महिने जायचे आहेत. अशावेळी राजकारण व वाद नको. हे मी नगर- नाशिककडे माझे ऐकणारी जी मंडळी असतील, त्यांना समजावून सांगणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळChief Ministerमुख्यमंत्री